शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत 16 गोदामे जळून खाक, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 12:12 IST

सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली.

भिवंडी : सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अग्निप्रतिबंधक साधने नसल्याने सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आग पसरत गेली. त्यातील प्लॅस्टिक आणि इतर साहित्याचा विषारी धूर यामुळे वातावरण प्रदूषित झाले. सात तासांच्या अथक परिश्रमानंतर संध्याकाळी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यात जीवितहानी झाली नाही.

मुंबई-नाशिक मार्गाजवळच्या ओवळी गावाच्या हद्दीत सागर कॉम्प्लेक्समधील चेक पॉइंट या गोदामाला बुधवारी सकाळी १०च्या सुमारास आग लागली. वाºयामुळे तिचा धोका वाढत गेला. एकेक करत सायंकाळपर्यंत १६ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. या भागांत अनेक गोदाम असून, बºयाच ठिकाणी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही. आज लागलेल्या आगीमुळे येथील गोदाम व कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जीवितहानी नाही : गोदामे जळून खाक झाल्याने शेकडो कामगार बेरोजगार झाल्याची माहिती कामगारांनी दिली. आगीमुळे परिसरात विषारी धूर पसरला होता. धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडथळा येत होता. वाºयामुळे धूर महामार्गावर येत असल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. आग विझविण्यासाठी भिवंडीसोबतच ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर येथून बंब मागविण्यात आले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

राजकीय आशीर्वादाचा फटकाया परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे आहेत. परवानगी न घेता, त्यात माल साठविला जातो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे, ती तोडण्याचे आणि जमिनी मोकळ्या करण्याचे प्रयत्न तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुरू केले होते. मात्र, गोदाम मालकांनी राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबविली. त्याचा फटका मोठ्या लोकसंख्येला बसला. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभागासह अन्य सरकारी खात्यांचे आता या गोदामांवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे तेथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. विषारी वायूमुळे परिसरातील गावकरी आणि कामगारांचा जीव धोक्यात आला आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी