शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

गाठीशी असलेले सगळे पैसे संपलेत...तुम्हीच सांगा पोटाची खळगी कशी भरायची?

By जितेंद्र कालेकर | Updated: May 5, 2020 01:51 IST

जवळचे सर्व पैसे संपले. त्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून योग्य माहिती दिली जावी. तसेच यासाठी एक खिडकी योजनाही अमलात आणावी, अशी मागणीही या मजूरांनी केली आहे.

ठळक मुद्देशासकीय यंत्रणेतील समन्वयाअभावी ठाण्यात परप्रांतीय मजूरांचे हालअनेकांच्या पोलीस ठाण्याबाहेर रांगा

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गाठीशी असलेले दहा हजार रुपये गेल्या ४० दिवसांमध्ये संपले. आता रोजचा दिवस कसा काढायचा. पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस आणि महापालिका यांच्यातील योग्य समन्वयाअभावी तसेच योग्य माहिती न मिळाल्यामुळे अशा अनेक मजूरांचे हाल होत आहेत.माजीवडा भागात राहणारा श्रावणकुमार (३०) हा मुळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूरचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो स्टाईल बसविण्याचे नेताराम या ठेकेदाराकडे काम करतो. गावी आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. गाठीला जे दहा हजार रुपये होते. तेही आतापर्यंतच्या जेवणासाठी संपले. कोणी तरी अन्नदान करतो. पण त्यांच्या देण्याचा आणि देण्याच्या वेळेचा कोणताही भरवसा नाही. मग पोटातील भूकेची आग कशी विझवणार? असा रोजचा प्रश्न आहे. त्यासाठीच गावी जायचे आहे. पण त्यासाठीही डॉक्टरांना २५० ते ३०० रुपये मोजावे लागतायेत. पोलीस ठाणे, डॉक्टर आणि पुन्हा नगरसेवक यांच्याकडे फेऱ्या माराव्या लागताहेत. योग्य माहितीही कुठे मिळत नाही. जीव अगदी मुठीत आला आहे. हरीश चव्हाण (२२, रा. माजीवडा, ठाणे) हाही असाच एक स्टाईल कारागिर आहे. त्याचीही अशीच अवस्था असल्याचे त्याने सांगितले. सॅनिटायझरने हात धुणे सोडा, रोजच्या जगण्यासाठीच पैसे नाहीत. प्रत्येक गोष्टीची समस्या आहे. मग इथे राहण्यापेक्षा गोरखपूर (उत्तरप्रदेश) या आपल्या गावी जाणार आहे. पण पोलीस ठाण्यात अर्ज देण्याची, पुन्हा डॉक्टरकडे जाण्याची रांग मोठी असल्याने गेली दोन दिवस फेºया मारतोय. आता करायचे काय? पाणी पिऊन भूक भागवतोय, असेही त्याने सांगितले. गावी जाण्यासाठीचा जो अर्ज एका दुकानात दिला जातोय त्याची किंमतही ३० रुपये तर अन्य एका टोकनसाठी २० रुपये सोसावे लागतायेत. अशा वेळी तरी अशी लूटमार व्हायला नको, अशीही अपेक्षा त्याने व्यक्त केली. तर अन्य एका झारखंडच्या मजूरानेही अशीच तक्रार केली.* दरम्यान, पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून योग्य माहिती दिली जावी. तसेच यासाठी एक खिडकी योजनाही अमलात आणावी, अशी मागणीही या मजूरांनी केली आहे.* यासंदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, बाहेरगावी जाणा-याने तो कंटेनमेंट झोन मधील रहिवाशी नसल्याचे नगरसेवक किंवा प्रभाग अधिका-याचे प्रमाणपत्र आणावे. तसेच वैद्यकीय तपासणीचे नोंदणीकृत डॉक्टरकडून प्रमाणपत्र आणणे गरजेचे आहे. शिवाय, तो कोणत्या गाडीने कधी आणि किती जणांसोबत जाणार याचाही तपशील त्याने अर्जात उल्लेख करावा. सध्या तरी रेल्वेची सुविधा नाही. त्याने खासगी वाहन करणे अपेक्षित आहे. अर्जासाठी त्यांच्याकडून अतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. परिपूर्ण भरलेला एकही अर्ज अद्याप प्राप्त झाला नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेLabourकामगारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस