शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

गाठीशी असलेले सगळे पैसे संपलेत...तुम्हीच सांगा पोटाची खळगी कशी भरायची?

By जितेंद्र कालेकर | Updated: May 5, 2020 01:51 IST

जवळचे सर्व पैसे संपले. त्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून योग्य माहिती दिली जावी. तसेच यासाठी एक खिडकी योजनाही अमलात आणावी, अशी मागणीही या मजूरांनी केली आहे.

ठळक मुद्देशासकीय यंत्रणेतील समन्वयाअभावी ठाण्यात परप्रांतीय मजूरांचे हालअनेकांच्या पोलीस ठाण्याबाहेर रांगा

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गाठीशी असलेले दहा हजार रुपये गेल्या ४० दिवसांमध्ये संपले. आता रोजचा दिवस कसा काढायचा. पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस आणि महापालिका यांच्यातील योग्य समन्वयाअभावी तसेच योग्य माहिती न मिळाल्यामुळे अशा अनेक मजूरांचे हाल होत आहेत.माजीवडा भागात राहणारा श्रावणकुमार (३०) हा मुळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूरचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो स्टाईल बसविण्याचे नेताराम या ठेकेदाराकडे काम करतो. गावी आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. गाठीला जे दहा हजार रुपये होते. तेही आतापर्यंतच्या जेवणासाठी संपले. कोणी तरी अन्नदान करतो. पण त्यांच्या देण्याचा आणि देण्याच्या वेळेचा कोणताही भरवसा नाही. मग पोटातील भूकेची आग कशी विझवणार? असा रोजचा प्रश्न आहे. त्यासाठीच गावी जायचे आहे. पण त्यासाठीही डॉक्टरांना २५० ते ३०० रुपये मोजावे लागतायेत. पोलीस ठाणे, डॉक्टर आणि पुन्हा नगरसेवक यांच्याकडे फेऱ्या माराव्या लागताहेत. योग्य माहितीही कुठे मिळत नाही. जीव अगदी मुठीत आला आहे. हरीश चव्हाण (२२, रा. माजीवडा, ठाणे) हाही असाच एक स्टाईल कारागिर आहे. त्याचीही अशीच अवस्था असल्याचे त्याने सांगितले. सॅनिटायझरने हात धुणे सोडा, रोजच्या जगण्यासाठीच पैसे नाहीत. प्रत्येक गोष्टीची समस्या आहे. मग इथे राहण्यापेक्षा गोरखपूर (उत्तरप्रदेश) या आपल्या गावी जाणार आहे. पण पोलीस ठाण्यात अर्ज देण्याची, पुन्हा डॉक्टरकडे जाण्याची रांग मोठी असल्याने गेली दोन दिवस फेºया मारतोय. आता करायचे काय? पाणी पिऊन भूक भागवतोय, असेही त्याने सांगितले. गावी जाण्यासाठीचा जो अर्ज एका दुकानात दिला जातोय त्याची किंमतही ३० रुपये तर अन्य एका टोकनसाठी २० रुपये सोसावे लागतायेत. अशा वेळी तरी अशी लूटमार व्हायला नको, अशीही अपेक्षा त्याने व्यक्त केली. तर अन्य एका झारखंडच्या मजूरानेही अशीच तक्रार केली.* दरम्यान, पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून योग्य माहिती दिली जावी. तसेच यासाठी एक खिडकी योजनाही अमलात आणावी, अशी मागणीही या मजूरांनी केली आहे.* यासंदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, बाहेरगावी जाणा-याने तो कंटेनमेंट झोन मधील रहिवाशी नसल्याचे नगरसेवक किंवा प्रभाग अधिका-याचे प्रमाणपत्र आणावे. तसेच वैद्यकीय तपासणीचे नोंदणीकृत डॉक्टरकडून प्रमाणपत्र आणणे गरजेचे आहे. शिवाय, तो कोणत्या गाडीने कधी आणि किती जणांसोबत जाणार याचाही तपशील त्याने अर्जात उल्लेख करावा. सध्या तरी रेल्वेची सुविधा नाही. त्याने खासगी वाहन करणे अपेक्षित आहे. अर्जासाठी त्यांच्याकडून अतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. परिपूर्ण भरलेला एकही अर्ज अद्याप प्राप्त झाला नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेLabourकामगारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस