शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिम कार्डबाबत अनेक नियम बदलले, चुकीच्या पद्धतीन कार्ड घेतल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:07 IST

टेलिकॉम उद्योगाने सिम कार्डशी संबंधित अनेक बदल केले आहेत. हे बदल महत्वाचे आहेत. सायबर फसवणूक रोखण्यासाठी हे नवीन बदल लागू करण्यात आले आहेत.

सिम कार्डबाबत अनेक नियम बदलले आहेत. सिम कार्ड वैध असणे खूप महत्वाचे आहे, तुमचे सिम कार्ड जर सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला काही रिचार्ज करावे लागतात.  आता सायबर फसवणूक रोखण्यासाठी सिम कार्डबाबत नवीन नियम बदलण्यात आले आहेत. 

BSNL ने खाजगी कंपन्यांची उडवली झोप, 'या' तीन प्लॅनमुळे कोट्यवधी युजर्सची मजा! 

आता नवीन सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी आधारद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करणे अनिवार्य झाले आहे. सरकारने सिम कार्ड विक्रीसाठी किरकोळ विक्रेत्यांसाठी नवीन नियम देखील जारी केले आहेत. आता किरकोळ विक्रेत्यांना ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच सिम कार्ड विकावे लागतील. ग्राहकाच्या नावावर किती सिम कार्ड कनेक्शन आहेत हे तपासणे आवश्यक आहे. तसेच, जर ग्राहकाने वेगवेगळ्या नावांनी सिम कार्ड घेतले असतील तर त्यांचीही आता चौकशी केली जाईल. यासोबतच, ग्राहकाचा फोटोही १० वेगवेगळ्या कोनातून काढावा लागेल.

दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती त्यांच्या आधार कार्डचा वापर करून फक्त ९ सिम खरेदी करू शकतात. ९ पेक्षा जास्त सिम कार्ड बाळगल्यास पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्याला ५०,००० रुपये आणि पुन्हा गुन्हा करणाऱ्याला २ लाख रुपये दंड आकारला जाईल.

बेकायदेशीर मार्गाने सिम कार्ड मिळवल्यास ५० लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. तुमच्या आधार कार्डला किती सिम लिंक आहेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही सिम वापरत नसाल तर तुम्ही ते डिस्कनेक्ट करू शकता.

आधार लिंकची माहिती ठेवावी लागेल

तुमच्या आधारशी किती सिम कार्ड लिंक आहेत याची माहिती ठेवा आणि तुम्ही वापरत नसलेले नंबर ताबडतोब अनलिंक करा. तुम्ही हे काम काही सेकंदात करू शकता.

आधार नंबरवरुन या पद्धतीने तपासा

यासाठी आधी तुम्हाला Sancharsathi.gov.in वर जावे लागेल.

 आता मोबाईल कनेक्शन पर्यायावर क्लिक करा.

आता तुमचा संपर्क क्रमांक यामध्ये भरा .

यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. यानंतर, आधार क्रमांकाशी संबंधित सर्व क्रमांक वेबसाइटवर दिसतील.

यानंतर तुम्ही वापरात नसलेल्या किंवा तुम्हाला गरज नसलेल्या नंबरची तक्रार करू शकता आणि ब्लॉक करू शकता.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान