शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यासाठीचे धान्य कुपोषणग्रस्तांना

By admin | Updated: September 12, 2016 03:06 IST

अंबरनाथमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भंडारा जमा करून भाविकांना महाप्रसादाचा लाभ देतात. मात्र यंदा शहरातील नागरिकांना महाप्रसाद देण्याऐवजी याच भंडारा

अंबरनाथ : अंबरनाथमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भंडारा जमा करून भाविकांना महाप्रसादाचा लाभ देतात. मात्र यंदा शहरातील नागरिकांना महाप्रसाद देण्याऐवजी याच भंडारा स्वरुपात संकलीत होणारे धान्य कुपोषणग्रस्तांना देण्याची संकल्पना शिवसेनेच्यावतीने राबविण्यात येत आहे.या उपक्रमात शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केले आहे. यापूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग राहिलेल्या पालघर जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागांना हे धान्य पाठविण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बालकांचे कुपोषणामुळे मृत्यू होतात. पालघर जिल्ह्यात जुलै २०१६ पर्यंत ७ हजार ३२० बालके कुपोषित असल्याची माहिती सरकारी अहवालातून उघड झालेली आहे. तर मोखाडयात जुलै महिन्यात १२ बालकांचा मृत्यू झाला आहे. शेजारील तालुक्यात भूकेपोटी मृत्यू होत असताना मानवी जीव वाचवणे महत्वाचे आहे की नाही, असा प्रश्न शिवसेनेनी केला आहे. एकीकडे लहान बालकांचे कुपोषणाने मृत्यू होत असताना दुसरीकडे गणेशोत्सवाच्या नावाने अनेक मंडळे भंडारा देऊन मंडळाचा गौरव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत ही विसंगती आहे. याच सार्वजनिक मंडळांनी भंडारासाठी एकत्रित होणारे धान्य गोळा करुन ते कुपोषणग्रस्त भागांना वाटप केल्यास त्या बालकांना चांगला आहार मिळण्यास मदत होईल. अंबरनाथ शहरातल्या सुमारे ५० ते ६० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फेअन्नदानाचा कार्यक्र म आयोजित केला जातो. यासाठी हजारो किलो धान्याचा वापर केला जातो. आम्ही या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पत्रक पाठविले असून त्यांनी महाभंडाऱ्याचा कार्यक्र म रद्द करून त्यासाठी लागणारे सर्व धान्य शिवसेना शाखेकडे सुपूर्द करावे, अशी विनंती संबंधित पदाधिकाऱ्यांना केली आहे, अशी माहिती वाळेकर यांनी दिली. १० दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर जमा होणारे शेकडो किलो धान्य पालघर जिल्ह्यात पाठवणार आहोत, असेही वाळेकर यांनी सांगितले. शहरातील उद्योगपती, कारखानदार, व्यापारी वर्ग, सामाजिक संस्था यांच्यासह शहरातील नागरिकांना देखील कुपोषित बालकांना अन्नदान अथवा अन्य स्वरुपात मदत शिवसेना अंबरनाथ शहर शाखेत आणून द्यावी असे आवाहन सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.