शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

वन्यजीवन श्रावणातले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:41 PM

‘पेरते व्हा, पेरते व्हा’

श्रावण महिन्यामध्ये निसर्ग अत्यंत नयनरम्य, हिरवेगार, मनाला आनंद देणारे आणि आल्हादकारक वातावरण असते. या काळात वन्यजीवनात अनेक बदल पहावयास मिळतातत्न या मोसमात आपल्या सर्वांची सकाळ ही पक्ष्यांच्या किलबिलाटाने व त्यांच्या मधुर गाण्याने सुरुवात होते.  दयाळ, हळद्या, नाचण शिंपी पक्षी असे अनेक पक्षी सुमधुर गाण्यांनी आणि आपल्या रंगीबेरंगी रंगाची उधळण करीत जोडीदारांना आकर्षित करीत असतात. श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त आवाज कोकिळेचा ऐकावयास मिळतो.

श्रावणात सुरुवातीला चातक (पावशा) हा पक्षी निसर्गामध्ये ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ ही आरोळी देत पावसाच्या आगमनाची जणू सूचनाच सर्व शेतकरी बांधवांना देतो. पावशा पक्षी हा आफ्रिकेतून स्थलांतर करून दक्षिण भारतात येतो. तेथून तो मान्सूनच्या वाºयाच्या प्रवाहाबरोबर हळूहळू मध्य भारत आणि उत्तरभारतात प्रवास करतो. या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे  ते स्वत:ची अंडी  बºयाचदा दुसºया पक्षांच्या घरट्यामध्ये अत्यंत शिताफीने आणि चाणाक्ष पद्धतीने घालतात. उदाहरणार्थ ते सातभाई या  पक्षाच्या घरट्यामध्ये  ती अंडी  घालतात आणि त्यांच्या पिलांचे संगोपन हे  सातभाई पक्षी करतात.

पाकोळीसह काही पक्षी हे पावसाळा सुरू झाल्यानंतर घरटी बांधण्यात मग्न असतात. पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर श्रावणात पक्ष्यांमध्ये अनेक बदल दिसतात. त्यांच्या पिसांच्या रंगात बदल, वर्तुणुकीमध्ये बदल पाहावयास मिळतात. प्रत्येक पक्षी आपापल्या घरट्यात पिलांना आहार देण्यासाठी संपूर्णपणे कार्यरत असतो असतात. पक्षांना निसर्गामध्ये त्यांना लागणारा आहार कीटक,अळ्या, बेडूक, सरडे, किडे-मुंग्या कोळी वगैरे. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे पिल्लांची वाढ लवकर आणि व्यवस्थित होते. 

या महिन्यात राष्ट्रीय पक्षी मोर हा आपणास त्यांचा पिसांचा डोलारा उभा करून नाचताना पहावयास मिळतो. या काळात मोरांच्या विणीचा संगम असतो. मोर हा पक्षी पाऊस आल्यानंतरच का नाचतो? या मागचे प्रमुख कारण पावसामध्ये जेव्हा हे स्फटिके ओलसर होतात तेव्हा या पिसावरील स्फटिके प्रखरपणे चमकतात म्हणूनच मोर पावसात पिसारा फुलवून नाचतो.

श्रावण महिन्याच्या शेवटी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडत असताना पक्षी नेमके काय करत करतात ? अशा वातावरणात पक्षांना प्रामूख्याने दोन गोष्टीचा धोका असतो एक अंग गारठून जाणे आणि दोन उपासमार होणे. ह्या वातावरणात सर्व पक्षी आपल्या पिसांच्यामधील अंतरात हवेचे छोटे कप्पे तयार करतात त्यामुळे त्यांचे शरीर उबदार राहते. जर पाऊस सतत पडत तर त्यांना अन्न शोधण्याता प्रचंड कष्ट करावे लागते. यामध्ये त्यांची ऊर्जा सुद्धा कमी होते. पावसामध्ये पक्षी सुरक्षित जागेत आसरा घेतात पण काही पक्षी हे झाडावरच बसून राहतात. यावेळी ते त्यांचे पायांच्या बोटातील नसाने फांदीला घट्ट धरून करून बसतात. नसा घट्ट झाल्यानंतर ते कितीही वारा आला तरी झाडावरून पडू शकत नाहीत.

एकंदरीत श्रावण महिन्यामधील सुंदर आणि आल्हादकारक वातावरणाचा फक्त मनुष्यांप्राणी नव्हे तर संपूर्ण वन्यजीवनातील घटक त्याचा आनंद लुटताना पाहावयास मिळतात.- डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ अन् छायाचित्रकार आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरShravan Specialश्रावण स्पेशलbirds sanctuaryपक्षी अभयारण्य