शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अबकडचे धडे, पण नदी पलिकडे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वावी वर्षात चिमुकल्यांचा धोकादायक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 21:14 IST

भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे.

विशाल हळदे - 

ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यात एक तर सुका दुष्काळ, नाही तर ओला दुष्काळ पहायला मिळतो. आपण नुकताच भारतिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केले. हर घर तिरंगाच्या घोषणा दिल्या गेल्या आणि तिरंगा घेऊन प्रभात फेऱ्या काढल्या गेल्या. असे असताना आज ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्याच्या गुंडे ग्रामपंचायतीत असणाऱ्या भितारवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जंगलातून 3 किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून येताना पहायला मिळाले. भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे. या वाड्यातील विद्यार्थ्यांची पसंती याच शाळेला आणि येथील शिक्षकांना आहे. 27 जणांची पटसंख्या असलेल्या या शाळेत भितारवाडी आणि कोठेवाडी येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी आपला जिव धोक्यात घालून मधे असलेली नदी ओलांडून यावे लागते. मुख्य म्हणजे ऐन पावसाळ्यात नदी ओलांडावी लागत असल्याने मुलांची शाळेला सुट्टी होत आहे आणि खरच अभ्यासू असणारी ही मूलं शिक्षणा पासून वंचित रहात आहेत. 

जोरदार पाऊस आला की डोंगर भागातून येणाऱ्या पावसाने नदीच्या पात्रात वाढ होते आणि पाणी वहाते असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतो. पावसाने उसंत घेतल्यानंतरच मुलाना शाळेत हजेरी लावता येते, असे पालकांकडून सांगण्यात आले.

एकीकडे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे केले, तरीही येथील विद्यार्थी आणि येथील लोकांना रस्ता, पुल, निदान साकव या सुविधा नसल्यामुळ शिक्षण आणि रोजगार यांपासून त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे आज दिसून आले. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे आणि योग्य सुविधा व्हाव्यात या साठी पालकानी वेळो-वेळी लक्ष वेधले मात्र प्रशासनान त्याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला खंड पडल्याचे जाणवले. या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका आणि पालकानी केली आहे.

या वाड्यांमधे 400 जनांची लोकसंख्या आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येण्यासाठी स्वतः मी नदीवर जातो नदित उतरून मी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येतो आणि शाळा सुटली की पुन्हा नदीच्या काठावर नेऊन सोडतो. माझ्यासोबत पालक देखील असतात. गेल्या कित्येक वर्षापासून आमचा असाच प्रवास सुरु आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक अतुल बडे यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणSchoolशाळाriverनदी