शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पोरगं हात उगारतंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 12:53 IST

सुखवस्तू घरात सुखाच्या वस्तू येत राहिल्या आणि सुख हरवत चाललंय. आपल्याला नेमकं काय हवं आहे? याचं उत्तर संपलंय का ...

सुखवस्तू घरात सुखाच्या वस्तू येत राहिल्या आणि सुख हरवत चाललंय. आपल्याला नेमकं काय हवं आहे? याचं उत्तर संपलंय का कधी? हवं आहे. फक्त हवं आहे. प्रत्येक गोष्टीचा हव्यास आहे. याच नादात आपण हरवून जातो. खरं जगणं आणि वाट्याला येतं ते नको असलेलं कल्पनेच्याही पलीकडचं. मी असं का म्हणतोय? त्याचं कारण आहे. दररोज जगण्यात आणि दुनियादारीच्या गराड्यात माणसाच्या वाट्याला काय येईल ते सांगता येत नाही.

ही गोष्ट आहे घरात आलेल्या मोबाईलची. संपर्कासाठी महत्त्वाचंच साधन. अत्यंत गरजेचं. जगाजवळ क्षणात पोहोचता येतं. जग आपल्याजवळ क्षणात पोहोचतं, परंतु कोणत्या उपायानं असं करता येईल याच्या नादात मोबाईलवरचे शेकडो अ‍ॅप धुंडाळत धुंडाळत डोक्यामागचा व्याप तेवढा वाढत गेला. हे सगळं मी का लिहितोय? मोबाईलबद्दल. तर त्याची एक कथा आहे.

तर गोष्ट अशा सामान्य घरातली. बाप कुठंतरी पोटापुरतं भागेल असं काम करतोय. पोरगा नुकताच दहावी होऊन अकरावीला गेलाय. त्याच्या जगण्याच्या आणि वागण्याच्या कल्पना हवेतल्या झालेल्या आहेत. कारण त्याच्या भोवतीचं जग तसं आहे. त्यांच्या मित्रांचं आणि माणसांचं जग तसंच आहे. यातूनच मग त्याला या जगाविषयी, जगातल्या जगण्याच्या संकल्पनांविषयी विशेष अधिक माहिती झालेली असते. तो तसं जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करत असतो. मग होतं काय? तो हट्ट धरून बसतो. मला मोबाईल पाहिजे! दहा हजारांचा. थ्रीजी फोरजीचा. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसाठी. नेट आणि यु ट्यूबसाठी. गेली महिनाभर खरखर चालू होती.

आईजवळ पोरगा हक्कानं दटावून ओरडायचा. मी कॉलेजलाच जाणार नाही. बापासमोर बोलायचं धाडस होत नाही. पण रुसलेली अवस्था कळावी म्हणून आडदांडपणाचं वागणं काही टळत नव्हतं. आई समजावून सांगायची. उद्या घेऊ, परंतु याचा हट्ट काही संपत नव्हता. हुकूमशाहीप्रमाणे तो बेताल वागायचा. आपल्या पोटी जन्माला आलेल्या लेकराला कसं समजावून सांगायचं याची जाण आणि भान आईबापाजवळ नसते. कारण समोरची समस्याच तशी अडगळीतली आणि अडचणीतली. काय सांगावं? कसं सांगावं? कसं बोलावं? अशावेळी आईबापाला काहीच सुचत नाही. अशा वयातल्या पोराचं मन थाºयावर कसं आणणार.

मग पोरगं रोज जेवताना ताटावरून बोलता बोलता उठायचं. काम सांगितलं की अडवणूक करायचं. याच्याकडं एवढ्या रुपयाचा मोबाईल आहे. त्याच्याकडं एवढ्या किंमतीचा मोबाईल आहे. ऐकून ऐकून आईचे कान किटले. काय करावं आईबापानं अशावेळी?  एकेदिवशी घरातलं हे मोबाईलयुद्ध भलतंच पेटलं. बाप कामावर जायच्या घाईत. आई स्वयंपाकाच्या नादात. पोराचं गाणं सुरूच. मला आज मोबाईल पाहिजे. बाप म्हणाला, एवढा पगार नाही बाळा, एका दमात दहा पंधरा हजारांचा मोबाईल घ्यायला. ‘पोरगं म्हणालं, ‘फायनान्सवाले द्यायला तयार आहेत. आपण फक्त  कागदपत्रं द्यायची.’

बाप चिडला. म्हणाला,‘कागदपत्रं द्यायची. पण पैसं काय फायनान्सवाल्याचा बाप भरणार हाय?’पोरगं म्हणालं, ‘कुणाच्याबी बापाला भरावं लागू द्या. मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. कधी घेताय सांगा? पैसं हफ्त्यानं भरायला येत्याल की?’

बाप म्हणाला, ‘हितं आयच्या मुतखड्यासाठी सतरा औषीधं करायला बचत गटाचं कर्ज काढून मेळ लावलाय. त्याचं हफ्तं फिटनात आणि त्यात तुज्या मोबाईचं खुळ कशाला काढतो बाबा..’पोरगं हुशार, ते लगीच म्हणालं,‘त्या हफ्त्यात हे हफ्तं वाढलं तर बिघडलं कुठं? वाढू द्या की..’बाप म्हणाला, ‘जमणार नाही. काय करायचं ते कर. कुठं जायाचाय तिकडं जा.’बाप असं म्हणताच, पोरगं चिडलं. खरंतर बापच अधिक चिडला होता. पोटचं पोरगं ऐकत नाही, म्हणल्यावर काय करणार. रागानं तो म्हणाला, ‘ह्येला भाकरी खायच्या असतील तर खाऊ दे नाहीतर बोंबलत फिरू दे..’बाप आपलं कसलंच चालू देत नाही म्हणल्यावर, पोरंग अधिक चिडून आणि ओरडून म्हणालं, ‘शेवटचं विचारतोय, मला मोबाईल घेणार हाय का नाही?’

बाप म्हणाला, ह्य न्हाय घेत. बस बोंबलत.पोरगं अधिक चिडलं. अधिक चिडलं. चिडूनच बोललं...,‘कशाला असल्या दलिंदराच्या घरात जन्माला घातलं?..’ बापानं डोळं वटारलं. ते अधिक विस्फारलं. डोळ्यांतून आगच बाहेर पडत होती. बाप पोराच्या अंगावर धावून गेला. पोराच्या जवळ आला. तो हात उचलणार तेवढ्यात आवेशात येणाºया बापाकडं हात उगारून पोरगंच दोन पावलं पुढं गेलं. बापाच्या डोळ्यांतून आता आगीऐवजी अश्रू ओघळत होते..-इंद्रजित घुले(लेखक कवी अन् साहित्यिक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलHuman Traffickingमानवी तस्करी