शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

भातसा धरण समोर, तरीही घशाला कोरड, पाण्यासाठी वणवण; शहापूर तालुक्यातील गावपाड्यांची स्थिती

By अजित मांडके | Updated: May 16, 2025 03:09 IST

धरण नजरेसमोर आहे. त्यातही बॅकवॉटर अगदी डोळ्यांना दिसत असतानाही शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे:धरण नजरेसमोर आहे. त्यातही बॅकवॉटर अगदी डोळ्यांना दिसत असतानाही शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. गावपाड्यांतील विहिरी आटल्याने रोज येणाऱ्या एका टँकरची गावकरी चातकासारखी वाट पाहत असतात. टँकरचे पाणी पिण्यायोग्य नसून, त्यालाही दुर्गंधी येत आहे. त्यामुळे रहिवाशांना आरोग्य समस्या भेडसावत आहेत. गावात एकच बोअरवेल. एका कुटुंबाला दोन दिवसांतून एकदा दोन हंडे पाणी मिळते. प्रत्येक घराबाहेर नळ बसवले आहेत. परंतु, त्याला एक थेंबही पाणी येत नसल्याने  रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे. त्याच्या आजूबाजूला जळके वाडी, पोकळ्याची वाडी, कोठारे, साकडबाव, पाचरवाडी, पारदवाडी, बाबरे वाडी, चिल्हारवाडी, जांभुळवाडी, आदींसह इतर गावपाडे आहेत. या गावपाड्यांत सुमारे १० हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्या आहेत. घराबाहेर नळही  जोडले आहेत. येथील टाक्यांमधून जिल्ह्याबाहेरील बाहुली धरणातील पाणी दिले जाणार आहे. डोळ्यासमोर असलेल्या धरणातून पाणी देण्याऐवजी जिल्ह्याबाहेरील धरणातून पाणी कशासाठी, असा सवाल रहिवासी करीत आहेत. 

घराजवळ नळ असला तरी टाकीत पाणी नसल्याने नळाला पाणी नाही. पाण्याच्या टाक्यांमध्ये विहिरीत जे टँकरद्वारे पाणी टाकले जाते, तेच पाणी रहिवासी उचलून पाण्याच्या टाकीत नेऊन टाकत असल्याचे चित्र आहे. 

विहिरी कोरड्या 

येथील प्रत्येक गावात विहिरी आहेत. परंतु, त्या फेब्रुवारीपासूनच कोरड्या पडल्या. प्रत्येक गावात रोज एक टँकर फिरविला जातो. सकाळी सहा वाजता टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकले जाते. त्यानंतर दिवसभर ते पाणी भरण्यासाठी रहिवाशांची धडपड सुरू असते. परंतु, पाण्याला दुर्गंधी येत आहे.

आरोग्याचा प्रश्न 

टँकरच्या पाण्याला दुर्गंधी येत असली तरी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने तेच पाणी रहिवाशांना प्यावे लागत असल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या आहेत. जुलाब, पोटाच्या तक्रारी, त्वचेचे आजार, आदी आजारांना तोंड द्यावे लागत आहे. महिलांचा अख्खा दिवस पाणी भरण्यात जातो. घरापासून विहिरी दूरवर असल्याने एका वेळेत डोक्यावर दोन-दोन हंडे घेऊन महिला आणतात.

बोअरवेल आहे, पण... 

चिल्हारवाडी परिसराची लोकसंख्या १२०० हून अधिक आहे. रहिवाशांसाठी गावच्या वेशीवर १९८० मध्ये खोदलेल्या बोअरवेलला पाणी आहे. परंतु, दोन दिवसांतून एकदा दोन हंडे पिण्याचे पाणी रहिवाशांना मिळते. त्यासाठी घरातील रिकामे हंडे ठेवून नंबर लावला जातो. जसा नंबर येईल तसे पाणी घेऊन जाणारी महिला दुसऱ्या घरातील महिलेला पाणी भरण्याचा निरोप देते.

पाण्यासाठी अख्खा दिवस 

भातसा धरण नजरेसमोर आहे. मात्र, त्यातील पाणी आम्हाला नुसते बघावे लागते. पाण्यासाठी महिलांचा अख्खा दिवस वाया जातो. असे साकडबाव येथील रहिवासी लक्ष्मण चौधरी म्हणतात. तर गावात बोअरवेल आहे, परंतु दोन दिवसांतून एकदा केवळ दोन हंडेच पाणी मिळते, अशी खंत विनोद वाघ यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Damधरण