शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

Oppo, Vivo, Xiaomi सारख्या चिनी कंपन्यांची भारतालाच धमकी? म्हणे, उत्पादन बंद करून टाकू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 18:23 IST

व्यवसायाच्या दृष्टीने चीनच्या कंपन्या विस्तारासाठी भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये प्लांट उभारू शकतात. पण भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत, अचानक उत्पादन बंद करणे हे कंपन्यांसाठी परवडणारे नाही.

व्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या चिनी कंपन्या आता भारतालाच डोळे वटारू लागल्या आहेत. भारतीयांनी देखील Oppo, Vivo, Xiaomi सारख्या चिनी स्मार्टफोन कंपन्यांना डोक्यावर घेतल्याने त्यांचे फावले आहे. यामुळे भारतात तेव्हा चालणाऱ्या मायक्रोमॅक्स, लावा सारख्या कंपन्यांना गायब व्हावे लागले होते. आता या चिनी कंपन्या भारताला उत्पादनच बंद करण्याची आडून आडून धमकी देत आहेत. 

या चिनी कंपन्यांनी तशी योजना बनविली आहे. भारतात स्मार्टफोन बनवणाऱ्या चिनी कंपन्यांवर सरकारची कडक कारवाई बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. या कंपन्यांनी भारताचा मोठा कर चुकविला आहे. चिनी कंपन्यांची ही कृत्ये उघड झाल्याने स्मार्टफोन बाजारात मोठी खळबळ उडाली होती. या कंपन्यांच्या कार्यालयावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणी कंपन्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे, मात्र तरीही सरकारने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही, त्यामुळे या कंपन्या आता नाराज झाल्या आहेत.

चिनी कंपन्यांनी भारताने सुरु केलेल्या कारवाईविरोधात आपले प्लँट बाहेरच्या देशांत नेण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. चीन सरकारची वृत्तसंस्था ग्लोबल टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, चिनी स्मार्टफोन निर्माते इंडोनेशिया, बांगलादेश, नायजेरिया यांसारख्या देशांमध्ये उत्पादन प्रकल्प उभारू शकतात. भारत सरकारची कठोर कारवाई या कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद होण्यास कारणीभूत असल्याचा आरोप यातून करण्यात आला आहे. 

परदेशी कंपन्या भारतात १२ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन बनवू शकत नाहीत, अशी अट भारत सरकार टाकत असल्याचे वृत्त आले होते. यावर चिनी कंपन्यांकडून परदेशात बाजारपेठा शोधण्याच्या शक्यतांचा विचार करत असल्याचे विधान आले होते. नंतर सरकारने ही अट बाजुला ठेवली. स्वस्त फोन देण्यात लावा आणि मायक्रोमॅक्स सारख्या कंपन्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न म्हणून सरकार असे पाऊल उचलू शकते, असा दावा केला जात होता. परंतू, भारताने पाऊल मागे घेतल्याने चिनी कंपन्यांना सुरक्षित असल्याचे वाटू लागले. यातूनच आता चिनी कंपन्यांची हाराकीरी वाढू लागली आहे. 

व्यवसायाच्या दृष्टीने चीनच्या कंपन्या विस्तारासाठी भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये प्लांट उभारू शकतात. पण भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत, अचानक उत्पादन बंद करणे हे कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठेला कायमचे गमावण्याचे मोठे कारण ठरू शकते. विक्री कमी झाल्यामुळे या कंपन्यांच्या कमाईवर जो परिणाम होईल तो तर विचारही करू शकणार नाहीत. यामुळे भारत सरकारवर दबाव टाकण्याचा हा चिनी कंपन्यांचा अजेंडा असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीchinaचीनVivoविवोoppoओप्पो