शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भिवंडीत 16 गोदामे जळून खाक, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 12:12 IST

सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली.

भिवंडी : सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अग्निप्रतिबंधक साधने नसल्याने सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आग पसरत गेली. त्यातील प्लॅस्टिक आणि इतर साहित्याचा विषारी धूर यामुळे वातावरण प्रदूषित झाले. सात तासांच्या अथक परिश्रमानंतर संध्याकाळी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यात जीवितहानी झाली नाही.

मुंबई-नाशिक मार्गाजवळच्या ओवळी गावाच्या हद्दीत सागर कॉम्प्लेक्समधील चेक पॉइंट या गोदामाला बुधवारी सकाळी १०च्या सुमारास आग लागली. वाºयामुळे तिचा धोका वाढत गेला. एकेक करत सायंकाळपर्यंत १६ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. या भागांत अनेक गोदाम असून, बºयाच ठिकाणी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही. आज लागलेल्या आगीमुळे येथील गोदाम व कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जीवितहानी नाही : गोदामे जळून खाक झाल्याने शेकडो कामगार बेरोजगार झाल्याची माहिती कामगारांनी दिली. आगीमुळे परिसरात विषारी धूर पसरला होता. धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडथळा येत होता. वाºयामुळे धूर महामार्गावर येत असल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. आग विझविण्यासाठी भिवंडीसोबतच ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर येथून बंब मागविण्यात आले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

राजकीय आशीर्वादाचा फटकाया परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे आहेत. परवानगी न घेता, त्यात माल साठविला जातो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे, ती तोडण्याचे आणि जमिनी मोकळ्या करण्याचे प्रयत्न तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुरू केले होते. मात्र, गोदाम मालकांनी राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबविली. त्याचा फटका मोठ्या लोकसंख्येला बसला. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभागासह अन्य सरकारी खात्यांचे आता या गोदामांवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे तेथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. विषारी वायूमुळे परिसरातील गावकरी आणि कामगारांचा जीव धोक्यात आला आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी