शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

धनगर, मुस्लीम आरक्षणाचे काय झाले; सुशीलकुमार शिंदेंचा भाजपाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 3:27 PM

भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिलीत, तुम्हाला काय मिळाले ? असा सवाल करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

ठळक मुद्देरात्रीत नोटाबंदी करून सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. यामुळे अनेकांचा बळी गेला - सुशीलकुमार शिंदेशेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या - सुशीलकुमार शिंदे कर्जमाफी नावाला दिली. शेतकºयांना फायदा झालाच नाही - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली तरी सोलापूरकरांना पाच दिवसाआड पाणी मिळते. भाजपाचा हाच विकास का, असा सवाल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी येथे बोलताना उपस्थित केला. 

काँग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सलगरवस्ती येथे आयोजित महिला मेळाव्यात शिंदे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मनोहर सपाटे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, अलका राठोड आदी उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सुनीता रोटे यांनी प्रास्ताविक केले. 

यावेळी बोलताना शिंदे यांनी धनगर, मुस्लीम आरक्षण मिळाले का, असा सवाल केला. भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिलीत, तुम्हाला काय मिळाले? पाच दिवसाआड पाणी येते, हाच विकास आहे का? असा सवाल करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. रात्रीत नोटाबंदी करून सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. यामुळे अनेकांचा बळी गेला. शेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या. कर्जमाफी नावाला दिली. शेतकºयांना फायदा झालाच नाही. बेकारीमुळे तरूणवर्ग हवालदिल आहे. खात्यावर १५ लाख जमा करतो म्हणणाºयांनी सामान्यांना काय दिले? रेशनचे धान्य बंद केले. दुष्काळ पडला तरी हाताला काम दिले जात नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBJPभाजपाDhangar Reservationधनगर आरक्षण