शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

... त्यांच्यावर गुन्हा नोंदवलाच पाहिजे; फोटो शेअर करत आव्हाडांचा तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 08:32 IST

ठाणे महानगरपालिकेने सुशोभिकरणाच्या नावाखाली रायलादेवी तलावातील सगळं पाणी काढून टाकलं

ठाणे - प्राणी, पक्ष्यांबद्दल सर्वांनाच संवेदना आणि प्रेमही असतं. त्यामुळे, घरातील पाळीव प्राण्यांना आपण कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो. तर, निसर्गाच्या सानिध्यात वास्तव करणाऱ्या पशू, पक्ष्याचंही आकर्षण आपल्याला असतं. त्यामुळे, या वन्य जीवांसोबत काही क्षण व्यतीत करताना आपणास आनंद होतो. मात्र, प्रशासनाच्या चुकीमुळे जर वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असेल तर ही गंभीर बाब आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या याच कृत्याकडे लक्ष वेधले आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तलावातील अनेक मासे आणि दुर्मिळ कासव मृत्युमुखी पडल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय. 

ठाणे महानगरपालिकेने सुशोभिकरणाच्या नावाखाली रायलादेवी तलावातील सगळं पाणी काढून टाकलं. कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय सल्ला न घेता त्यांनी हे केल्यामुळे, पाणी काढल्यानंतर त्यामधील सगळे मासे मृत्युमुखी पडले. काही विशिष्ट जातीचे कासव, जे जगामध्ये काही भागांमध्येच शिल्लक राहीले आहेत. अशी कासवे सुद्धा मृत अवस्थेत आढळल्याचे सांगत आव्हाड यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटोही शेअर केले आहेत.  ज्यांनी हे केले आहे त्यांच्यावर वन्यजीवन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. या प्राण्यांचा जीव घेणे ह्याचे उत्तर तरी विचारावं लागेल. कुठलाही शास्त्रीय सल्ला न घेता ठाणे महानगरपालिकेला हा शहाणपणा करायला सांगितला होता कोणी? हे जग फक्त माणसांसाठीच नाहीये, प्राण्यांसाठी सुद्धा आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही माणसं मारता. पण प्राणी तर मारु नका, असे म्हणत आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना व सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलंय.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका