शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
4
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
5
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
6
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
7
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
8
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
9
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
10
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
11
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
12
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
13
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
14
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
15
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
16
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
19
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
20
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

चिखलोलीतून पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 19, 2016 00:44 IST

चिखलोली धरणातून दररोज १०० पेक्षा अधिक टँकर पाणी चोरले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार

अंबरनाथ : चिखलोली धरणातून दररोज १०० पेक्षा अधिक टँकर पाणी चोरले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. ते मिळताच या टँकरवर, पाणीचोरांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित असतानाही धरणाच्या मागील परिसरातून काही टँकरमाफिया कोणतीही परवानगी न घेता पाणी चोरत होते. एवढेच नव्हे, तर टँकर भरण्यासाठी धरणाच्या पात्रात पंपही बसवण्यात आले होते. दररोज १०० पेक्षा अधिक टँकर भरून बाहेर पाण्याची विक्री-काळाबाजार सुरू होता.
कोणीच कारवाई करीत नसल्याने बदलापूर आणि उल्हासनगरहूनही अनेक टँकर येथे पाणी भरण्यासाठी येत होते. यासंदर्भात गुरुवारी ‘लोकमत’मध्ये छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध होताच जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी तत्काळ मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. मुख्याधिकारी गणेश देशमुख आणि तहसीलदार प्रशांत जोशी हे धरणाच्या ठिकाणी कारवाईसाठी गेले.
मात्र, ‘लोकमत’मधील बातमीनंतर घाबरगुंडी उडालेल्या टँकरमाफियांनी येथे टँकर भरण्याचे काम थांबवल्याचे दिसून आले. कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना तेथे एकही टँकर सापडला नाही. अखेर धरणात बसवलेले पंप जप्त करण्यात आले. तसेच धरणात कोणताही टँकर जाऊ नये, यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला. कारवाईदरम्यान एकही टँकर सापडला नसला तरी बातमीमुळे टँकरमाफियांमध्ये घबराट उडाली.
(प्रतिनिधी)