शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

टेकटॉक : गुगल, फेसबुक मुकाट्याने पैसे टाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 08:40 IST

जगाच्या एका टोकावरची बातमी अवघ्या काही सेकंदांत आणि एका माऊसच्या क्लिकवरती जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचू लागली आहे.

- प्रसाद ताम्हणकर

गेल्या काही वर्षांत टेक कंपन्यांनी मानवी आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान बनवले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातून जगभरातील अब्जावधी लोक एकमेकांशी जोडले तर गेलेच; पण संपूर्ण जगाचेच एका लहानशा खेड्यात रूपांतर झाले आहे. जगाच्या एका टोकावरची बातमी अवघ्या काही सेकंदांत आणि एका माऊसच्या क्लिकवरती जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचू लागली आहे. जुने मित्र शोधणे असो, स्वत:चे विचार, भावना सहजतेने व्यक्त करणे असो वा स्वत:च्या एखाद्या छोट्या-मोठ्या व्यवसायाची जाहिरात करणे असो; टेक कंपन्यांनी सर्वांसाठी एक वेगळे विश्व मोकळे करून दिले आहे. 

मात्र हे चित्र कितीही सुखदायक दिसत असले, तरी ह्या टेक कंपन्यांची मुजोरी, ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीशी त्यांनी चालवलेले खेळ, कोणत्याही देशाच्या कायद्यांना झुगारण्याची वृत्ती ह्यामुळे ह्या कंपन्या गेल्या काही काळापासून अनेक देशांच्या सरकारच्या रडारावरती आलेल्या आहेत. फेसबुक, ट्विटरसारखी माध्यमे जगभरातील अनेक राजकारणी, सरकारी प्रवक्ते, उद्योजक, अनेक सरकारी संस्था नागरिकांशी संवादासाठी वापरत आहेत. ह्या सर्व सोशल माध्यमांचे महत्त्व वादातीत असले, तरी आता कुठेतरी त्यांच्यावरती लगाम लावणे आवश्यक असल्याचे मत सर्वच प्रमुख देशांतील सरकारांना वाटू लागले आहे. 

ह्या सर्व कंपन्यांवरचा प्रमुख आक्षेप म्हणजे, गुगल, फेसबुक, ॲमेझॉनसारख्या दिग्गज टेक कंपन्या जगभरातील अनेक देशांमध्ये व्यवसायाच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवत आहेत; मात्र त्या त्या देशाला ह्या नफ्यातील काही हिस्सा देण्यास मात्र  ठामपणे नकार देत असतात. जगातील काही प्रमुख देशांत ह्यासंदर्भात विविध टेक कंपन्यांवरती खटले चालू आहेत. 

ह्याचेच पुढचे पाऊल म्हणजे ‘जी-७’ ह्या प्रमुख विकसित देशांच्या संघटनेने, आता आपापल्या देशात ह्या टेक कंपन्यांवरती १५% कर आकारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतानेही ह्या कंपन्यांभोवती नियम आणि अटींचे फास आवळण्यास सुरुवात केलेली आहेच. ‘कंपनी राज’ची सुरुवात पुन्हा सुरू होणे कोणत्याही देशाच्या लोकशाहीसाठी किती घातक आहे, हे आता ह्या प्रमुख देशांच्या लक्षात येऊ लागले आहे, हे महत्त्वाचे. 

(prasad.tamhankar@gmail.com)

टॅग्स :googleगुगलFacebookफेसबुक