शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लेखक सगळ्यात जास्त लिहायलाच घाबरतो - गीतकार स्वानंद किरकिरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 11:59 IST

"भगतसिंग, गांधी यांचे विचार पुन्हा पुन्हा मांडावेच लागतील"

ठाणे : लेखक सगळ्यात जास्त घाबरतो ते लिहायला. त्याचे सगळ्यात शेवटचे काम म्हणून तो लिखाण करतो. त्याच्याआधी तो लिखाणापासून जितका पळायचा प्रयत्न करता येईल, तितका करतो आणि जेव्हा अगदीच गळ्याशी येते की, आता सांगितल्याशिवाय राहणार नाही, अशी वेळ येते तेव्हाच तो लेखनातून व्यक्त होतो, अशी लेखनप्रक्रियेची अनुभूती ख्यातनाम गीतकार स्वानंद किरकिरे यांनी उलगडली. लोकमतसाहित्य पुरस्कार सोहळ्यात अपर्णा पाडगावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

गाणे, संगीत, नाटक, चित्रपट यातील आजवरचा प्रवास कसा समृद्ध होत गेला, हे किरकिरे यांनी यावेळी विविध किश्श्यांमधून सांगितले. त्याचवेळी बावरा मनचे सूर छेडत त्यांनी रसिकांच्या काळजाचा ठावही घेतला. भगतसिंग यांच्याविषयीचे प्रेम सांगताना त्यांनी सध्याच्या काळात भगतसिंग आणि गांधीजी यांच्यावर पुनःपुन्हा बोलावेच लागेल, त्यांचे विचार पुन्हा पुन्हा मांडावेच लागतील, अशी परखड भूमिकाही मांडली. किरकिरे म्हणाले, लिखाण करणे सोपे नाही. कुठून तरी आतून आल्याशिवाय लेखक लिहायला बसत नाही. त्यामुळेच लेखक सगळ्यात जास्त घाबरतो लिहायला, असे माझे मत आहे. या जगात एकच दुवा आहे, ज्याने आपल्याला जोडून ठेवलेले आहे आणि ते आहे प्रेम... बाकी काहीही नाही. जीवनावर, लोकांवर प्रेम करणे याच्या व्यतिरिक्त आणखी काहीही काम नसू शकते. काही तरी करा आणि नका भांडू रे, असे आर्जव करताना ते म्हणाले की, किती भेद आहेत, तरी त्यांना एकत्र बांधू शकेल, अशी एकमेव कला आहे. म्हणून कलेची जागा आपल्या जगण्यात आहे.

'ते' नाटक आता केले तर...एनएसडीमधून पास आउट झालो तेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे पन्नासावे वर्ष होते. त्यावेळी मी भगतसिंगांवर नाटक करणार होतो. त्या नाटकाचे नाव मी एक सपना असे ठेवले होते. आज जर मी ते केले, तर मला जोड्यानेच मारतील. कारण त्याची सुरुवात अशी होती की, भारतमाता कॅटवॉक करतेय... आम्ही सरकारच्या पैशाने सरकारच्या विरोधात बोलू शकत होतो, असा तो काळ होता. आता तशी स्थिती नाही. तो मेड इन इंडियाचा, जागतिकीकरणाचा नवा काळ होता. सगळ्याच गोष्टी मॉडर्न करून टाकल्या होत्या. टीव्ही नावाची वस्तू आली होती, त्यातून सरकारविषयी फक्त चांगलेच बोलले जात होते. खरे काही कुणी बोलतच नव्हते. त्यातून त्या नाटकाची मांडणी केली होती.

कुणी ना कुणी हीरो आपले करून घेण्याचा हा काळभगतसिंग हेच प्रेम आहे, हे सांगताना किरकिरे म्हणाले की, भगतसिंग याच्या मृत्यूनंतर सगळ्या विचारसरणी त्याला आपल्याकडे खेचत होत्या. उजवे आणि डावे दोघेही भगतसिंग आमचाच असे म्हणत होते आणि सगळ्या लोकांना कुणी ना कुणी हीरो आपले करून घ्यायचे असतात. आपल्या काळात आपण हे पाहतोच आहोत. कुठलाही हीरो असो, तो आपला करून घ्यायचा, त्याच्याबद्दल आपण बोलायला लागायचे, अगदी तसे भगतसिंगबाबत झाले.

किरकिरे यांनी भगतसिंग यांचे शेर सादर केले -उसे ये फिक्र है की हरदम नया तर्जे दफा क्या हैहमे ये शौक है की इस सितम की इम्तिहां क्या हैजहर से क्यूं खफा रहे, चर्ख का क्यूं गिला करेसारा जहाँ उदू सही आओ मुकाबला करेहवा मे रहेगी मेरे खयाल की खुशबूयू इश्तेफाक है पानी रहे रहे ना रहे...

हवेत माझे विचार राहतील, हे शरीर राहिले नाही राहिले तरी काय? असे विचार मांडणारा भगतसिंग मला खूप वर्षे आयुष्यात पुरून उरला, असे सांगून किरकिरे म्हणाले की, मला पुन्हा भगतसिंग करायला खूप आवडेल. भगतसिंगवर, गांधींवर पुन्हा पुन्हा बोलावेच लागेल. कारण, ती काळाची गरज आहे.

टॅग्स :literatureसाहित्यthaneठाणेLokmatलोकमत