शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना मिळाले केवळ एक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 03:43 IST

नगर परिषद व महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलेले उत्तनचे लिओ कोलासो यांनी शहराच्या नियोजन समिती सभापतीपासून अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मच्छीमारांचे नेते म्हणून ते सक्रिय आहेत.

- लिओ कोलासोनगर परिषद व महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलेले उत्तनचे लिओ कोलासो यांनी शहराच्या नियोजन समिती सभापतीपासून अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मच्छीमारांचे नेते म्हणून ते सक्रिय आहेत. पूर्वीच्या निवडणुकांचा काळ कसा होता, हे सांगताना वयाच्या ७० व्या वर्षात पदार्पण केलेल्या कोलासो यांच्यात एक वेगळाच उत्साह जाणवला.उत्तन म्हणजे पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला. त्याकाळी गावातील लोकांना दुसरा पक्षच चालत नव्हता. मी चौथीमध्ये शिकत असताना मामा सरपंच होते. निवडणूक काळात शाळा सुटली की, मामा मतदार यादी लिहून काढायला सांगत. झेरॉक्स नसल्याने त्याच्या प्रती तयार करायला कार्बन पेपर वापरला जायचा. हात काळे व्हायचे. यादी बनवून आणि वाटून झाली की, चहा आणि खाजा मिळायचा.सध्याचा उत्तननाका व देना बँक येथील चौकात निवडणुकीच्या प्रचार सभा व्हायच्या. अनेक राजकीय सभा येथे झाल्या. गावातील गल्लीबोळांतून प्रचाराची मोठी रॅली घोषणा देत निघायची.कार्यकर्त्यांमध्ये जसा उत्साह असायचा, तसाच उत्साह मतदारांमध्ये पण असायचा. सभेतील भाषणं ऐकायला लहानांपासून मोठे सर्व झाडून यायचे. आतासारखी भाड्याची माणसं व कार्यकर्त्यांची गर्दी जमवावी लागायची नाही. मतदानाच्या दिवशी चहापाण्याचा खर्च काय व्हायचा तोच.त्याकाळी कृष्णा मेनन हे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून निवडून यायचे. ते देशाचे संरक्षणमंत्री होते. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ते काँग्रेस सोडून अपक्ष म्हणून उभे राहिले होते. स.गो. बर्वे यांची बहीण ताराताई सप्रे काँग्रेसच्या उमेदवार होत्या. उत्तन गावातून मेनन यांना फक्त एकच मत मिळालं होतं. ते मत कोणाचं होतं, हे अख्ख्या गावाला कळलं होतं.भारत सरकारची त्याकाळी आकाशवाणी योजना होती. ग्रामपंचायत कार्यालयात रेडिओ सेट द्यायचे. गावात त्या रेडिओला मोठा भोंगा लावायचे. त्याचे लोकांना खूप कुतूहल होते. तीच एक करमणूक असायची. सकाळपासून दुपारपर्यंत आणि पुन्हा सायंकाळी गाणी आदी लागायचे. बातम्या असायच्या. निवडणुकीच्या काळात तर रेडिओवरच्या बातम्या ऐकण्यासाठी मुख्य चौकात गर्दी जमायची.एका निवडणुकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले उत्तन येथे प्रचारसभेसाठी येणार होते. गावातला रस्ता खराब. नवघरचे मोरेश्वर पाटील हे बांधकाम समिती सभापती होते. मग काय, रातोरात त्यांनी धावाधाव करून रस्ता ठीकठाक करण्यासाठी दगडखडी टाकून घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या गाड्या आल्या, त्यावेळी रस्त्यासाठी टाकलेल्या त्या दगडखडीचा उडालेला धुरळा आजही आठवतो.अधिकाऱ्यांना मेजवाणीगावात एकच हॉटेल होतं. निवडणुकीसाठी अधिकारी यायचे. मग, ग्रामस्थ मोठ्या आपुलकीने जेवणाची सोय करायचे. माशाचे कालवण, भाकऱ्या, सुक्या बोंबलाची चटणी असे कोळी पद्धतीचे जेवण म्हणजे आठवणीत राहणारी मेजवानीच असायची.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक