शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सुशीलकुमार शिंदेंनी विकास केला असता तर मी मंत्री झालो नसतो; सहकारमंत्र्यांची खोचक प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:43 IST

जिल्ह्यात दोन्ही देशमुख चांगल्या प्रकारे सेवा करीत आहेत. 

ठळक मुद्देदुष्काळ जाहीर करणे हे कें द्राच्या हातात - देशमुखशेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना जास्तीत जास्त मदत करू - देशमुख

पंढरपूर : माजी कें द्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघेही जिल्ह्याच्या कोणत्याही फायद्याचे नाहीत, असे विधान केले़ याबाबत देशमुख म्हणाले, या महाशयांनी जिल्ह्याचा विकास केला असता तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्री म्हणून जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळालीच नसती, अशी खोचक प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यात दोन्ही देशमुख चांगल्या प्रकारे सेवा करीत आहेत. त्यामुळे बºयाच जणांना सध्या पोटदुखी झालेली आहे. कसं आहे की, मासा पाण्याबाहेर काढला की तो तडफडतो तसेच हे सध्या तडफडायला लागले आहेत.

पंढरपूर येथे भाजपा पदाधिकाºयांचा मेळावा आयोजित केला़ त्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ सहकारमंत्री देशमुख म्हणाले, देशात नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी ज्याप्रमाणे आम्ही लागू केल्या, त्याप्रमाणे दुष्काळी परिस्थितीमध्ये निश्चितपणे शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना जास्तीत जास्त मदत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील सरकारमध्ये ‘दुष्काळ’ हा शब्द उच्चारण्याचेही धाडस होत नव्हते़ दुष्काळासारख्या परिस्थितीत ‘टंचाईग्रस्त’ असा शब्दप्रयोग करून ते दुष्काळग्रस्त जनतेची दिशाभूल करीत होते. मात्र सध्याचे सरकार ‘दुष्काळसदृश’ असा शब्द वापरत आहे. 

दुष्काळ जाहीर करणे हे कें द्राच्या हातात असते. त्यामुळे आमचे सरकार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य दाखवून देण्यासाठी टंचाईग्रस्त असा शब्द न वापरता दुष्काळसदृश या शब्दाचा वापर करीत आहे, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले़ याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, महिला आघाडीच्या शकुंतला नडगिरे, राजाभाऊ जगदाळे, शंतनू दंडवते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखBJPभाजपाcongressकाँग्रेस