शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

वायफाय अन् हायफायवर काय पोटं भरत नाहीत; आमदार प्रणिती शिंदेंची भाजप सरकारवर आरोप

By appasaheb.patil | Published: November 20, 2019 2:02 PM

स्मार्ट सिटीच्या कामासह भाजपच्या दोन्ही मंत्र्यांच्या कारभारावर केला हल्लाबोल

ठळक मुद्देसोलापूर शहरातील विविध विकासकामांसाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असणार - आ. प्रणिती शिंदे शहरात दररोज पाणीपुरवठा व्हावा, कामगारांचे प्रश्न सुटावेत, याकडे अधिक लक्ष असणार - आ. प्रणिती शिंदे सोलापुरात आयटी पार्क व्हावं, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत़ प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक व महत्त्वाची असते - आ. प्रणिती शिंदे

सोलापूर : सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी असेल तर हद्दवाढ, झोपडपट्टी अन् पूर्व भागात जावा, काय स्मार्ट सिटी आहे हे समजेल़ फक्त ३ टक्के सोलापुरात स्मार्ट सिटी करता आणि वाहवा़़़ वाहवा करता, ही कोणती पद्धत़ वायफाय आणि हायफायवर काय पोटं भरत नाहीत अन् रस्ते होत नाहीत़ काय फायदा झाला, या स्मार्ट सिटीचा़ साधं शहरातील नागरिकांना नियमित पाणी देऊ शकत नाही अन् म्हणता सोलापूर स्मार्ट सिटी, असा घणाघाती आरोप आ. प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केला आहे.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात आ़ प्रणिती शिंदे भाजप सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका केली.

पुढे बोलताना आ़ प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात, राज्यात, महापालिकेत भाजपचीच सत्ता असताना त्यांना सोलापूरच्या विकासासाठी साधा निधी आणता आला नाही, ही शोकांतिका आहे़ स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात येणारी कामे निकृष्ट पद्धतीची आहेत़ शहरात मागील काही दिवसांपासून फक्त वरवऱ़़ शोबाजीचे काम सुरू आहे़ भाजपचे नगरसेवक तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे भाजपला लोकांचे प्रश्न समजत नाहीत.

सोलापूर शहरातील विविध विकासकामांसाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असणार आहे़ शहरात दररोज पाणीपुरवठा व्हावा, कामगारांचे प्रश्न सुटावेत, याकडे अधिक लक्ष असणार आहे़ सोलापुरात आयटी पार्क व्हावं, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत़ प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक व महत्त्वाची असते.

 यंदाची निवडणूकही तशीच होती, पण एक चांगलं झालं की, धर्म, जात, भाषा यापेक्षा लोकांनी माझ्या आजवरच्या कामकाजावर विश्वास ठेवून मला निवडून दिल्याचंही शिंदे म्हणाल्या़ शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत तिसºयांदा कोणीच निवडून आलं नाही़ पण मी मतदारसंघात फिरले होते, माझा जवळपास सर्वांशी संपर्क झाला आणि मला मतदारांतून मिळत असलेला धीरच महत्त्वपूर्ण होता़ त्या आधारावरच मी विजयी होणार हे जाणून होते आणि सर्वांना मी विजयी होणार असा धीर दिला, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

स्मार्ट सिटी योजनेचे काम निकृष्ट़़...- स्मार्ट सिटी योजनेचे काम निकृष्ट पद्धतीचे झाले आहे़ रस्त्यांना आतापासून तडे जात आहेत, अनेक ठिकाणी पाणी साचत आहे़ सर्वच रस्ते खोदून ठेवले आहेत़ कामाचा वेग अजिबात दिसत नाही़ ३ टक्के भागामध्येच काम आणि संपूर्ण शहराची दुरवस्था याला स्मार्ट सिटी म्हणता येईल का, असाही सवाल आ़ प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला़ स्मार्ट सिटी नव्हे तर वाट लावलेली सिटी असं चित्र पुढे येत आहे़ दोन्ही मंत्र्यांनी भांडणाशिवाय काही केलं नाही...- देशात, राज्यात व महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही सोलापुरातील दोन्ही मंत्र्यांना सोलापूरच्या विकासकामांसाठी निधी आणता आला नाही़ दोन्हीही मंत्र्यांनी भांडणाशिवाय काहीही केलं नाही़ भाजप गटातटात विखुरला गेला आह़े पाण्याच्या विषयावर सुद्धा हे नगरसेवक एकत्र येत नाहीत, हे बरोबर नाही़ लोकांना आता कळून चुकलं आहे की आपण चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता दिली आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसPraniti Shindeप्रणिती शिंदेBJPभाजपाSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख