शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

लेखक सगळ्यात जास्त लिहायलाच घाबरतो - गीतकार स्वानंद किरकिरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 11:59 IST

"भगतसिंग, गांधी यांचे विचार पुन्हा पुन्हा मांडावेच लागतील"

ठाणे : लेखक सगळ्यात जास्त घाबरतो ते लिहायला. त्याचे सगळ्यात शेवटचे काम म्हणून तो लिखाण करतो. त्याच्याआधी तो लिखाणापासून जितका पळायचा प्रयत्न करता येईल, तितका करतो आणि जेव्हा अगदीच गळ्याशी येते की, आता सांगितल्याशिवाय राहणार नाही, अशी वेळ येते तेव्हाच तो लेखनातून व्यक्त होतो, अशी लेखनप्रक्रियेची अनुभूती ख्यातनाम गीतकार स्वानंद किरकिरे यांनी उलगडली. लोकमतसाहित्य पुरस्कार सोहळ्यात अपर्णा पाडगावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

गाणे, संगीत, नाटक, चित्रपट यातील आजवरचा प्रवास कसा समृद्ध होत गेला, हे किरकिरे यांनी यावेळी विविध किश्श्यांमधून सांगितले. त्याचवेळी बावरा मनचे सूर छेडत त्यांनी रसिकांच्या काळजाचा ठावही घेतला. भगतसिंग यांच्याविषयीचे प्रेम सांगताना त्यांनी सध्याच्या काळात भगतसिंग आणि गांधीजी यांच्यावर पुनःपुन्हा बोलावेच लागेल, त्यांचे विचार पुन्हा पुन्हा मांडावेच लागतील, अशी परखड भूमिकाही मांडली. किरकिरे म्हणाले, लिखाण करणे सोपे नाही. कुठून तरी आतून आल्याशिवाय लेखक लिहायला बसत नाही. त्यामुळेच लेखक सगळ्यात जास्त घाबरतो लिहायला, असे माझे मत आहे. या जगात एकच दुवा आहे, ज्याने आपल्याला जोडून ठेवलेले आहे आणि ते आहे प्रेम... बाकी काहीही नाही. जीवनावर, लोकांवर प्रेम करणे याच्या व्यतिरिक्त आणखी काहीही काम नसू शकते. काही तरी करा आणि नका भांडू रे, असे आर्जव करताना ते म्हणाले की, किती भेद आहेत, तरी त्यांना एकत्र बांधू शकेल, अशी एकमेव कला आहे. म्हणून कलेची जागा आपल्या जगण्यात आहे.

'ते' नाटक आता केले तर...एनएसडीमधून पास आउट झालो तेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे पन्नासावे वर्ष होते. त्यावेळी मी भगतसिंगांवर नाटक करणार होतो. त्या नाटकाचे नाव मी एक सपना असे ठेवले होते. आज जर मी ते केले, तर मला जोड्यानेच मारतील. कारण त्याची सुरुवात अशी होती की, भारतमाता कॅटवॉक करतेय... आम्ही सरकारच्या पैशाने सरकारच्या विरोधात बोलू शकत होतो, असा तो काळ होता. आता तशी स्थिती नाही. तो मेड इन इंडियाचा, जागतिकीकरणाचा नवा काळ होता. सगळ्याच गोष्टी मॉडर्न करून टाकल्या होत्या. टीव्ही नावाची वस्तू आली होती, त्यातून सरकारविषयी फक्त चांगलेच बोलले जात होते. खरे काही कुणी बोलतच नव्हते. त्यातून त्या नाटकाची मांडणी केली होती.

कुणी ना कुणी हीरो आपले करून घेण्याचा हा काळभगतसिंग हेच प्रेम आहे, हे सांगताना किरकिरे म्हणाले की, भगतसिंग याच्या मृत्यूनंतर सगळ्या विचारसरणी त्याला आपल्याकडे खेचत होत्या. उजवे आणि डावे दोघेही भगतसिंग आमचाच असे म्हणत होते आणि सगळ्या लोकांना कुणी ना कुणी हीरो आपले करून घ्यायचे असतात. आपल्या काळात आपण हे पाहतोच आहोत. कुठलाही हीरो असो, तो आपला करून घ्यायचा, त्याच्याबद्दल आपण बोलायला लागायचे, अगदी तसे भगतसिंगबाबत झाले.

किरकिरे यांनी भगतसिंग यांचे शेर सादर केले -उसे ये फिक्र है की हरदम नया तर्जे दफा क्या हैहमे ये शौक है की इस सितम की इम्तिहां क्या हैजहर से क्यूं खफा रहे, चर्ख का क्यूं गिला करेसारा जहाँ उदू सही आओ मुकाबला करेहवा मे रहेगी मेरे खयाल की खुशबूयू इश्तेफाक है पानी रहे रहे ना रहे...

हवेत माझे विचार राहतील, हे शरीर राहिले नाही राहिले तरी काय? असे विचार मांडणारा भगतसिंग मला खूप वर्षे आयुष्यात पुरून उरला, असे सांगून किरकिरे म्हणाले की, मला पुन्हा भगतसिंग करायला खूप आवडेल. भगतसिंगवर, गांधींवर पुन्हा पुन्हा बोलावेच लागेल. कारण, ती काळाची गरज आहे.

टॅग्स :literatureसाहित्यthaneठाणेLokmatलोकमत