शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

अबकडचे धडे, पण नदी पलिकडे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वावी वर्षात चिमुकल्यांचा धोकादायक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 21:14 IST

भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे.

विशाल हळदे - 

ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यात एक तर सुका दुष्काळ, नाही तर ओला दुष्काळ पहायला मिळतो. आपण नुकताच भारतिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केले. हर घर तिरंगाच्या घोषणा दिल्या गेल्या आणि तिरंगा घेऊन प्रभात फेऱ्या काढल्या गेल्या. असे असताना आज ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्याच्या गुंडे ग्रामपंचायतीत असणाऱ्या भितारवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जंगलातून 3 किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून येताना पहायला मिळाले. भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे. या वाड्यातील विद्यार्थ्यांची पसंती याच शाळेला आणि येथील शिक्षकांना आहे. 27 जणांची पटसंख्या असलेल्या या शाळेत भितारवाडी आणि कोठेवाडी येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी आपला जिव धोक्यात घालून मधे असलेली नदी ओलांडून यावे लागते. मुख्य म्हणजे ऐन पावसाळ्यात नदी ओलांडावी लागत असल्याने मुलांची शाळेला सुट्टी होत आहे आणि खरच अभ्यासू असणारी ही मूलं शिक्षणा पासून वंचित रहात आहेत. 

जोरदार पाऊस आला की डोंगर भागातून येणाऱ्या पावसाने नदीच्या पात्रात वाढ होते आणि पाणी वहाते असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतो. पावसाने उसंत घेतल्यानंतरच मुलाना शाळेत हजेरी लावता येते, असे पालकांकडून सांगण्यात आले.

एकीकडे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे केले, तरीही येथील विद्यार्थी आणि येथील लोकांना रस्ता, पुल, निदान साकव या सुविधा नसल्यामुळ शिक्षण आणि रोजगार यांपासून त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे आज दिसून आले. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे आणि योग्य सुविधा व्हाव्यात या साठी पालकानी वेळो-वेळी लक्ष वेधले मात्र प्रशासनान त्याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला खंड पडल्याचे जाणवले. या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका आणि पालकानी केली आहे.

या वाड्यांमधे 400 जनांची लोकसंख्या आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येण्यासाठी स्वतः मी नदीवर जातो नदित उतरून मी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येतो आणि शाळा सुटली की पुन्हा नदीच्या काठावर नेऊन सोडतो. माझ्यासोबत पालक देखील असतात. गेल्या कित्येक वर्षापासून आमचा असाच प्रवास सुरु आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक अतुल बडे यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणSchoolशाळाriverनदी