शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

साडेतीन महिने महासभा न झाल्याने विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:22 AM

भाजपची महापौरांवर टीका : पत्राद्वारे केली सभा घेण्याची मागणी

ठाणे : राज्यात सत्तासोपानावरून शिवसेना-भाजपात जुंपली असताना इकडे ठाणे महापालिकेतही युतीत वाद रंगला आहे. यात भाजपाने शिवसेनेला लक्ष केले असून गेल्या साडेतीन महिन्यापासून महासभा न घेणाऱ्या महापौरांवर टीकास्त्र सोडले आहे. साडेतीन महिने महासभा न झाल्याने विकासकामांचे अनेक प्रस्ताव रखडल्याने त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला असून हा ठाणेकरांवर अन्याय असल्याचा आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीची प्रक्रि या संपुष्टात आल्यानंतरही, ठाणे महापालिकेच्या महासभेची तारीख जाहीर न करणे हे न उलगडणारे कोडे आहे, अशा शब्दांत ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर शरसंधान केले आहे. महापौरांना महासभा बोलाविण्याचा अधिकार असूनही, या दिरंगाईमुळे सामान्य ठाणेकरांचे हित साधणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यांनी मंगळवारी एका पत्राद्वारे महापौरांकडे महासभा घेण्याची मागणी केली. या पत्रात गेल्या साडेतीन महिन्यांपासून महासभा घेण्यात न आल्याकडे लक्ष वेधले आहे त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये विशेष महासभा घेण्याच्या भाजपाच्या मागणीचाही उल्लेख केला आहे.

महापालिकेची शेवटची महासभा २० आॅगस्ट रोजी झाली होती. तत्पूर्वी १९ जुलै रोजीची महासभा तहकूब करण्यात आली. महासभा रखडल्यामुळे भाजपाने सप्टेंबर महिन्यात विशेष महासभा घेण्याबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत काहीही निर्णय घेण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या साडेतीन महिन्यांत महासभा घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट होते. आचारसंहितेचा काळ वगळता महासभा का घेतली नाही, हे माझ्यासह भाजपा नगरसेवकांना एक न उलगडणारे कोडे आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.२०१९-२० च्या अर्थसंकल्पातील निधीतून घेण्यात येणारी कामे अद्यापी सुरू करण्यात आलेली नाहीत. यंदाच्या आर्थिक वर्षातील सात महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला असून, संपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी दिरंगाई होण्याची शक्यता आहे. ठाणेकरांच्या दृष्टीकोनातून अनेक प्रश्न रखडले असून, सभेच्या पटलावर अनेक विषय प्रलंबित आहेत. या विषयांवर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अशा दिरंगाईमुळे सामान्य ठाणेकरांचे हित साधणारे नाही, अशा शब्दांत त्यांनी महापौरांना टोला लगावला.आचारसंहिता नसतानाही दिरंगाई : पवारविधानसभेच्या निवडणुकांची प्रक्रि या संपुष्टात आली असून, राज्यभरात आचारसंहिता उठविण्यात आली. गेल्या महिनाभराहून अधिक काळ आचारसंहितेमुळे प्रशासनावरील बंधने संपली. त्यामुळे महापालिकेचा कारभार गतिमान होण्यासाठी तातडीने महासभा घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यानंतरही ती जाहीर करण्याबाबत दिरंगाई का केली जाते, असा सवाल महापालिकेतील नारायण पवार यांनी केला.

टॅग्स :thaneठाणे