शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचा गळा घोटला; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 5:56 PM

बेशर्म व नफेखोर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

- नितिन पंडीत

भिवंडी- केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल , डिझेलव घरगुती वापराच्या गॅस व इतर वस्तूंची दरवाढ करून भाजप सरकारने देशातील सामान्य जनतेचा गळा घोटण्याचे काम केले असून या बेशर्म व नफेखोर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम असून मुजोर भाजप सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत उलथून टाकल्याशिवाय काँग्रेसपक्ष सुस्त बसणार नाही अशी प्रतिक्रिया काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भिवंडीत शनिवारी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी सोनाळे येथे आयोजित केलेल्या जाहीर कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे , तालुकाध्यक्ष राकेश पाटील , शहापूर तालुकाध्यक्ष महेश धानके, कल्याण ग्रामीण अध्यक्ष परशुराम पितांबरे, अंबरनाथ ग्रामीणचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील , मुरबाड ग्रामीणचे तालुकाध्यक्ष चेतनसिंग पवार यांच्यासह , भिवंडी शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्यासह भिवंडी शहर व ग्रामीण भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या इंधन दर वाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून मोदी सरकारच्या दर वाढी विरोधात राज्यभर काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सुमारे २० हजारहुन अधिक स्वाक्षरी पत्रक यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे माजी जिल्ह्याध्यक्ष दयानंद चोरघे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केले. 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले असून दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सामान्य नागरीकांच्या आवाक्याबाहेर गेला असून मोदी सरकारने जनतेला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही, उलट कररूपाने करोडो रुपयांची लूट चालवली आहे. पेट्रोलने शंभरी पार केली असून डिझेल दर शंभरी जवळ पोहचले आहे. केंद्र सरकार रस्ते विकासाच्या नावाने १८ रुपये तर कृषी विकासाच्या नावाने ४ रुपये असे २२ रुपये विकासाच्या नावाने लुटत असल्याचा खुलासा देखील यावेळी नाना पटोले यांनी केला . 

यावेळी अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असतानाही मोदी सरकार तेल दरांमध्ये भरमसाठ कर लावून जनतेची लूट करत असून मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील करामधून मागील ७ वर्षात तब्बल २२ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्या आला. गॅस दर वाढीमुळे उज्ज्वला योजनेतील लोकांनाही आता गॅस सिलेंडर घेणे परवडत नसून डिझेल महाग झाल्याने सार्वजनिक तसेच मालवाहतुकही महाग झाली. खाद्यतेलही २०० रुपये लिटर झाले असल्याने या दरवाढीत सर्वसामान्यांबरोबरच मध्यमवर्गही भरडला जात असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसPetrolपेट्रोलDieselडिझेलCentral Governmentकेंद्र सरकार