शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

... तर WhatsApp भारतातून गाशा गुंडाळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 10:41 AM

भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक असून व्हॉट्सअ‍ॅपचे 20 कोटी युजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रस्तावित नियमांमध्ये मेसेजसचा शोध घेणे ही सर्वात मोठी समस्या आहे.  

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. मात्र भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. बुधवारी (6 फेब्रुवारी) कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. 

भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक असून व्हॉट्सअ‍ॅपचे 20 कोटी युजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कंपनीचे जगभरात एकूण 1.5 अब्ज युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रस्तावित नियमांमध्ये मेसेजसचा शोध घेणे ही सर्वात मोठी समस्या आहे.  तसेच स्त्रोताचा उगम शोधण्यावर भर देण्याबाबत प्रस्तावित नियमांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअ‍ॅप मूलभूतरित्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते. याचा अर्थ पाठवणारा आणि प्राप्त करणारा हे दोघेच मेसेज वाचू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपलाही ते मेसेज वाचता येत नाहीत. तसेच जगभरातील लोकांना जी गोपनीयता हवी आहे, ती प्रस्तावित बदलाला अनुरूप नाही. आम्ही एंड-टू-एंड एनक्रिप्शन पुरवतो. पण नव्या नियमानुसार व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बदल करावे लागणार अशा स्थितीत मेसेज सेवा आपल्या सध्याच्या रूपात देता येणार नाही, असे वूग यांनी सांगितले.

WhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का?नवे नियम लागू झाल्यानंतर भारतीय बाजारातून बाहेर पडण्याची शक्यता वूग यांनी  फेटाळली नाही. एंड-टू-एंड एनक्रिप्शन फिचरमुळे तपास यंत्रणांना अफवा पसरवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. सोशल मीडिया प्लॅटफार्मसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्तावित नियमाअंतर्गत त्याच्या सेवांचा दुरूपयोग आणि हिंसा पसरवणाऱ्यांपासून रोखण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल. 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपIndiaभारतtechnologyतंत्रज्ञान