शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

ओडिसामधून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीतील आणखी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 00:50 IST

ओडिसामधून गांजाची तस्करी करणाºया टोळीतील श्रीकांत रावल सिंग (२२, रा. बेरौनवाडी, ओडिसा) या आणखी एकाला ठाणेनगर पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देठाणेनगर पोलिसांची कारवाईओडिसा पोलिसांची घेतली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ओडिसामधून गांजाची तस्करी करणाºया टोळीतील श्रीकांत रावल सिंग (२२, रा. बेरौनवाडी, ओडिसा) या आणखी एकाला ठाणेनगर पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यानेच रमेश बादई आणि दीपक जेना यांच्याकडे तीन लाख ५० हजारांचा ३५ किलो गांजा सोपविल्याचे चौकशीतून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे रेल्वे स्थानकाजवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी आणि उपनिरीक्षक अजित बडे यांच्या पथकाने २९ आॅगस्ट २०२१ रोजी रमेश आणि दीपक या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीतून ३५ किलोचा गांजाही जप्त केला होता. सखोल चौकशीमध्ये ओडिसा राज्यातून त्यांनी हा गांजा आणल्याची कबूली दिली. त्यांना ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. याच दोघांच्या चौकशीतून त्यांनी ओडिसा येथील श्रीकांत याच्याकडून हा गांजा आणल्याची कबूली दिली होती. त्याच आधारे बडे यांच्या पथकाने ओडिसा पोलिसांच्या मदतीने त्यालाही ३ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याला ६ सप्टेंबरपर्यंत ट्रान्सिस्ट रिमांड मिळाली होती. सोमवारी पुन्हा त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.* यापूर्वीही ठाणेनगर पोलिसांनी ओडिसातून गांजाची तस्करी करणाºया दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून २० किलोचा गांजा हस्तगत केला होता. आतापर्यंत ५५ किलोचा गांजा हस्तगत केला आहे. श्रीकांत याने ठाणे मुंबईमध्ये आणखी कोणाला गांजाची तस्करी केली, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी