शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

६७ हजार ५७४ कुटुंबांना घरात नळाने पाण्याची प्रतीक्षा, ‘जलजीवन मिशन’मधील कामे कूर्मगतीने, हंडे घेऊन आणावे लागते पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 05:58 IST

Water News: ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही योजना गेल्या सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. परंतु योजनेच्या कूर्मगतीमुळे आजही ६७ हजार ५७४ घरगुती नळजोडण्या देणे बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.  

 ठाणे -  ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही योजना गेल्या सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. परंतु योजनेच्या कूर्मगतीमुळे आजही ६७ हजार ५७४ घरगुती नळजोडण्या देणे बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.              

ठाणे जिल्ह्यात या योजनेंतर्गत २०२४ अखेरपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरांत नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. योजनेंतर्गत ७२० कामे हाती घेण्यात आली. यामध्ये ४२० रेट्रोफिटिंग व ३०० नवीन योजनांचा समावेश होता. यासाठी ७१५६ कोटींचा आरखडा तयार केला. मात्र, योजनेची गती मंद असल्याने आजही ६७ हजार ५७४  घरांमध्ये नळजोडणी देणे शिल्लक आहे. 

पाण्यासाठी पायपीटठाणे ग्रामीण भागातील गाव-पाड्यांमधील महिला व मुलींना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. विहीर तसेच बोअरवेलवर जाऊन डोक्यावर हंडे, कळशा घेऊन पाणी आणावे लागते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जलजीवन मिशन योजना राबविण्याच्या सूचना केल्या. झेडपीला देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी ७४.१४ टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून यापैकी काही मोठ्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कामांचे उद्दिष्टे पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अशी झाली नळजोडणी जिल्ह्यात २०१९ मध्ये ग्रामीण भागात २ लाख ३४ हजार ६१२ कुटुंब होती. त्यापैकी ६६ हजार ७५ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली. सध्याच्या घडीला ग्रामीण कुटुंबांच्या संख्येत वाढ होऊन ती २ लाख ६१ हजार २७१ वर पोहोचली. जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाईची दाहकता ओळखून या योजनेला गती देत, १ लाख ९३ हजार ६९७ कुटुंबाना घरगुती नळजोडणी दिल्याचा दावा केला. 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातthaneठाणे