शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

अदानी कंपनीने वीज दरवाढ मागे घ्यावी; काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:21 PM

१५ डिसेंबरचे अल्टिमेटम, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

भाईंदर : मीरा-भाईंदरला वीजपुरवठा करणारी तत्कालिन रिलायन्स एनर्जी ही कंपनी ताब्यात घेताच अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीने वीजदरात तब्बल १८ टक्के वाढ केली. ही दरवाढ बेकायदा असल्याचा दावा करत ती त्वरित मागे घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ती १५ डिसेंबरपर्यंत मान्य न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला आहे.दर चार वर्षांनी वीज नियामक आयोगाकडून पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दरवाढ करण्यास परवानगी दिली जाते. त्याचा दर ०.२५ टक्के इतका अपेक्षित असतो. परंतु, त्यात यंदा भरमसाठ वाढ करून ग्राहकाच्या माथी अव्वाच्यासवा वाढीव दराचे वीज बिल दिल्याचे सावंत यांनी सांगितले.पूर्वी शहराला रिलायन्स एनर्जी कंपनीकडून वीजपुरवठा केला जात होता. ही कंपनी अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लिमिटेड या कंपनीने आॅगस्ट २०१८ मध्ये ताब्यात घेतली. यानंतर कंपनीने वीज दरात सरसकट १८ टक्के वाढ करून ग्राहकांच्या माथी वाढीव दराची बिले मारली आहेत. यामुळे ग्राहक त्रस्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.कंपनीने केलेली वीजदरवाढ बेकायदा असून ती वीज नियामक आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. दरवाढ मागे घेऊन वीज नियामक आयोगाच्या परवानगीनेच ती लागू करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. ही दरवाढ मागे घेण्यासाठी सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अदानी इलेक्ट्रीसिटीच्या भार्इंदर येथील उत्तर विभागीय कार्यालयातील अधिकाºयांची मंगळवारी भेट घेत त्यांना निवेदन दिले.ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी २४ तास हेल्पलाईन सुरूयाबाबत कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विजेंद्र भावसार यांनी सांगितले की, तत्कालिन रिलायन्स एनर्जी कंपनीने २२ डिसेंबर २०१७ रोजी आयोगाकडे वीजदरवाढीची याचिका दाखल केली होती. त्यावर २ आॅगस्ट २०१८ रोजी सुनावणी होऊन आयोगाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. २८ आॅगस्ट रोजी ही कंपनी अदानी इलेक्ट्रीसिटीने ताब्यात घेतल्यानंतर आयोगाने १२ सप्टेंबरला दरवाढीचा निर्णय दिला.तो १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला. त्यातच आॅक्टोबर हिटमुळे वीजवापर वाढल्याने शुल्क वाढले. त्यानुसारच ग्राहकांना बिले दिली असून त्यात दरवाढीपेक्षा जास्त तफावत असल्यास ती पुढील बिलातून आपोआप वळती केली जाते. याबाबत ग्राहकांचे शंका निरासन करण्यासाठी कंपनीने १५ डिसेंबरपर्यंत शिबिरांचे आयोजन केले असून २४ तास हेल्पलाईनसुद्धा सुरू केली आहे.

टॅग्स :electricityवीजbhayandarभाइंदरcongressकाँग्रेस