शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

टेकटॉक : गुगल, फेसबुक मुकाट्याने पैसे टाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 08:40 IST

जगाच्या एका टोकावरची बातमी अवघ्या काही सेकंदांत आणि एका माऊसच्या क्लिकवरती जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचू लागली आहे.

- प्रसाद ताम्हणकर

गेल्या काही वर्षांत टेक कंपन्यांनी मानवी आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान बनवले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातून जगभरातील अब्जावधी लोक एकमेकांशी जोडले तर गेलेच; पण संपूर्ण जगाचेच एका लहानशा खेड्यात रूपांतर झाले आहे. जगाच्या एका टोकावरची बातमी अवघ्या काही सेकंदांत आणि एका माऊसच्या क्लिकवरती जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचू लागली आहे. जुने मित्र शोधणे असो, स्वत:चे विचार, भावना सहजतेने व्यक्त करणे असो वा स्वत:च्या एखाद्या छोट्या-मोठ्या व्यवसायाची जाहिरात करणे असो; टेक कंपन्यांनी सर्वांसाठी एक वेगळे विश्व मोकळे करून दिले आहे. 

मात्र हे चित्र कितीही सुखदायक दिसत असले, तरी ह्या टेक कंपन्यांची मुजोरी, ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीशी त्यांनी चालवलेले खेळ, कोणत्याही देशाच्या कायद्यांना झुगारण्याची वृत्ती ह्यामुळे ह्या कंपन्या गेल्या काही काळापासून अनेक देशांच्या सरकारच्या रडारावरती आलेल्या आहेत. फेसबुक, ट्विटरसारखी माध्यमे जगभरातील अनेक राजकारणी, सरकारी प्रवक्ते, उद्योजक, अनेक सरकारी संस्था नागरिकांशी संवादासाठी वापरत आहेत. ह्या सर्व सोशल माध्यमांचे महत्त्व वादातीत असले, तरी आता कुठेतरी त्यांच्यावरती लगाम लावणे आवश्यक असल्याचे मत सर्वच प्रमुख देशांतील सरकारांना वाटू लागले आहे. 

ह्या सर्व कंपन्यांवरचा प्रमुख आक्षेप म्हणजे, गुगल, फेसबुक, ॲमेझॉनसारख्या दिग्गज टेक कंपन्या जगभरातील अनेक देशांमध्ये व्यवसायाच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवत आहेत; मात्र त्या त्या देशाला ह्या नफ्यातील काही हिस्सा देण्यास मात्र  ठामपणे नकार देत असतात. जगातील काही प्रमुख देशांत ह्यासंदर्भात विविध टेक कंपन्यांवरती खटले चालू आहेत. 

ह्याचेच पुढचे पाऊल म्हणजे ‘जी-७’ ह्या प्रमुख विकसित देशांच्या संघटनेने, आता आपापल्या देशात ह्या टेक कंपन्यांवरती १५% कर आकारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतानेही ह्या कंपन्यांभोवती नियम आणि अटींचे फास आवळण्यास सुरुवात केलेली आहेच. ‘कंपनी राज’ची सुरुवात पुन्हा सुरू होणे कोणत्याही देशाच्या लोकशाहीसाठी किती घातक आहे, हे आता ह्या प्रमुख देशांच्या लक्षात येऊ लागले आहे, हे महत्त्वाचे. 

(prasad.tamhankar@gmail.com)

टॅग्स :googleगुगलFacebookफेसबुक