शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Arnab Goswami: राज्य सरकारविरोधात ठाण्यात भाजपाची तीव्र निदर्शने; अन्यायकारक निर्णयांविरोधात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 14:35 IST

आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच लोकशाहीप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. 

ठाणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या अन्यायकारक निर्णयांबरोबरच पत्रकारांची मुस्कटदाबी केली जात असल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्या वतीने आज जोरदार निदर्शने करण्यात आली. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच लोकशाहीप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी झालेल्या निदर्शनांवेळा जोरदार घोषणा देण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकार हाय हाय, सोनिया सेना हाय हाय, नही चलेगी तानाशाही नही चलेगीच्या घोषणांनी कोर्टनाक्याचा परिसर दणाणून गेला. या निदर्शनांध्ये भाजपाचे प्रदेश सचिव संदिप लेले, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, अर्चना मणेरा, दीपा गावंड, महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, युवा मोर्चाचे सारंग मेढेकर यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, भाजपाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह ठाण्यातील लोकशाहीप्रेमी नागरिक उपस्थित होते. 

राज्यातील जनतेवर अन्याय करणाऱ्या निर्णयांची मालिका राज्य सरकारकडून सुरूच असून, राज्यातील जनतेची गळचेपी केली जात आहे. राज्य सरकारचे पाप जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकारांना सातत्याने दाबण्याचे कृत्य केले जात आहे. सातत्याने पत्रकारांची मुस्कटदाबी करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात आहे. अशा प्रकारांमधून राज्य सरकार आणीबाणी लागू करीत आहे, असा आरोप आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला. 

देशात १९७५ मध्ये कॉंग्रेसने जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी आणीबाणी आणली होती. त्याचीच आता राज्य सरकार, सोनिया गांधी व ठाकरे सरकार री ओढत आहेत. लोकशाही व संविधानाचे पालन न करता सूडभावनेने राज्य सरकार वागत आहे. यापुढील काळात लोकशाही टिकविण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईकBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार