शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गाठीशी असलेले सगळे पैसे संपलेत...तुम्हीच सांगा पोटाची खळगी कशी भरायची?

By जितेंद्र कालेकर | Updated: May 5, 2020 01:51 IST

जवळचे सर्व पैसे संपले. त्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून योग्य माहिती दिली जावी. तसेच यासाठी एक खिडकी योजनाही अमलात आणावी, अशी मागणीही या मजूरांनी केली आहे.

ठळक मुद्देशासकीय यंत्रणेतील समन्वयाअभावी ठाण्यात परप्रांतीय मजूरांचे हालअनेकांच्या पोलीस ठाण्याबाहेर रांगा

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गाठीशी असलेले दहा हजार रुपये गेल्या ४० दिवसांमध्ये संपले. आता रोजचा दिवस कसा काढायचा. पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस आणि महापालिका यांच्यातील योग्य समन्वयाअभावी तसेच योग्य माहिती न मिळाल्यामुळे अशा अनेक मजूरांचे हाल होत आहेत.माजीवडा भागात राहणारा श्रावणकुमार (३०) हा मुळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूरचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो स्टाईल बसविण्याचे नेताराम या ठेकेदाराकडे काम करतो. गावी आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. गाठीला जे दहा हजार रुपये होते. तेही आतापर्यंतच्या जेवणासाठी संपले. कोणी तरी अन्नदान करतो. पण त्यांच्या देण्याचा आणि देण्याच्या वेळेचा कोणताही भरवसा नाही. मग पोटातील भूकेची आग कशी विझवणार? असा रोजचा प्रश्न आहे. त्यासाठीच गावी जायचे आहे. पण त्यासाठीही डॉक्टरांना २५० ते ३०० रुपये मोजावे लागतायेत. पोलीस ठाणे, डॉक्टर आणि पुन्हा नगरसेवक यांच्याकडे फेऱ्या माराव्या लागताहेत. योग्य माहितीही कुठे मिळत नाही. जीव अगदी मुठीत आला आहे. हरीश चव्हाण (२२, रा. माजीवडा, ठाणे) हाही असाच एक स्टाईल कारागिर आहे. त्याचीही अशीच अवस्था असल्याचे त्याने सांगितले. सॅनिटायझरने हात धुणे सोडा, रोजच्या जगण्यासाठीच पैसे नाहीत. प्रत्येक गोष्टीची समस्या आहे. मग इथे राहण्यापेक्षा गोरखपूर (उत्तरप्रदेश) या आपल्या गावी जाणार आहे. पण पोलीस ठाण्यात अर्ज देण्याची, पुन्हा डॉक्टरकडे जाण्याची रांग मोठी असल्याने गेली दोन दिवस फेºया मारतोय. आता करायचे काय? पाणी पिऊन भूक भागवतोय, असेही त्याने सांगितले. गावी जाण्यासाठीचा जो अर्ज एका दुकानात दिला जातोय त्याची किंमतही ३० रुपये तर अन्य एका टोकनसाठी २० रुपये सोसावे लागतायेत. अशा वेळी तरी अशी लूटमार व्हायला नको, अशीही अपेक्षा त्याने व्यक्त केली. तर अन्य एका झारखंडच्या मजूरानेही अशीच तक्रार केली.* दरम्यान, पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून योग्य माहिती दिली जावी. तसेच यासाठी एक खिडकी योजनाही अमलात आणावी, अशी मागणीही या मजूरांनी केली आहे.* यासंदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, बाहेरगावी जाणा-याने तो कंटेनमेंट झोन मधील रहिवाशी नसल्याचे नगरसेवक किंवा प्रभाग अधिका-याचे प्रमाणपत्र आणावे. तसेच वैद्यकीय तपासणीचे नोंदणीकृत डॉक्टरकडून प्रमाणपत्र आणणे गरजेचे आहे. शिवाय, तो कोणत्या गाडीने कधी आणि किती जणांसोबत जाणार याचाही तपशील त्याने अर्जात उल्लेख करावा. सध्या तरी रेल्वेची सुविधा नाही. त्याने खासगी वाहन करणे अपेक्षित आहे. अर्जासाठी त्यांच्याकडून अतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. परिपूर्ण भरलेला एकही अर्ज अद्याप प्राप्त झाला नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेLabourकामगारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस