शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

भिवंडीत 16 गोदामे जळून खाक, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 12:12 IST

सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली.

भिवंडी : सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अग्निप्रतिबंधक साधने नसल्याने सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आग पसरत गेली. त्यातील प्लॅस्टिक आणि इतर साहित्याचा विषारी धूर यामुळे वातावरण प्रदूषित झाले. सात तासांच्या अथक परिश्रमानंतर संध्याकाळी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यात जीवितहानी झाली नाही.

मुंबई-नाशिक मार्गाजवळच्या ओवळी गावाच्या हद्दीत सागर कॉम्प्लेक्समधील चेक पॉइंट या गोदामाला बुधवारी सकाळी १०च्या सुमारास आग लागली. वाºयामुळे तिचा धोका वाढत गेला. एकेक करत सायंकाळपर्यंत १६ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. या भागांत अनेक गोदाम असून, बºयाच ठिकाणी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही. आज लागलेल्या आगीमुळे येथील गोदाम व कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जीवितहानी नाही : गोदामे जळून खाक झाल्याने शेकडो कामगार बेरोजगार झाल्याची माहिती कामगारांनी दिली. आगीमुळे परिसरात विषारी धूर पसरला होता. धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडथळा येत होता. वाºयामुळे धूर महामार्गावर येत असल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. आग विझविण्यासाठी भिवंडीसोबतच ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर येथून बंब मागविण्यात आले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

राजकीय आशीर्वादाचा फटकाया परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे आहेत. परवानगी न घेता, त्यात माल साठविला जातो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे, ती तोडण्याचे आणि जमिनी मोकळ्या करण्याचे प्रयत्न तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुरू केले होते. मात्र, गोदाम मालकांनी राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबविली. त्याचा फटका मोठ्या लोकसंख्येला बसला. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभागासह अन्य सरकारी खात्यांचे आता या गोदामांवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे तेथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. विषारी वायूमुळे परिसरातील गावकरी आणि कामगारांचा जीव धोक्यात आला आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी