शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

६७ हजार ५७४ कुटुंबांना घरात नळाने पाण्याची प्रतीक्षा, ‘जलजीवन मिशन’मधील कामे कूर्मगतीने, हंडे घेऊन आणावे लागते पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 05:58 IST

Water News: ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही योजना गेल्या सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. परंतु योजनेच्या कूर्मगतीमुळे आजही ६७ हजार ५७४ घरगुती नळजोडण्या देणे बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.  

 ठाणे -  ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही योजना गेल्या सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. परंतु योजनेच्या कूर्मगतीमुळे आजही ६७ हजार ५७४ घरगुती नळजोडण्या देणे बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.              

ठाणे जिल्ह्यात या योजनेंतर्गत २०२४ अखेरपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरांत नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. योजनेंतर्गत ७२० कामे हाती घेण्यात आली. यामध्ये ४२० रेट्रोफिटिंग व ३०० नवीन योजनांचा समावेश होता. यासाठी ७१५६ कोटींचा आरखडा तयार केला. मात्र, योजनेची गती मंद असल्याने आजही ६७ हजार ५७४  घरांमध्ये नळजोडणी देणे शिल्लक आहे. 

पाण्यासाठी पायपीटठाणे ग्रामीण भागातील गाव-पाड्यांमधील महिला व मुलींना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. विहीर तसेच बोअरवेलवर जाऊन डोक्यावर हंडे, कळशा घेऊन पाणी आणावे लागते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जलजीवन मिशन योजना राबविण्याच्या सूचना केल्या. झेडपीला देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी ७४.१४ टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून यापैकी काही मोठ्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कामांचे उद्दिष्टे पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अशी झाली नळजोडणी जिल्ह्यात २०१९ मध्ये ग्रामीण भागात २ लाख ३४ हजार ६१२ कुटुंब होती. त्यापैकी ६६ हजार ७५ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली. सध्याच्या घडीला ग्रामीण कुटुंबांच्या संख्येत वाढ होऊन ती २ लाख ६१ हजार २७१ वर पोहोचली. जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाईची दाहकता ओळखून या योजनेला गती देत, १ लाख ९३ हजार ६९७ कुटुंबाना घरगुती नळजोडणी दिल्याचा दावा केला. 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातthaneठाणे