शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
4
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
5
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
6
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
7
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
8
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
9
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
10
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
11
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
12
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
13
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
14
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
15
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
16
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
17
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
18
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
19
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
20
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

२०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर प्लास्टिकपासून का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 06:59 IST

पूर्वी प्लास्टिक नव्हते तेव्हापण आपण जगतच होतो. आपण २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर काल परवा आलेल्या प्लास्टिकपासून आपण देशाला मुक्त का करू शकत नाही

मीरा रोड : पूर्वी प्लास्टिक नव्हते तेव्हापण आपण जगतच होतो. आपण २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर काल परवा आलेल्या प्लास्टिकपासून आपण देशाला मुक्त का करू शकत नाही, असा सवाल करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी प्लास्टिकमुक्त भारताचे आवाहन केले.भार्इंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकची समस्या व संधी यावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले गेले होते. देशातील १६ राज्यांमधून २०३ जणांनी यात सहभाग घेतला होता. रविवारी राज्यपालांच्या उपस्थितीत या चर्चासत्राचा समारोप झाला. उद्योगपती निरंजन हिरानंदानी, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, रेखा महाजन, रवींद्र साठे, उमेश मोरे, रवी पोकरणा, आमदार गीता जैन आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी राज्यपाल म्हणाले की, पूर्वी प्लास्टिक नव्हते, तेव्हा आपण जगतच होतो. पण आज प्लास्टिक जीवनाचा एक भाग बनला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या नव्हत्या तेव्हा काच, धातूच्या बाटल्या होत्याच. मग आता का नाही प्लास्टिकशिवाय जगू शकत? आपल्याला जीवनशैलीत आणि सवयीत बदल करावा लागेल. प्लास्टिकबंदीमुळे रोजगार बुडेल हा विषय बाजूला ठेवा. उद्योगपतींना रोजगार बंद होईल म्हणून काळजी नसते. त्यांना भिती त्यांचा उद्योग बंद होणार, याची असते. तंबाखू बंदीच्या समितीवर असताना तंबाखू उत्पादनापासून बीडी बनवणे आदी कामात लाखो शेतकरी व बीडी मजुरांचा प्रश्न होताच. पण त्याचा लाखावा हिस्साही प्लास्टिकबंदीमुळे बाधित होणार नाही. प्लास्टिक व्यवसायात काम करणाºया कामगारांना दुसरे काम देता येऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकबंदीआड रोजगाराचा विषय बाजूला ठेवा.आपल्याकडे हुशार लोकं आहेत. त्यांनी सरसकट प्लास्टिक बंदी केलेली नसून, केवळ एकदा वापरल्या जाणाºया प्लास्टिक वस्तुंना बंदी केली आहे. गायींना प्लास्टिक खाल्याने खुप त्रास होतो. त्यामुळे प्लास्टिक न वापरण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वदेशी चळवळ झाली तर आपण स्वदेशी वस्तुंकडे वळलो. पंतप्रधानांनी स्वच्छतेचा संदेश दिला, तो अगदी खेड्या पाड्यात पोहचला. घराघरात शौचालयाचा संकल्प केला, तर ८ कोटीपेक्षा जास्त शौचालयं घराघरात बांधली गेली. २०० वर्षांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त होऊ शकतो तर आता आलेल्या प्लास्टिकपासून मुक्त का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी केला.या शिबीरानंतर प्लास्टिक बंदी - वापराबाबत म्हळगी प्रबोधिनी आचारसंहिता बनवणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपल्या जगण्यातून प्लास्टिक बाजूला काढू. हे देशासाठी मोठे योगदान ठरेल, असे सांगत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. प्लास्टिक वापराबाबत दोन महिन्यात आचारसंहिता तयार करुन जनजागृती करणार असल्याचे विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले. तर, प्लास्टिकचा वापर आणि ते नष्ट कसे करतो, हे महत्वाचे आहे, असे हिरानंदानी म्हणाले.‘महाराष्ट्रात राहतो, तर मराठी शिकावे’ठाणे : हिंदी ही राष्ट्रीय भाषा असली तरी महाराष्ट्रात आपण राहतो, तर मराठी बोलायला शिकले पाहिजे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी ठाण्यातील आर. जे. ठाकूर महाविद्यालयात चंद परिवार फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पाचव्या वार्षिक समारंभामध्ये व्यक्त केले. चंद परिवार फाउंडेशन पाच वर्षे खूप चांगल्याप्रकारे समाजोपयोगी कार्य करीत आहे. त्यांनी हे कार्य असेच पुढे चालू ठेवावे. चांगल्या कामाची समाज नेहमी दखल घेत असतोे, असेही ते म्हणाले. या फाउंडेशनतर्फेउत्कृष्ट काम केल्याबदल सुरेश राणाजी, बिरेंद्र नेगी, डॉ. दिनेश चंद आदींना राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर