शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

शेतीची कामे संपली, शेकडो नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 5:23 AM

शेतीची कामे संपली : चरितार्थासाठी वीटभट्टी, शेतावर, हॉटेलमध्ये जाण्यास सुरुवात

मुरबाड : पावसाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांकडे काही काम नसल्याने तसेच शासनाच्या विविध विभागांची कामे सुरू न झाल्याने रोजगारासाठी शेकडो ग्रामस्थ, आदिवासी तसेच शेतमजूर कुटुंबांसह स्थलांतर करू लागले आहेत. ग्रामीण भागात पावसाळ्यात शेतीची कामे असतात. त्यानंतर, भातकापणी आणि झोडणी अशी कामे असतात. परंतु, दिवाळी झाल्यानंतर काहीच काम नसल्याने ग्रामस्थ, शेतमजूर तसेच आदिवासी हे आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आळेफाटा, जुन्नर, पुणे, ओतूर, बेल्हे, घोडेगाव, नाशिक, मंचर, नगर आदी ठिकाणी कांदा, भाजीपाला लागवड करण्यासाठी तसेच हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी जातात. रोज सकाळी टोकावडे, मोरोशी, सावर्णे, धसई येथून हे आदिवासी, शेतमजूर जीप, ट्रक, टेम्पो अशा मिळेल त्या वाहनांतून धोकादायक परिस्थितीत प्रवास करून जातात.

मजुरांना मागेल ते काम मिळावे, म्हणून शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू केली आहे. ग्रामपंचायतीमध्ये मजुरांनी काम मागायचे असते. त्याप्रमाणे शासनाचे विविध विभाग मनरेगाअंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू करते. या प्रक्रियेत काही ना काही वेळजातोच.मात्र, एवढा वेळ ग्रामस्थ, शेतमजूर तसेच आदिवासी थांबू शकत नाहीत. किंबहुना, तेवढे दिवस रोजगार तसेच आर्थिक पाठबळ नसल्याने आपल्या कुटुंबाला उपाशी ठेवू शकत नाही. पर्यायाने नाइलाजास्तव पावसाळा संपल्यावर हे मजूर लगेच रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात. मनरेगाची कामेही काही ठेकेदार यांत्रिक पद्धतीने करताना दिसतात. त्यामुळेही मजुरांच्या हाताला काम नसल्याने ग्रामीण शेतमजूर कामाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत.शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी, बांधकाम, पाटबंधारे आणि वनविभागाने पावसाळा जाऊन एक महिना लोटला, तरी कामे सुरू झाली नसल्याने हे ग्रामस्थ, शेतमजूर, आदिवासी कुटुंबाच्या चरितार्थासाठी कामाच्या शोधात वीटभट्टी, शेतावर तसेच हॉटेलमध्ये कामासाठी स्थलांतरित होत आहेत. या स्थलांतरामुळे लोकांची रोजगाराची सोय होणार आहे.मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीररोजगारासाठी शेकडो आदिवासी, शेतमजूर, ग्रामस्थ स्थलांतरित होत असल्याने त्यांच्याबरोबर त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होताना दिसतो. शेतावर किंवा वीटभट्टीवर काम करणाºया मजुरांना मुले शाळेत कुठे टाकायची व त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, हा प्रश्न या मजुरांना पडतो.आदिवासी, शेतमजुरांचे आरोग्य धोक्यातस्थलांतरित झालेले आदिवासी, शेतमजूर हे कामाच्या ठिकाणीच राहत असल्याने त्यांच्यासोबतच्या लहान मुलांच्या आरोग्याबाबतच्या समस्या तशाच राहतात. त्यांना आरोग्यसुविधा वेळेवर मिळत नसल्याने विविध प्रकारचे आजार जडत आहेत.मजुरांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्याकडे कामाची मागणी केल्यास आम्ही त्वरित काम देऊ.- दोडके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुरबाड 

टॅग्स :MumbaiमुंबईFarmerशेतकरी