शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रस्त्यावर बेवारस, भंगार वाहने उभी कराल तर खबरदार, या महानगरपालिकेने घेतला दंडात्मक कारवाई, जप्तीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 2:53 PM

Mira Bhayander News : रस्त्यावर वापरात नसलेली अथवा बेवारस ,भंगार वाहने उगाचच उभी करून नागरिक व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर महापालिका आयुक्तांनी दंड व वाहन जप्ती करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

वसई  - वसई विरार महापालिका हद्दीतील सर्वच  रस्त्यावर वापरात नसलेली अथवा बेवारस ,भंगार वाहने उगाचच उभी करून नागरिक व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर महापालिका आयुक्तांनी दंड व वाहन जप्ती करण्यासाठी पाऊल उचललि असून तसा आदेश ही निर्गमित केल्याची माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली.

या आदेशात वसई विरार महापालिका प्रशासनाकडून संबंधितास 200 रु दंड व  प्रसंगी वाहन जप्ती करण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत. जनसंपर्क अधिकारी यांनी माहिती दिल्यानुसार,वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या कडेला वापरात नसलेली, भंगार, बेवारस आणि अपघातग्रस्त वाहने उभी असल्यामुळे व इतर सामान, भंगार  पडलेले असल्यामुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहनांची गती मंदावत आहे  व नागरिकांना येण्या जाण्यासही अडथळा निर्माण होत आहे. 

तसेच यामुळे शहरातील दैनंदिन स्वच्छतेलाही अडचण निर्माण होत असल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान अशा वापरात नसलेल्या, भंगार, बेवारस आणि अपघातग्रस्त वाहने व सामान  जप्त करण्याची प्रक्रिया महानगरपालीकेमार्फत करण्यात येणार आहे. एकूणच  सदरील कारवाई करतेवेळी महानगरपालिकेकडून सदर वाहनांवर अथवा सामानावर 24 तासात वाहन किंवा सामान हटविणे बाबतची नोटीस चिटकविण्यात येणार असून 24 तासानंतर महानगरपालिकेमार्फत सदरची वाहने व सामान जप्त करण्यात येईल. 

तर जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर व सामानावर जप्तीची कारवाई केल्यापासून प्रतिदिन रुपये 200/- इतका दंड व हटविण्याबाबत झालेल्या खर्चाची रक्कम भरणा करूनच संबंधितांना वाहन अथवा सामान परत घेता येईल.  त्यामुळे शहरांतील  सर्व नागरिकांनी येत्या दोन दिवसांत रस्त्यांच्या कडेला असलेली आपल्या मालकीची वापरात नसलेली, अपघातग्रस्त वाहने अथवा भंगार, सामान स्वत:हून हटवून  महानगरपालिकेस सहकार्य करावे असे ही आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक