शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 8:04 AM

देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे.

नवी दिल्ली : देशात दहशतवादी घुसवून, हल्ले करून भारतीय सेना बधत नसल्याने पाकिस्तान आणि चीनने वेगवेगळ्या कुरापती सुरुच ठेवल्या आहेत. भारताच्या सैन्यदलावर शुक्रवारी रात्री उशिरा हॅकर्सनी सायबर हल्ला केला आहे. यामुळे सावध झालेल्या सैन्यदलाने आपत्कालीन स्थिती घोषित केली असून कोणताही मेल उघडताना त्यावर नोटीस असे शिर्षक असल्यास उघडू नये असे आदेशच जारी केले आहे. शनिवारी ही सूचना देण्यात आली आहे. 

हा आपत्कालीन अलर्ट तिन्ही सैन्यदलांना देण्यात आला असून एचएनक्यू नोटिस फाइल.एक्सएलएस या हायपरलिंकसोबत फिशिंग मेल सैन्य दलातील जवानांना पाठविण्यात येत आहेत. हे मेल 'पीआरवीआयएनएवायएके.598के@जीओवी.आयएन' या ईमेल आयडीवरून पाठविण्यात येत आहेत, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे. 

इनबॉक्समध्ये हा मेल आल्यास तो उघडून नये. अशा प्रकारच्या मेलपासून सावध रहा आणि त्याची तक्रार करा तसेच तो मेल डिलीट करावा, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे. 

देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे. सरकारनेही सैन्यदलासाठी सायबर एजन्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या एजन्सीचे काम चीन आणि पाकिस्तानातून होणाऱ्या सायबर हल्ल्यांना रोखणे आणि परतवून लावण्याचे असणार आहे, असे सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या सायबर हल्ल्यामागे नवीन ट्रेंड दिसत आहे. पाकिस्तानी गुप्तहेर भारतीय सैन्याच्या जवानांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी दुसऱ्या देशांचा वापर करत आहेत. अनेक प्रकरणांत हे गुप्तहेर दुसऱ्या देशांचे सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगून भारतीय सेनेच्या तंत्रज्ञान प्रणालीमध्ये घुसलेले आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

पाकिस्तानचा मूळ उद्देश हा भारतीय सैन्याच्या हालचाली, विविध भागांतील तैनाती आणि माजी सैनिकांची माहिती गोळा करणे हा आहे. 2016 मध्ये सायबर हल्लेखोरांनी भारताची स्कॉर्पिन पाणबुडीची माहिती असणारी हजारो फाईल चोरली होती. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदलcyber crimeसायबर क्राइमPakistanपाकिस्तानchinaचीन