शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

सोलापूर शहरावर जलसंकट; भाजपच्या दोन मंत्र्यांचे दुर्लक्ष, शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:16 IST

सोलापूर : उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. येथील मनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष ...

ठळक मुद्देउजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहेमनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षऔज बंधारा कोरडा पडला असून, शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष

सोलापूर : उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. येथील मनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडला असून, शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी  केला. 

शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी सकाळी महापालिकेच्या उजनी येथील पंपगृहाला भेट दिली. नगरसेवक राजकुमार हंचाटे, देवेंद्र कोठे, अमोल शिंदे, गुरुशांत धुत्तरगावकर, विनायक कोंड्याल, भारतसिंग बडूरवाले, उमेश गायकवाड, विठ्ठल कोटा, शशिकांत कैंची, युवा सेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल वानकर, रामदास मगर आदी उपस्थित होते. नगरसेवकांनी येथील कर्मचाºयांकडून कामकाजाची माहिती घेतली. या पाहणीत अनेक बाबतीत मनपा प्रशासनाची उदासीनता दिसून आली.

नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, उन्हाळ्याच्या तोंडावर सोलापूरवर मोठे जलसंकट येऊ शकते. शिवसेनेच्या नगरसेवकांनी याची कल्पना प्रशासनाला दिली होती. औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी इनटेकमधील पाणी २५ मार्चपर्यंत पुरणार आहे. जलसंपदा विभागाने औजमधील पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवावे, असे सांगितले. पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत कमालीचा फरक आहे. कर्नाटकातील गावे दररोज ७० एमएलडी पाण्याचा उपसा करीत आहेत. मंद्रुप येथील पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी उपसा सुरू आहे. औज बंधारा कोरडा पडल्याने उजनी धरणातून वेळेवर पाणी सोडायला हवे. भाजपच्या दोन मंत्र्यांनी पाठपुरावा करायला हवा. पण तो केला जात नाही.  

‘अमृत’चे पंप बसविण्यास उशीर- उजनी पंपगृहातील सहापैकी चार पंप सुरू आहेत. दोन पंप पर्यायी पंप म्हणून ठेवले आहेत. कार्यरत असलेल्या दोन पंपांना मोठी गळती आहे. अमृत योजनेतून हे पंप बदलण्याचा निर्णय झाला. दोन महिन्यांपूर्वी पंप दाखल झाले आहेत; मात्र ते बदलण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने यापूर्वीच हे पंप बदलून पाणीपुरवठा सुरळीत करणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. हे काम लवकर झाले नाही तर शहराला मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागेल. पंपगृहाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. सदर सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. ही प्रशासनाची मोठी चूक आहे, असे शिवसेना नगरसेवक देवेंद्र कोठे म्हणाले.

उजनीतील पाणी कमी झाल्यानंतर दुबार पंपिंग केले जाते. त्यासाठी दरवर्षी ३० लाख रुपयांचा खर्च केला जातो. पण दुबार पंपिंगचे काम आणखी अर्धा किलोमीटर आत नेल्यास मनपा प्रशासनाचा खर्च वाचेल. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. - राजकुमार हंचाटे, शिवसेना, नगरसेवक 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुख