शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

कल्याण, उल्हासनगरमध्ये चोरीला गेलेले 200 मोबाईल पोलिसांनी काढले शोधून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 1:06 PM

कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे.

कल्याण - कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे. चोरी झालेले हे सर्व मोबाईल आज कल्याणात आयोजित कार्यक्रमाद्वारे संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर परिसरात मोबाईल चोरीचे आणि हरवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळात मोबाईल चोरीविरोधी पथकाची स्थापना केली. या नव्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत अल्पावधीतच चोरीला गेलेले 43 आणि हरवलेले 143 असे सुमारे 22 लाख रुपये किमतीचे 184 मोबाईल शोधून काढत 19. त्यातही कल्याणच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे 77 मोबाईल्स, डोंबिवली 58, उल्हासनबर 31 आणि अंबरनाथ पथकाने 4 मोबाईल शोधून काढले. 

हरवलेली किंवा चोरीला गेलेले मोबाईल सहसा पुन्हा परत मिळत नाहीत असा लोकांचा समज झाला आहे. मात्र चोरीला गेलेले मोबाईल पोलीस शोधून काढतात आणि ते नागरिकांना परत देतात. या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त अंकित गोयल, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे, डोंबिवलीचे रविंद्र वाडेकर, उल्हासनगरचे सुनील पाटील यांच्यासह मोबाईल विरोधी पथकाचे संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Mobileमोबाइल