शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

शहरातील अन्य भागांतील बेकायदा बांधकामेही तोडा;भाजपची आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 12:39 AM

गायींना ठेवण्यासाठी पालिकेने पर्यायी व्यवस्था करावी

मीरा रोड : महापालिकेने सोमवारी भार्इंदर पूर्वेतील आरएनपी पार्क भागात सीआरझेडमध्ये कांदळवनालगत झालेल्या भल्या मोठ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्यानंतर मंगळवारी भाजप नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. बेकायदा बांधकाम तोडले, त्याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही; पण गोवंश व त्यांचा चारा आदी बाहेर काढायला पुरेसा वेळ दिला पाहिजे होता, असे आयुक्तांना सांगतानाच शहरातील सीआरझेड बाधित झोपडपट्ट्या, चाळी, बंगले आदींवर तोडक कारवाई करा, अशी मागणी केल्याचे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी सांगितले.

भाजपचे जिल्हा सचिव आणि ज्येष्ठ कार्यकर्ते कमलाकर घरत यांच्यासह मनसे आदींनी आरएनपी पार्कच्या सीआरझेडमधील कांदळवनालगत काम सुरू असलेल्या बांधकामावर कारवाईसाठी तक्रारी केल्या होत्या. पालिकेने हे बांधकाम थांबवण्याचे बजावत याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला होता. सोमवारी पालिकेने सदर बांधकाम जमीनदोस्त केले.

बांधकाम तोडण्या वरुन भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता हे आयुक्तांच्या दालनात ठिय्या मारून होते.मंगळवारी भाजपच्या नगरसेवकांसह काही संस्थांचे प्रतिनिधी, विश्व हिंदू परिषद पदाधिकाऱ्यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेतली. विश्व हिंदू परिषद आणि काही संस्थांच्या पदाधिकाºयांनी यावेळी आयुक्तांना निवेदन दिले. उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्यासह परिवहन सभापती मंगेश पाटील, गटनेते हसमुख गेहलोत, नगरसेवक ध्रुवकशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, मुन्ना सिंह, अशोक तिवारी, डॉ. सुशील अग्रवाल, दिनेश जैन, अनिल विराणी, माजी नगरसेवक भगवती शर्मा व आसिफ शेख, नगरसेविका शानू गोहिल, वंदना पाटील, सुनीता भोईर उपस्थित होते.

बेकायदा बांधकाम तोडल्याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही, पण आतील जनावरांना तसेच चारा बाहेर काढण्यास वेळ दिला गेला नाही. जनावरे बिथरल्याने दोन गायींना इजा झाली. याप्रकरणी संबंधित जबाबदार अधिकाºयांवर कारवाई करा तसेच या गायींना ठेवण्यासाठी पालिकेने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केल्याचे ध्रुवकिशोर यांनी सांगितले. आयुक्तांनी कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले.

नयानगरमध्ये अनेक बेकायदा बांधकामे आहेत. भार्इंदरमध्ये गणेश देवलनगर, जय अंबेनगर, मुर्धा, राई, मोर्वा आणि हायवे पट्ट्यातही सीआरझेडमध्ये झोपडपट्ट्या, चाळी बांधण्याची कामे सुरू आहेत. उत्तन येथे बंगले बांधले जात आहेत. तिकडेही पालिकेने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे ध्रुवकिशोर पाटील यांनी केली आहे.

राजकीय द्वेषातून कारवाईचा आरोप

आरएनपी पार्क येथील गोशाळेवर केलेली कारवाई ही राजकीय द्वेषाने केलेली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नरेंद्र मेहता जोपर्यंत आमदार होते तोपर्यंत पालिकेने कारवाई केली नाही. निवडणुकीत मेहता हरल्यानंतर मात्र तोडक कारवाई केली हा राजकीय द्वेष म्हणायचा नाही तर काय? असा सवाल ध्रुवकिशोर यांनी केला. मेहतांचे निकटवर्तीय भगवती शर्मा यांनीही बेकायदा बांधकाम तोडले त्याचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. पण गायींना सुखरूप काढले पाहिजे होते. हा भाजपचा राजकीय मुद्दा नसल्याचे शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMNSमनसे