शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

चार महिन्यांत ३२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:49 PM

शासकीय यंत्रणेकडून मात्र आजारांचे कारण : ९७७ कुपोषित बालकेही आढळली

सुरेश लोखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत ० ते ६ वर्षांपर्यंतच्या ३२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मात्र, शासकीय यंत्रणांनी नेहमीप्रमाणे विविध आजारांच्या चक्र व्यूहात अडकल्याने या बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. शिवाय ९७७ कुपोषित बालकांसह तीव्र कमी वजनाची व कमी वजनाची ९९०७ बालके आढळली आहेत.

देशभरात श्रीकृष्णजन्माचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच या मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या परिवारात मात्र दु:ख व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील मृत्युमुखी पडलेल्या बालकांचा शोध घेतला असता तब्बल ३२ बालके आदिवासी, दुर्गम, गावपाड्यांत दगावल्याचे निदर्शनात आले. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये १११ बालकांचा तर २०१७ मध्ये ११६ बालकांचा आणि २०१६ या वर्षांत तब्बल १४० बालके दगावली आहेत. या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण अत्यल्प असून अवघी ३२ बालके चार महिन्यांच्या कालावधीत दगावल्याचे येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे यांनी सांगितले. गावपाड्यांमध्ये विविध उपाययोजना सातत्याने राबवत असल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य झाल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण हे दोन तालुके वगळता एप्रिल ते जुलैअखेर शहापूर तालुक्यात सर्वाधिक १७ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुरबाडला आठ आणि भिवंडी तालुक्यात सात बालके दगावली आहेत. या ० ते ६ वयोगटांतील ३२ बालकांमध्ये कमी वजनाच्या दोन बालकांचा तर कमी दिवसाच्या तीन बालकांचादेखील समावेश आहे. याशिवाय जन्मत: व्यंग, हायपो थर्मिया आणि जन्मता कावीळ या आजारांचे प्रत्येक एक बालक दगावले आहे. तर, न्यूमोनियामुळे तीन आणि अ‍ॅस्पेक्शियाच्या सात बालकांचा मृत्यू झाला आहे. इतरमध्ये सर्वाधिक आठ बालके दगावल्याची नोंद आहे. तर सेप्टीसिमिया, अतिज्वर, अपघात, ड्रावनिंग, सर्पदंश आणि न्यूमोनिया यांच्यामुळे प्रत्येकी एक बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

यंदाच्या या बालमृत्यूप्रमाणेच २०१६ ला १४० बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यानंतर हे प्रमाण कमी होऊन २०१७-१८ ला ११६ बालकांचे दगावली. यामध्ये ० ते १ या वयोगटातील ९६ तर १ ते ५ वर्षांच्या २० बालकांचा दारी-अंगणी रांगण्याच्या, खेळण्याच्या कालावधीत मृत्यू झाला. २०१८-१९ मध्ये १ ते ५ वयोगटामधील १५ बालकांचा मृत्यू झाला असून ० ते १ वर्षाच्या ९६ बालके या कालावधीत दगावले आहेत. या तुलनेत यंदा एप्रिल ते जुलै या कालावधीत अवघी ३२ बालके दगावली आहेत. बालमृत्यूचे हे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी, ग्रामीण व दुर्गम भागात विविध उपाययोजना व औषधोपचार सातत्याने केला जात असल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे डॉ. रेघे यांच्याकडून सांगितले जात आहे.