शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वाहनांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 6:34 AM

एक कोटी २० लाखांची १२ वाहने हस्तगत : ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, मुंबईच्या वाहनांची हैदराबादमध्ये विक्री

जितेंद्र कालेकरठाणे : मुंबई, ठाण्यातून वाहनांची चोरी करणाºया आंतरराज्य टोळीचा ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सुनील चौरसिया याच्यासह सात जणांना यात अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी २० लाखांची महागडी वाहने हस्तगत केली आहेत. ठाणे शहर, ग्रामीण आणि मुंबई परिसरातून चोरलेली वाहने ही टोळी महाराष्ट्राबाहेर कमी किमतीमध्ये विकत असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे.

काशिमीरा, मीरा-भार्इंदर भागांतून इनोव्हासारख्या महागड्या कार तसेच इतर वाहनचोरीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि उपनिरीक्षक अभिजित टेलर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबºयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुनील चौरसिया, रणजीत चौधरी (रा. उत्तर प्रदेश), चिमाणी, सलदी राजा, भवरलाल चौधरी आणि चुणस श्रीनू (रा. आंध्र प्रदेश) अशा सात जणांना अटक केली आहे. रणजीत याच्याविरुद्ध मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरांत वाहनचोरीचे २९ गुन्हे दाखल आहेत. तर, श्रीनू याच्याविरुद्ध आंध्र प्रदेशमध्ये रक्तचंदनचोरीचे १० गुन्हे दाखल आहेत. २००९ ते २०१४ या दरम्यानच्या इनोव्हा कारवर या टोळीचे लक्ष असायचे. मुंबई, ठाण्यातून चोरलेली १४ ते १५ लाखांची इनोव्हा कार ते अवघ्या दीड ते दोन लाखांमध्ये हैदराबाद तसेच आंध्र प्रदेशमध्ये विक्री करत होते. कलम ३७९ च्या चोरीच्या गुन्ह्यात एखाद्या आरोपीला चार ते सात दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते. पण, या गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन ठाणे न्यायालयाने या एक महिन्यापूर्वी अटक झालेल्या यातील आरोपींची कोठडी २७ दिवसांपर्यंत वाढवली. चेसीस क्रमांकही बदलले जात होते. त्यामुळे या वाहनांच्या चोरीचा छडा लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तरीही, मोठ्या कौशल्याने यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी अटक केली. तुळिंज पोलिसांनी चार, तर काशिमीरा युनिटने आठ अशी १२ वाहने या टोळीकडून हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशी होती चोरीची ‘एमओबी’भंगारमध्ये टाकलेल्या वाहनांच्या इंजिनांचा क्रमांक ते या चोरीच्या वाहनाला वापरत होते. हा क्रमांक चोरीच्या वाहनाला लावल्यानंतरहे वाहन ते परराज्यात विक्री करत असल्याचेही तपासामध्ये उघड झाले आहे. आंध्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश किंवा बिहार येथून भंगार किंवा अपघातग्रस्त गाडीची ही टोळी अगदी नाममात्र किमतीमध्ये खरेदी करत असत. अशा प्रकारची पांढºया रंगाची इनोव्हा कार खरेदी केली की, मुंबईतून त्यांच्या साथीदाराला पांढºया रंगाच्या २०१४ च्या मॉडेलची आॅर्डर मिळायची. ही आॅर्डर मिळाली की, टोळीतील तिसरी व्यक्ती अशी गाडी हेरून ठेवायची. मग, त्यांच्यातील रणजीत चौधरी हा दहिसर भागातील गाडी वसई, विरार, नवी मुंबई किंवा घोडबंदर रोड भागात आणून ठेवायचा. ४८ तास गाडीकडे कोणीही आले नाही की, ती गाडी आॅर्डर असेल तिथे हैदराबादकडे पाठवली जायची. ती पुणे, सोलापूर, नाशिक या भागांतून हैदराबाद येथून अपघातग्रस्त किंवा भंगारातील गाडीची कागदपत्रे घेऊन आलेल्या याच टोळीतील व्यक्तीकडे मुंबईच्या मध्यस्थामार्फत सोपवली जायची.२०१४ पर्यंतच्या गाड्यांना मागणी२००९ ते २०१४ या काळातील काही कारला डोअर लॉक आणि इग्निशनची चावी एकच होती. त्यामुळे या कार चोरी करण्यासाठी सोप्या होत्या.२०१४ नंतरच्या कारला डोअर आणि इग्निशनचे लॉक वेगळे असल्यामुळे ते उघडणे या टोळीला अवघड असल्यामुळे २०१४ च्याच गाड्या ही टोळी हेरत होती.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी