शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

Oppo, Vivo, Xiaomi सारख्या चिनी कंपन्यांची भारतालाच धमकी? म्हणे, उत्पादन बंद करून टाकू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 18:23 IST

व्यवसायाच्या दृष्टीने चीनच्या कंपन्या विस्तारासाठी भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये प्लांट उभारू शकतात. पण भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत, अचानक उत्पादन बंद करणे हे कंपन्यांसाठी परवडणारे नाही.

व्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या चिनी कंपन्या आता भारतालाच डोळे वटारू लागल्या आहेत. भारतीयांनी देखील Oppo, Vivo, Xiaomi सारख्या चिनी स्मार्टफोन कंपन्यांना डोक्यावर घेतल्याने त्यांचे फावले आहे. यामुळे भारतात तेव्हा चालणाऱ्या मायक्रोमॅक्स, लावा सारख्या कंपन्यांना गायब व्हावे लागले होते. आता या चिनी कंपन्या भारताला उत्पादनच बंद करण्याची आडून आडून धमकी देत आहेत. 

या चिनी कंपन्यांनी तशी योजना बनविली आहे. भारतात स्मार्टफोन बनवणाऱ्या चिनी कंपन्यांवर सरकारची कडक कारवाई बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. या कंपन्यांनी भारताचा मोठा कर चुकविला आहे. चिनी कंपन्यांची ही कृत्ये उघड झाल्याने स्मार्टफोन बाजारात मोठी खळबळ उडाली होती. या कंपन्यांच्या कार्यालयावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणी कंपन्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे, मात्र तरीही सरकारने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही, त्यामुळे या कंपन्या आता नाराज झाल्या आहेत.

चिनी कंपन्यांनी भारताने सुरु केलेल्या कारवाईविरोधात आपले प्लँट बाहेरच्या देशांत नेण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. चीन सरकारची वृत्तसंस्था ग्लोबल टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, चिनी स्मार्टफोन निर्माते इंडोनेशिया, बांगलादेश, नायजेरिया यांसारख्या देशांमध्ये उत्पादन प्रकल्प उभारू शकतात. भारत सरकारची कठोर कारवाई या कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद होण्यास कारणीभूत असल्याचा आरोप यातून करण्यात आला आहे. 

परदेशी कंपन्या भारतात १२ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन बनवू शकत नाहीत, अशी अट भारत सरकार टाकत असल्याचे वृत्त आले होते. यावर चिनी कंपन्यांकडून परदेशात बाजारपेठा शोधण्याच्या शक्यतांचा विचार करत असल्याचे विधान आले होते. नंतर सरकारने ही अट बाजुला ठेवली. स्वस्त फोन देण्यात लावा आणि मायक्रोमॅक्स सारख्या कंपन्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न म्हणून सरकार असे पाऊल उचलू शकते, असा दावा केला जात होता. परंतू, भारताने पाऊल मागे घेतल्याने चिनी कंपन्यांना सुरक्षित असल्याचे वाटू लागले. यातूनच आता चिनी कंपन्यांची हाराकीरी वाढू लागली आहे. 

व्यवसायाच्या दृष्टीने चीनच्या कंपन्या विस्तारासाठी भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये प्लांट उभारू शकतात. पण भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत, अचानक उत्पादन बंद करणे हे कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठेला कायमचे गमावण्याचे मोठे कारण ठरू शकते. विक्री कमी झाल्यामुळे या कंपन्यांच्या कमाईवर जो परिणाम होईल तो तर विचारही करू शकणार नाहीत. यामुळे भारत सरकारवर दबाव टाकण्याचा हा चिनी कंपन्यांचा अजेंडा असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीchinaचीनVivoविवोoppoओप्पो