शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

भिवंडी ठाणे महामार्गाची दुरावस्था; मंत्र्यांचे दौरे व स्थानिकांच्या आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 5:27 PM

भिवंडी ठाणे महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खाड्यांमुळे या महामार्गावर रोजची वाहतूक कोंडी होत आहे.

- नितिन पंडीत

भिवंडीभिवंडी ठाणे महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खाड्यांमुळे या महामार्गावर रोजची वाहतूक कोंडी होत आहे. ज्याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांसह चाकरमानी व प्रवाशांना होत आहे. महत्वाचे म्हणजे ठाणे कशेळी ते अंजुरफाटा भिवंडी हा रस्ता कल्याण संगम इन्फ्रा या कंपनीस बीओटी तत्वावर शासनाने दिला असून कंपनीकडून टोल वसुली मोठ्या प्रमाणात दिवस रात्र केली जात आहे. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेकडे या टोल कंपनीचे पुरता दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून पूर्णा गाव ते राहनाळ गाव या साधारणतः दोन ते टीम किलोमीटर अंतरावर रस्त्याला भले मोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराचे पाणी भर रस्त्यावर येत असल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. 

या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून खराब रस्त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महत्वाचे म्हणजे या महामार्गावर गोदाम पट्टा मोठ्या संख्येने असल्याने चाकरमान्यांना या मार्गावरून रोजचा प्रवास करावा लागत आहे. त्यातच खराब व खड्डेमय रस्त्यामुळे या मार्गावर रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अंजुरफाटा ते काल्हेर या जवळपास आठ ते नऊ किलोमीटर अंतरासाठी तब्बल अडीच ते तीन तास वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कशेळी येथे आंदोलन केले होते त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कशेळी टोलनाका देखील फोडला होता. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गासह भिवंडीतील वाहतूक कोंडी व रस्त्यांवरील खड्डयांची समस्या सोडविण्यासाठी भिवंडीचा दौरा केला होता.

यावेळी टोल कंपानीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चांगलेच खडेबोल सुनावले होते, पालकमंत्र्यांनी केलेली कानउघडणी नंतर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत गांभीर्याने विचार व नियोजन करून रस्ता व्यवस्थित करण्यात येईल असे आश्वासन टोल कंपनी बरीबरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालकमंत्र्यांना देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही या रस्त्याची परिस्थिती जैसे थे अशीच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचा व स्थानिकांनी केलेल्या आंदोलनांचा टोल कंपणीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणताही फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीला नेमकी मुहूर्त कधी मिळणार याकडे स्थानिकांसह प्रवाशांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीroad transportरस्ते वाहतूक