शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

आधारवाडी डम्पिंगला लागली आग, धुरामुळे कल्याणमधील नागरिकांची घुसमट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:14 IST

स्थायी समितीच्या बैठकीतही या आगीचे पडसाद उमटले.

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला बुधवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्यासाठी महापालिकेने तीन अग्निशमनचे तीन बंब पाठवले होते; मात्र तीन तास प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नव्हती. ही आग धुमसत असल्याने परिसरात सर्वत्र धुराचे लोट उसळून नागरिकांची घुसमट झाली. स्थायी समितीच्या बैठकीतही या आगीचे पडसाद उमटले.आधारवाडी डम्पिंगच्या कचऱ्याला बुधवारी पुन्हा आग लागली, तेव्हा महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती दालनात बैठक सुरू होती. यावेळी डम्पिंगच्या आगीबाबत सदस्य विचारणा करत असून प्रशासनाने त्याची माहिती द्यावी, अशी सभापती विकास म्हात्रे यांनी प्रशासनाला सूचना केली. भाजप सदस्य वरुण पाटील यांनी आग कशी लागली, असा सवाल केला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आॅगस्टीन घुटे यांनी कचºयाला दरवर्षी आग लागते. मिथेन वायू तयार झाल्याने कचºयाला आग लागते, तर काही वेळेस अनोळखी व्यक्ती आग लावतात. तसेच तेथे सुरक्षारक्षक नेमलेले असल्याची माहिती दिली. त्यावर सदस्यांनी उपाययोजना करूनही आग का लागते, याचाच अर्थ डम्पिंगला आग लागू नये, यासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश सभापती म्हात्रे यांनी प्रशासनास दिले. उपायुक्त मारुती खोडके म्हणाले की, डम्पिंगचा कचरा पांगवला जातो. तेथे सुरक्षारक्षकही आहे; मात्र हा कचरा उघडाच आहे. एखादी रिक्त असलेली दगडखाण पाहून तेथे हा कचरा हलवण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.आधारवाडी डम्पिंगवर महापालिका हद्दीतून गोळा होणारा ६४० टन कचरा टाकला जातो. तेथे कचºयाचा २५ मीटर उंचीचा कचºयाचा ढीग लागला आहे. जेसीबीच्या साहाय्याने हा कचरा रोज पसरवला जातो. कचºयामध्ये मिथेन गॅस तयार होऊन तो सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आला तर आग लागत असल्याचा अंदाज महापालिका प्रशासन व्यक्त करते. मात्र, या कचºयाला कोणी आग लावत आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न महापालिकेने कधीच केला नाही. तीन सुरक्षारक्षकही असूनही आगीचे प्रकार घडत आहेत.उंबर्डे, बारावे प्रकल्पांना विरोधआधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी महापालिकेकडून उंबर्डे व बारावे येथे प्रकल्प राबवले जात आहेत. उंबर्डे प्रकल्प बांधून तयार असून तेथे प्रक्रिया करण्यास स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर यांचा विरोध आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील अन्य सदस्यांचाही कल्याण पश्चिमेत कचराप्रक्रिया करण्यास विरोध आहे. शहरातील अन्य ठिकाणीही कचरा प्रकल्प राबवण्याची मागणी नुकत्याच झालेल्या महासभेत केली होती.

टॅग्स :kalyanकल्याण