शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

उत्कृष्ट काम करणाºया महिलांनी राजकारणात यावं : अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 13:23 IST

वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सोलापुरात महिला मेळावा

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणाला धम्माची जोड दिली - अंजली आंबेडकरमहिलांनी केवळ चूल आणि मूल या संकल्पनेत न राहता, स्वत:च्या कक्षा व्यापक करण्याची गरज - अंजली आंबेडकर प्रत्येक महिलेने आपल्या सुना-बाळा,मुलींच्या मागे जिजाऊंप्रमाणे उभे रहावे - अंजली आंबेडकर

सोलापूर : महिलांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे; मात्र त्या जर पदावर आल्या तर उत्कृष्ट काम करू शकतात. वंचित बहुजन आघाडीत महिला सुरक्षित असून, त्यांनी राजकारणात यावे, असे आवाहन वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले. 

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यानिमित्त त्या आंबेडकर या सोलापुरात आल्या असता त्यांच्याशी ‘लोकमत’ च्या प्रतिनिधींनी संवाद साधला.

अंजली आंबेडकर बोलताना म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणाला धम्माची जोड दिली आहे. महिलांनी केवळ चूल आणि मूल या संकल्पनेत न राहता, स्वत:च्या कक्षा व्यापक करण्याची गरज आहे. प्रत्येक महिलेने आपल्या सुना-बाळा,मुलींच्या मागे जिजाऊंप्रमाणे उभे रहावे. वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक चळवळ महिलांनी उभी करावी.  

वंचित बहुजन आघाडीमधील वंचित या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा या शब्दाचा अर्थ उलगडेल तेव्हा समाजातील सर्व जातीधर्मातील लोक जोडले जातील. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपण आपल्या उत्साहातच राहिलो; मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागले पाहिजे. वंचित शब्दाचा अर्थ समजून घ्या, कोण कोण वंचित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा, आपापल्या परिसरातील मूलभूत प्रश्न उचलून धरा, सोलापुरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो उचलून धरा, सच्चा कार्यकर्ता म्हणून स्वत:ला घडवा असेही प्रा. अंजली प्रकाश आंबेडकर यांनी महिलांना सांगितले. 

संघाकडून संविधान बदलण्याचे षडयंत्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एकसंध ठेवण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली. समतेवर आधारित भारतीय संविधान बदलण्याचे षडयंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केले जात आहे. आजच्या युगात महिला शिक्षणासह राजकीयदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. शिवबाला जसे जिजाऊंने घडवले, डॉ. बाबासाहेबांच्या पाठीशी रमाई खंबीरपणे उभी राहिली त्यामुळे समाजात परिवर्तन झाले. त्यांचा आदर्श आजच्या महिलांनी घेण्याची गरज आहे. महिलांनी राजकारणात येऊन बदल घडवावा, महिलांनी महिलांचा मान राखला पाहिजे, असे मत वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर