शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

... त्यांच्यावर गुन्हा नोंदवलाच पाहिजे; फोटो शेअर करत आव्हाडांचा तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 08:32 IST

ठाणे महानगरपालिकेने सुशोभिकरणाच्या नावाखाली रायलादेवी तलावातील सगळं पाणी काढून टाकलं

ठाणे - प्राणी, पक्ष्यांबद्दल सर्वांनाच संवेदना आणि प्रेमही असतं. त्यामुळे, घरातील पाळीव प्राण्यांना आपण कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो. तर, निसर्गाच्या सानिध्यात वास्तव करणाऱ्या पशू, पक्ष्याचंही आकर्षण आपल्याला असतं. त्यामुळे, या वन्य जीवांसोबत काही क्षण व्यतीत करताना आपणास आनंद होतो. मात्र, प्रशासनाच्या चुकीमुळे जर वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असेल तर ही गंभीर बाब आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या याच कृत्याकडे लक्ष वेधले आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तलावातील अनेक मासे आणि दुर्मिळ कासव मृत्युमुखी पडल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय. 

ठाणे महानगरपालिकेने सुशोभिकरणाच्या नावाखाली रायलादेवी तलावातील सगळं पाणी काढून टाकलं. कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय सल्ला न घेता त्यांनी हे केल्यामुळे, पाणी काढल्यानंतर त्यामधील सगळे मासे मृत्युमुखी पडले. काही विशिष्ट जातीचे कासव, जे जगामध्ये काही भागांमध्येच शिल्लक राहीले आहेत. अशी कासवे सुद्धा मृत अवस्थेत आढळल्याचे सांगत आव्हाड यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटोही शेअर केले आहेत.  ज्यांनी हे केले आहे त्यांच्यावर वन्यजीवन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. या प्राण्यांचा जीव घेणे ह्याचे उत्तर तरी विचारावं लागेल. कुठलाही शास्त्रीय सल्ला न घेता ठाणे महानगरपालिकेला हा शहाणपणा करायला सांगितला होता कोणी? हे जग फक्त माणसांसाठीच नाहीये, प्राण्यांसाठी सुद्धा आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही माणसं मारता. पण प्राणी तर मारु नका, असे म्हणत आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना व सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलंय.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका