शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सोलापूर शहरावर जलसंकट; भाजपच्या दोन मंत्र्यांचे दुर्लक्ष, शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:16 IST

सोलापूर : उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. येथील मनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष ...

ठळक मुद्देउजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहेमनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षऔज बंधारा कोरडा पडला असून, शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष

सोलापूर : उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. येथील मनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडला असून, शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी  केला. 

शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी सकाळी महापालिकेच्या उजनी येथील पंपगृहाला भेट दिली. नगरसेवक राजकुमार हंचाटे, देवेंद्र कोठे, अमोल शिंदे, गुरुशांत धुत्तरगावकर, विनायक कोंड्याल, भारतसिंग बडूरवाले, उमेश गायकवाड, विठ्ठल कोटा, शशिकांत कैंची, युवा सेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल वानकर, रामदास मगर आदी उपस्थित होते. नगरसेवकांनी येथील कर्मचाºयांकडून कामकाजाची माहिती घेतली. या पाहणीत अनेक बाबतीत मनपा प्रशासनाची उदासीनता दिसून आली.

नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, उन्हाळ्याच्या तोंडावर सोलापूरवर मोठे जलसंकट येऊ शकते. शिवसेनेच्या नगरसेवकांनी याची कल्पना प्रशासनाला दिली होती. औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी इनटेकमधील पाणी २५ मार्चपर्यंत पुरणार आहे. जलसंपदा विभागाने औजमधील पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवावे, असे सांगितले. पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत कमालीचा फरक आहे. कर्नाटकातील गावे दररोज ७० एमएलडी पाण्याचा उपसा करीत आहेत. मंद्रुप येथील पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी उपसा सुरू आहे. औज बंधारा कोरडा पडल्याने उजनी धरणातून वेळेवर पाणी सोडायला हवे. भाजपच्या दोन मंत्र्यांनी पाठपुरावा करायला हवा. पण तो केला जात नाही.  

‘अमृत’चे पंप बसविण्यास उशीर- उजनी पंपगृहातील सहापैकी चार पंप सुरू आहेत. दोन पंप पर्यायी पंप म्हणून ठेवले आहेत. कार्यरत असलेल्या दोन पंपांना मोठी गळती आहे. अमृत योजनेतून हे पंप बदलण्याचा निर्णय झाला. दोन महिन्यांपूर्वी पंप दाखल झाले आहेत; मात्र ते बदलण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने यापूर्वीच हे पंप बदलून पाणीपुरवठा सुरळीत करणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. हे काम लवकर झाले नाही तर शहराला मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागेल. पंपगृहाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. सदर सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. ही प्रशासनाची मोठी चूक आहे, असे शिवसेना नगरसेवक देवेंद्र कोठे म्हणाले.

उजनीतील पाणी कमी झाल्यानंतर दुबार पंपिंग केले जाते. त्यासाठी दरवर्षी ३० लाख रुपयांचा खर्च केला जातो. पण दुबार पंपिंगचे काम आणखी अर्धा किलोमीटर आत नेल्यास मनपा प्रशासनाचा खर्च वाचेल. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. - राजकुमार हंचाटे, शिवसेना, नगरसेवक 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुख