शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

लोकल प्रवासावरील वेळेच्या बंधनाला विरोध, भाजपा खासदाराचं रेल्वेला निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 13:01 IST

विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना खासदार सहस्रबुद्धे, डावखरेंचे निवेदन

ठळक मुद्देसर्वसामान्यांसाठी लोकल १ फेब्रुवारीपासून खुली होत असली, तरी वेळेचे बंधन गैरसोयीचे आहे. एकिकडे गर्दीच्या वेळेत एसटी, बेस्ट, टीएमटीसह बससेवांमध्ये गर्दी होत असताना लोकलसेवेच्या गर्दीबद्दल भीती व्यक्त केली जात आहे.

ठाणे - तब्बल दहा महिन्याने लोकल सुरू होत असतानाच, सर्वसाधारण प्रवाशांवर लादलेल्या वेळेच्या मर्यादेला ठाणे शहर भाजपाने तीव्र विरोध दर्शविला आहे. भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना निवेदन देऊन राज्य सरकारने निश्चित केलेली वेळमर्यादा रद्द करण्याची मागणी केली आहे. लोकल प्रवासासाठी अव्यवहार्य वेळ मर्यादा हा केवळ नागरी हिताचा देखावा असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल १ फेब्रुवारीपासून खुली होत असली, तरी वेळेचे बंधन गैरसोयीचे आहे. एकिकडे गर्दीच्या वेळेत एसटी, बेस्ट, टीएमटीसह बससेवांमध्ये गर्दी होत असताना लोकलसेवेच्या गर्दीबद्दल भीती व्यक्त केली जात आहे. लोकलमध्ये सकाळी सातपर्यंत प्रवासाच्या मर्यादेचा किती चाकरमान्यांना फायदा होईल, दुपारी १२ नंतर लोकलने कर्मचारी कार्यालयात कसे पोचणार, रात्री ९ नंतर महिलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षिततेचे काय. दुपारी १२ ते ४ या वेळेत लोकल व रेल्वे स्थानकात गर्दी झाल्यास रेल्वे प्रशासन काय करणार? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्याचबरोबर वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास प्रवाशांवर दंडाची टांगती तलवार राहील. मात्र, त्याचा राज्य सरकारने कोणताही विचार केलेला नाही, ही दुर्देवाची बाब आहे, असे भाजपाने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या शिष्टमंडळात भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, पदाधिकारी सुजय पत्की, सचिन मोरे यांचा समावेश होता. या वेळी वरिष्ठ अधिकारी समील झाले यांचीही उपस्थिती होती.

गेल्या दहा महिन्यांमध्ये राज्यात टप्प्याटप्प्याने विविध उद्योगांसह आस्थापनांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले. आता कोरोनाच्या रुग्णसंख्येतही लक्षणीय घट होत असून, सोशल डिस्टन्सिंगसह विविध नियमांचे नागरिकांकडून पालन करण्याबरोबरच सतर्कताही दाखविली जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना वेळेची कोणतीही मर्यादा न ठेवता लोकल प्रवासाला परवानगी देण्याची गरज आहे. लोकलमध्ये दिवसभरात केव्हाही प्रवासाची अनुमती दिल्यास गर्दीचीही विभागणी होईल, असे मत भाजपाच्या वतीने निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या हिताचा विचार करून रेल्वे प्रशासनानेही नियमावली निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईlocalलोकलBJPभाजपाMember of parliamentखासदारrailwayरेल्वे