शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

उत्कृष्ट काम करणाºया महिलांनी राजकारणात यावं : अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 13:23 IST

वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सोलापुरात महिला मेळावा

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणाला धम्माची जोड दिली - अंजली आंबेडकरमहिलांनी केवळ चूल आणि मूल या संकल्पनेत न राहता, स्वत:च्या कक्षा व्यापक करण्याची गरज - अंजली आंबेडकर प्रत्येक महिलेने आपल्या सुना-बाळा,मुलींच्या मागे जिजाऊंप्रमाणे उभे रहावे - अंजली आंबेडकर

सोलापूर : महिलांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे; मात्र त्या जर पदावर आल्या तर उत्कृष्ट काम करू शकतात. वंचित बहुजन आघाडीत महिला सुरक्षित असून, त्यांनी राजकारणात यावे, असे आवाहन वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले. 

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यानिमित्त त्या आंबेडकर या सोलापुरात आल्या असता त्यांच्याशी ‘लोकमत’ च्या प्रतिनिधींनी संवाद साधला.

अंजली आंबेडकर बोलताना म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणाला धम्माची जोड दिली आहे. महिलांनी केवळ चूल आणि मूल या संकल्पनेत न राहता, स्वत:च्या कक्षा व्यापक करण्याची गरज आहे. प्रत्येक महिलेने आपल्या सुना-बाळा,मुलींच्या मागे जिजाऊंप्रमाणे उभे रहावे. वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक चळवळ महिलांनी उभी करावी.  

वंचित बहुजन आघाडीमधील वंचित या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा या शब्दाचा अर्थ उलगडेल तेव्हा समाजातील सर्व जातीधर्मातील लोक जोडले जातील. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपण आपल्या उत्साहातच राहिलो; मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागले पाहिजे. वंचित शब्दाचा अर्थ समजून घ्या, कोण कोण वंचित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा, आपापल्या परिसरातील मूलभूत प्रश्न उचलून धरा, सोलापुरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो उचलून धरा, सच्चा कार्यकर्ता म्हणून स्वत:ला घडवा असेही प्रा. अंजली प्रकाश आंबेडकर यांनी महिलांना सांगितले. 

संघाकडून संविधान बदलण्याचे षडयंत्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एकसंध ठेवण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली. समतेवर आधारित भारतीय संविधान बदलण्याचे षडयंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केले जात आहे. आजच्या युगात महिला शिक्षणासह राजकीयदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. शिवबाला जसे जिजाऊंने घडवले, डॉ. बाबासाहेबांच्या पाठीशी रमाई खंबीरपणे उभी राहिली त्यामुळे समाजात परिवर्तन झाले. त्यांचा आदर्श आजच्या महिलांनी घेण्याची गरज आहे. महिलांनी राजकारणात येऊन बदल घडवावा, महिलांनी महिलांचा मान राखला पाहिजे, असे मत वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर