शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

बील थकले, वीज कट, फोन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:21 PM

तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत

पालघर : जिल्ह्यातील बीएसएनएलच्या तारापूर केंद्रांतर्गत वीज बिलांची १८ लाख ८६ हजार ३७३ हजारांची रक्कम थकल्याने ८ मुख्य केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत.तारापूरच्या भारत संचार निगम लिमिटेडच्या केंद्रांतर्गत येणाऱ्या डहाणूच्या उपविभागीय कार्यालयाची ५ लाख ९७ हजार ३४० रुपयांची थकबाकी असून, उपविभागीय अभियंता विभागाची २ लाख २२ हजार ३१३ रुपये, नरपड (डहाणू) विभागाची २६ हजार ७१०, पालघर (माहीम) च्या उपविभागीय अभियंता विभागाची ३ हजार ५८०, पालघर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची ४६ हजार २०० रुपये, बोईसर (आर) उपअभियंता विभागाचे ४६ हजार ११० रुपये, बोईसर (आर) उपविभागीय अधिकारी कार्यालयाची ११ हजार ८१० रुपये तर तारापूर एमआयडीसी मधील कनिष्ठ टेलिकॉम अधिकारी कार्यालयाची ९ लाख ३२ हजार ३१० रुपये असे एकूण १८ लाख ८६ हजार ३७३ हजार रु पयांची थकबाकी आहे.महावितरणने बुधवारी एकूण ८ विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे तारापूर अणुऊर्जा केंद्रासह बँका, शासकीय कार्यालये, सायबर कॅफे, तसेच खाजगी व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. वसई च्या टेलिफोन एक्स्चेंज कार्यालयाचीही मोठी थकबाकी असल्याने विद्युत वितरण वसई विभागाचे अधिकारी विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथील एका अधिकाºयाने काही दिवसाची मुदत मागितल्याने कारवाई टळल्याचे बीएसएनएलच्या एका अधिकाºयाने लोकमतला सांगितले.जिल्ह्यातील बीएसएनएलच्या बेपर्वाईमुळे दूरसंचार विभागाच्या तारापूर, पालघर, बोईसर, माहीम आदी केंद्रांसह जिल्ह्यातील बहुतांशी दूरध्वनी केंद्रासह कार्यालयाची वीजदेयके न भरल्याने या दूरध्वनी केंद्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार दूरध्वनी व बीएसएनएलची मोबाइल व इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. सर्वत्र कामाचा खोळंबा झाल्याने ओरड सुरू झाल्याने जनरेटर अथवा इन्व्हर्टरच्या आधारावर ही सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर वरिष्ठ पातळीवरून थकबाकी रक्कम भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.ग्राहकांची पाठ ; शेकडो दूरध्वनी जोडण्या बंदबीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेबरोबर इंटरनेट व मोबाइल सेवा खंडित झाल्याने वेस्टर्न टेलिकॉम रिजन (डब्ल्यू टी आर) द्वारा इतर राज्यांना जोडणारी दूरध्वनी सेवादेखील खंडित झाली आहे. एक बाजूला बीएसएनएलची ही अवस्था असतानाच दुसºया बाजूला ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्यास असमर्थ ठरत असल्याने दर आठवड्याला शेकडो दूरध्वनी ग्राहक स्वत:च आपल्या दूरध्वनी जोडण्या बंद करत आहेत.बीएसएनएलच्या या कारभारामुळे येथील इंटरनेट सेवा देखील ग्राहक बंद करू लागले असून ते खाजगी सेवा अथवा केबलनेट सेवेच्या वापराकडे वळत आहेत, बीएसएनएलच्या लँड लाईन सेवे ऐवजी विविध खाजगी कंपनीच्या मोबाईल सेवेकडे जिल्ह्यातील ग्राहकमोठ्या प्रमाणात वळल्याने त्याचाही आर्थिक परिणाम बीएसएनएलवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याची विद्युत देयके भरण्याची क्षमताच दिवसेंदिवस कमी होते आहे.

टॅग्स :Internetइंटरनेटpalgharपालघर