शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

भातसा धरण समोर, तरीही घशाला कोरड, पाण्यासाठी वणवण; शहापूर तालुक्यातील गावपाड्यांची स्थिती

By अजित मांडके | Updated: May 16, 2025 03:09 IST

धरण नजरेसमोर आहे. त्यातही बॅकवॉटर अगदी डोळ्यांना दिसत असतानाही शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे:धरण नजरेसमोर आहे. त्यातही बॅकवॉटर अगदी डोळ्यांना दिसत असतानाही शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. गावपाड्यांतील विहिरी आटल्याने रोज येणाऱ्या एका टँकरची गावकरी चातकासारखी वाट पाहत असतात. टँकरचे पाणी पिण्यायोग्य नसून, त्यालाही दुर्गंधी येत आहे. त्यामुळे रहिवाशांना आरोग्य समस्या भेडसावत आहेत. गावात एकच बोअरवेल. एका कुटुंबाला दोन दिवसांतून एकदा दोन हंडे पाणी मिळते. प्रत्येक घराबाहेर नळ बसवले आहेत. परंतु, त्याला एक थेंबही पाणी येत नसल्याने  रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे. त्याच्या आजूबाजूला जळके वाडी, पोकळ्याची वाडी, कोठारे, साकडबाव, पाचरवाडी, पारदवाडी, बाबरे वाडी, चिल्हारवाडी, जांभुळवाडी, आदींसह इतर गावपाडे आहेत. या गावपाड्यांत सुमारे १० हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्या आहेत. घराबाहेर नळही  जोडले आहेत. येथील टाक्यांमधून जिल्ह्याबाहेरील बाहुली धरणातील पाणी दिले जाणार आहे. डोळ्यासमोर असलेल्या धरणातून पाणी देण्याऐवजी जिल्ह्याबाहेरील धरणातून पाणी कशासाठी, असा सवाल रहिवासी करीत आहेत. 

घराजवळ नळ असला तरी टाकीत पाणी नसल्याने नळाला पाणी नाही. पाण्याच्या टाक्यांमध्ये विहिरीत जे टँकरद्वारे पाणी टाकले जाते, तेच पाणी रहिवासी उचलून पाण्याच्या टाकीत नेऊन टाकत असल्याचे चित्र आहे. 

विहिरी कोरड्या 

येथील प्रत्येक गावात विहिरी आहेत. परंतु, त्या फेब्रुवारीपासूनच कोरड्या पडल्या. प्रत्येक गावात रोज एक टँकर फिरविला जातो. सकाळी सहा वाजता टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकले जाते. त्यानंतर दिवसभर ते पाणी भरण्यासाठी रहिवाशांची धडपड सुरू असते. परंतु, पाण्याला दुर्गंधी येत आहे.

आरोग्याचा प्रश्न 

टँकरच्या पाण्याला दुर्गंधी येत असली तरी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने तेच पाणी रहिवाशांना प्यावे लागत असल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या आहेत. जुलाब, पोटाच्या तक्रारी, त्वचेचे आजार, आदी आजारांना तोंड द्यावे लागत आहे. महिलांचा अख्खा दिवस पाणी भरण्यात जातो. घरापासून विहिरी दूरवर असल्याने एका वेळेत डोक्यावर दोन-दोन हंडे घेऊन महिला आणतात.

बोअरवेल आहे, पण... 

चिल्हारवाडी परिसराची लोकसंख्या १२०० हून अधिक आहे. रहिवाशांसाठी गावच्या वेशीवर १९८० मध्ये खोदलेल्या बोअरवेलला पाणी आहे. परंतु, दोन दिवसांतून एकदा दोन हंडे पिण्याचे पाणी रहिवाशांना मिळते. त्यासाठी घरातील रिकामे हंडे ठेवून नंबर लावला जातो. जसा नंबर येईल तसे पाणी घेऊन जाणारी महिला दुसऱ्या घरातील महिलेला पाणी भरण्याचा निरोप देते.

पाण्यासाठी अख्खा दिवस 

भातसा धरण नजरेसमोर आहे. मात्र, त्यातील पाणी आम्हाला नुसते बघावे लागते. पाण्यासाठी महिलांचा अख्खा दिवस वाया जातो. असे साकडबाव येथील रहिवासी लक्ष्मण चौधरी म्हणतात. तर गावात बोअरवेल आहे, परंतु दोन दिवसांतून एकदा केवळ दोन हंडेच पाणी मिळते, अशी खंत विनोद वाघ यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Damधरण