शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी दरवाढ रद्द करण्यासाठी सेना-काँग्रेस जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 18:04 IST

पालिकेत भाजपा सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार सुरु केला असुन त्यांनी गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीच्या निवासी दरात तब्बल ५ तर वाणिज्य दरात २२ रुपयांनी वाढ केली आहे.

राजू काळे 

भाईंदर - पालिकेत भाजपा सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार सुरु केला असुन त्यांनी गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीच्या निवासी दरात तब्बल ५ तर वाणिज्य दरात २२ रुपयांनी वाढ केली आहे. त्यातच पाणीपुरवठ्याच्या योजना अद्याप अपुर्णावस्थेत असताना नव्याने ८ टक्के पाणीपुरवठा लाभ कर लागू करण्यास स्थायीने दिलेली मान्यता अयोग्य असल्याचा दावा करीत दरवाढीसह नवीन कर सत्ताधाय््राांनी त्वरीत रद्द करावा, या मागणीसाठी सेना-काँग्रेस या विरोधी पक्षांनी जनआंदोलन छेडण्याची तयारी सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. 

२०१४ मध्ये पालिकेकडुन प्रती १ हजार लीटर पाणीपुरवठ्याच्या निवासी वापरासाठी ७ रुपये व वाणिज्य वापरासाठी २८ रुपये दर वसुल केला जात होता. गेल्या १० वर्षांत त्यात वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने त्याच्या दरवाढीचा प्रस्ताव २०१५ मधील स्थायीत सादर केला होता. स्थायीने त्याला मान्यता दिल्यानंतर ३० एप्रिल २०१५ रोजीच्या महासभेने निवासी दरात ३ रुपये व वाणिज्य दरात १२ रुपये दरवाढीला मान्यता दिली. या दरवाढीला किमान ३ वर्षे पुर्ण होत नाही तोवर पुन्हा पाणी दरवाढ करण्याचा प्रस्ताव १५ डिसेंबरच्या स्थायीत सादर केला होता. त्यात निवासी वापरासाठी १८ व वाणिज्य वापरासाठी १०० रुपये दरवाढ प्रस्तावित केली होती. मात्र सत्ताधाय््राांनी त्या दरात कपात करीत निवासी दरात २ रुपये व वाणिज्य दरात १० रुपयांनी वाढ करण्यास मान्यता दिली. आपसुकच या दरवाढीला येत्या महासभेत अंतिम मान्यता दिली जाणार असली तरी गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीच्या निवासी दरात तब्बल ५ व वाणिज्य दरात २२ रुपये दरवाढ होणार आहे. त्यामुळे गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीत केलेली हि दरवाढ जवळपास दुप्पट ठरणार असल्याने  ती त्वरीत रद्द करावी. तसेच प्रशासनाने नवीन ७५ एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा योजना शहरात सुरु केली असली तरी त्यातील केवळ ५० एमएलडी पाणीपुरवठाच शहराला उपलब्ध होत आहे. उर्वरीत २५ एमएलडी पाणीपुरवठ्याचा अद्याप पत्ता नाही. त्याचप्रमाणे एमएमआरडीएमार्फत शहरासाठी २१८ एमएलडी पाणीपुरवठा योजना सुर्या प्रकल्पातून राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पातून शहराला पाणी देण्यास भाजपाचेच खासदार चिंतामण वनगा यांनी विरोध दर्शविला आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यातच हे पाणी एमएमआरडीएकडुन शहराच्या सीमेपर्यंतच आणले जाणार असल्याने ते केव्हा येईल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी मुख्यमंत्र्यांकडुनच या योजनेच्या भूमीपुजन कार्यक्रमात जाहिर करण्यात आला असला तरी त्यासाठी विविध सरकारी विभागांच्या काही महत्वांच्या परवानग्या अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे अंधांतरी असलेल्या या योजनेंतर्गत मिळणारे पाणी शहराच्या सीमेपासुन शहरात आणण्यासाठी सुमारे ४०० कोटींचा खर्च प्रशासनाकडुन गृहित धरण्यात आला आहे. प्रत्यक्षात पाणी शहराच्या सीमेवर आल्यानंतरच त्या निधीची आवश्यकता भासणार असल्याने तुर्तास नव्याने ८ टक्के पाणीपुरवठा लाभ कर लागू करण्यास स्थायीने दिलेली मान्यता अयोग्य असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी केला आहे. त्यामुळे पाणीपट्टीतील दरवाढीसह नवीन पाणीपुरवठा लाभ कर सत्ताधाय््राांनी त्वरीत मागे घ्यावा. अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMira Bhayanderमीरा-भाईंदर