शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीचा बालेकिल्ला भाजपने राखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 01:17 IST

जातीच्या राजकारणाला मतदारांनी झिडकारले

- अनिकेत घमंडीडोंबिवली : डोंबिवली मतदारसंघातील विजयाची परंपरा कायम राखत भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. चव्हाण यांनी ८६ हजार २२७ मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांचा ४१ हजार ३११ मतांनी पराभव केला. हळबे यांना ४४ हजार ९१६, तर तिसºया क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवार राधिका गुप्ते यांनी सहा हजार ६१३ मते मिळवली. नोटाचे प्रमाण वाढले असून चार हजार ९१ मतदारांनी नोटाला पसंती दिली. जनसंघापासून बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील विजय स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत चव्हाण यांनी पश्चिमेकडील मोठागाव येथून १५०० मतांची आघाडी घेतली. मात्र, तिसºया फेरीत चव्हाण आणि हळबे यांना मिळालेल्या मतांमध्ये अवघे ३४ मतांचे अंतर होते. मात्र, तिन्ही फेऱ्यांमधील १५०० मतांची आघाडी कायम होती. त्यानंतर, चव्हाण यांची आघाडी वाढत गेली. हळबे यांनाही पश्चिमेला चांगली मते मिळाली, पण पूर्वेत भाजपने एकतर्फी वर्चस्व राखले.

हळबे यांना ते ज्या रामनगर या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले, तेथेही मते मिळाली नसल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले.काँग्रेसच्या राधिका गुप्ते यांना अवघी सहा हजार ६१३ मते मिळाली. काँग्रेसचे या ठिकाणी तीन नगरसेवक असूनही काँग्रेसला अपेक्षित मते न मिळाल्यामुळे हा धक्का असल्याचे गुप्ते म्हणाल्या. काँग्रेस, बसपा, संभाजी ब्रिगेड, अपक्ष या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांनी दिली.

डोंबिवली या रा.स्व. संघ व भाजपच्या गडात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पराभव करण्याकरिता मनसेने मंदार हळबे या ब्राह्मण तरुणास उमेदवारी दिली. यामुळे ब्राह्मण मते मनसेकडे वळतील, असा राज ठाकरे यांचा होरा होता. मात्र, प्रत्यक्षात भाजप व संघाची मतपेटी अभेद्य राहिली व चव्हाण विजयी झाले.

ठाकरे हे आपण जातपात पाहत नाही, असे सांगतात. त्याचप्रमाणे संघाने कधीही जातपातीचे अवडंबर माजवले नाही. मात्र, मनसेने हळबे विरुद्ध चव्हाण या लढतीत जातीचा फॅक्टर काम करील, असा विचार केला. तो फलद्रुप झाला नाही. शहरातील खड्डे, वाहतूककोंडी, पूलकोंडी, अर्धवट प्रकल्प, १० वर्षांत आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून न झालेली काही कामे यावरून सोशल मीडियात टीकाटिप्पणी करण्यात येत होती. त्या मुद्द्यांवरून मनसेने चव्हाण यांना घेरण्यापेक्षा जातीच्या फॅक्टरवरून घेरण्याचा प्रयत्न केला व तेथेच मनसेच्या अपयशाचा पाया रचला गेला, असे बोलले जात आहे.

सामान्यांच्या संपर्कात चव्हाण कायम असल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. हळबे यांनी उच्चशिक्षणाच्या मुद्द्यावरूनही चव्हाण यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याने त्या विषयावरही चर्चा झाली. मात्र, तोही मुद्दा फारसा चालला नाही. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराकरिता जीवाचे रान केले. त्यामुळे शेजारील कल्याण पूर्व व पश्चिममध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू असताना डोंबिवलीत शिवसेनेने चव्हाण यांना मनापासून साथ दिली.

मात्र, हळबेंना ४४ हजार मते मिळाली असून दिवंगत माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांना २०१४ मध्ये मिळालेल्या मतांच्या चारपट आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. २२० जागा मिळवण्याच्या वल्गना केलेल्या पक्षाची दारुण अवस्था झाली, ते चव्हाण पाहत आहेत. त्यांनी डोंबिवलीकरांच्या मूलभूत समस्यांना हात घातला नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. केडीएमसीच्या मागील निवडणुकीत मनसेच्या जागा घटल्या व भाजपच्या वाढल्या. मनसेची वाढलेली मते मागील यश पुन्हा गमावण्याची नांदी ठरणार नाही, याची खबरदारी भाजपला घ्यावी.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019dombivali-acडोंबिवली