शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणात डेंग्यूचा आणखी एक बळी'

By admin | Updated: October 24, 2016 02:06 IST

पावसाळा संपला तरी शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम असून पत्रीपूल भागातील कृष्णानगरमध्ये राहणाऱ्या अब्दुल मैनुद्दीन सय्यद यांचा डेंग्यूच्या आजाराने रविवारी सकाळी मृत्यू झाला.

कल्याण : पावसाळा संपला तरी शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम असून पत्रीपूल भागातील कृष्णानगरमध्ये राहणाऱ्या अब्दुल मैनुद्दीन सय्यद यांचा डेंग्यूच्या आजाराने रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.कल्याणच्या बैलबाजार परिसरात सीटमेकरचे काम करणाऱ्या सय्यद यांना पाच ते सहा दिवसांपासून ताप येत होता. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे निदान झाले. त्यात, त्यांची रविवारी प्राणज्योत मालवली. ऐन पावसाळ्यात साथीच्या आजारांचा कल्याण-डोंबिवली परिसरात प्रादुर्भाव होता. आताही आजारांचा प्रभाव कायम आहे. पावसाळा संपला तरी डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे सय्यद यांच्या मृत्यूने समोर आले आहे. साथीच्या वाढत्या आजारांबाबत नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात या आजारांच्या जनजागृतीसाठी केडीएमसीच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली होती. यात शहरातील मुख्य चौकांसह अन्य भागांमध्ये पत्रके वाटणे, गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी पथनाट्यांचे सादरीकरण करणे, अशा उपाययोजना करण्यात आल्या. परंतु, याची मात्रा लागू झाली नाही. दुसरीकडे पावसाळा संपल्यानंतरही साथीचा प्रादुर्भाव पाहता अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी बैठक घेऊन वैद्यकीय विभागांसह आरोग्य विभाग आणि अन्य विभागांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाहीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, याआधीही डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाले आहेत. परंतु, केडीएमसीच्या वतीने दरवेळेला नकारघंटा वाजवण्यात आली. एकीकडे जुलै-आॅगस्टमध्ये डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असताना केडीएमसीकडे मात्र डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २९ च्या आसपास होती. या वाढत्या साथीच्या आजारांवर महासभेत वारंवार लोकप्रतिनिधींकडून आवाज उठवण्यात आला. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर निर्बंध घाला, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, ठोस अंमलबजावणीअभावी त्या केवळ कागदावरच राहत असल्याचे वास्तव आहे.(प्रतिनिधी)