शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: प्रजासत्ताक मूल्यांतून कृत्रिम बुद्धिमत्तेकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:53 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: ग्रामीण भागातील तरुणही ऑनलाइन कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल कोर्सेस आणि स्टार्टअप परिसंस्थेमुळे स्पर्धा करू शकतात.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा केवळ संविधान स्वीकारल्याचा ऐतिहासिक दिवस नाही, तर भारताच्या लोकशाही मूल्यांचा, नागरिकांच्या हक्क-कर्तव्यांचा आणि भविष्यातील दिशेचा उत्सव आहे. आजच्या डिजिटल युगात या सर्वांचा थेट संबंध एआयशी जोडला गेला आहे. विशेषतः भारतीय तरुण या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत. संविधान निर्मात्यांनी नागरिकांना मूलभूत हक्क दिले आणि त्याच बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे कर्तव्यही अधोरेखित केले. त्या काळी एआय अस्तित्वात नसली तरी ज्ञान, संशोधन, विवेक आणि नवोन्मेष यांना महत्त्व देण्यात आले. आज कृत्रिम बुद्धिमत्ता ही त्या दूरदृष्टीची आधुनिक साकार रूप आहे. ग्रामीण भागातील तरुणही ऑनलाइन कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल कोर्सेस आणि स्टार्टअप परिसंस्थेमुळे स्पर्धा करू शकतात.

आव्हाने

मात्र या संधींसोबत आव्हानेही आहेत. कौशल्यातील दरी, बेरोजगारीची भीती, चुकीची माहिती, डिजिटल व्यसन, गोपनीयतेचे प्रश्न आणि नैतिकतेचा अभाव ही आजची वास्तव समस्या आहे. एआयचा गैरवापर समाजात असमानता वाढवू शकतो, म्हणूनच येथे नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची ठरते. तंत्रज्ञानाचा विवेकी, नैतिक आणि समाजहितासाठी वापर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

नैतिक एआय

प्रजासत्ताक दिन आपल्याला भूतकाळाची जाणीव, वर्तमानाची जबाबदारी आणि भविष्याची दिशा देतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारताच्या प्रगतीचे प्रभावी साधन आहे आणि भारतीय तरुण ही तिची खरी ताकद आहेत. सजग नागरिक, जबाबदार तरुण आणि नैतिक एआय यांच्याच समन्वयातून सशक्त, समतोल आणि उज्ज्वल भारत घडेल. प्रजासत्ताक मूल्ये ही भारताची दिशा आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रगतीचे साधन. दोन्हींचा समन्वय साधला, तर भारत अधिक सक्षम, समतोल आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल.

डिजिटल शिस्त

हक्क आणि कर्तव्य यांचा समतोल राखणे हे लोकशाहीचे बळ आहे. नागरिकांना सेवा, माहिती आणि संधी मिळण्याचा हक्क आहे. पण त्याच वेळी डिजिटल शिस्त, सत्यता, सहिष्णुता आणि संविधानिक मूल्ये आदर राखण्याची जबाबदारीही आहे. एआय निर्णयप्रक्रिया सुलभ करु शकते. मानवी संवेदना, न्याय व समता केंद्रस्थानी असली पाहिजे.

युवकांसाठी संदेश

तरुण हा तंत्रज्ञानाचा वापरकर्ता नसून भविष्याचा शिल्पकार आहे. एआय शिकणे, स्टार्टअप्स उभारणे आणि समाजाच्या समस्या सोडवणे ही राष्ट्रसेवा आहे. संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सामाजिक बांधिलकी यांसोबत तंत्रज्ञानाचा वापर झाला, तर भारत जागतिक नेतृत्व करु शकतो.

तरुणांसाठी संधी

सद्यःस्थिती पाहिली, तर भारतातील तरुण डिजिटलदृष्ट्या अधिक सक्षम होत आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, ऑनलाइन शिक्षण, कोडिंग प्लॅटफॉर्म्स, स्टार्टअप संस्कृती आणि डिजिटल उपक्रमांमुळे तरुणांना नवी दारे खुली झाली आहेत. शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन, संरक्षण आणि सेवा क्षेत्रात एआयचा वापर वाढत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि युवाशक्तीचे दर्शन घडते. हे भारत बदलत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. तरुणांसाठी संधी अभूतपूर्व आहेत. एआय, विदा विज्ञान (डेटा सायन्स), रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, ऑटोमेशन, स्टार्टअप्स आणि संशोधन या क्षेत्रांत रोजगार व उद्योजकतेच्या मोठ्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणही ऑनलाइन कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल कोर्सेस आणि स्टार्टअप परिसंस्थेमुळे जागतिक पातळीवर स्पर्धा करु शकतात.

- शशिकांत शिंदे, सहायक प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: Republic values guiding India's artificial intelligence journey.

Web Summary : AI empowers India's progress, blending democratic values with technological advancement. Youth are key, fostering innovation, ethical AI use, and digital discipline for a balanced future. Skills, ethics, and responsible tech use are crucial.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतIndiaभारतIndiaभारत