शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

वटपोर्णिमा विशेष ; पत्नीसाठी किडणीदान करून दिली प्रेमाची पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 3:17 PM

 जयदीप अन् प्रगती झगडे दाम्पत्याच्या सुखी संसाराची कहाणी

ठळक मुद्दे१५ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचा संसार सुखाने सुरूपुण्यामध्ये त्यांच्या किडणीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले

बाळासाहेब बोचरेसोलापूर : मृत्यूच्या दाढेतून आपला प्रिय पती सत्यवानाला परत आणणारी सावित्री आपण पुराणात ऐकली. त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून वटसावित्रीचा सण साजरा करतो. पण आजच्या विज्ञान युगात एका पतीने आपल्या प्रिय पत्नीला किडणी दान करून मृत्यूच्या दाढेतून परत आणून खºया अर्थाने प्रेमाची पावती दिली असून असाच पती प्रत्येकीला जन्मोजन्मी मिळावा, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. 

विधवेला पुनर्विवाहाची परवानगी नाही. मात्र एक पत्नी जाताच दुसरीसाठी बोहल्यावर चढण्याची घाई करणाºया जमान्यात जयदीप झगडे आणि प्रगती झगडे यांची कहाणी वेगळीच आहे. जयदीप हे मूळचे पुण्याचे असून ते तामलवाडी येथील बालाजी अमाईन्समध्ये नोकरीला आहेत. १५ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचा संसार सुखाने सुरू होता. त्यांना एक मुलगीही झाली. पण पाच वर्षांपूर्वीपासून प्रगतीला किडणीचा त्रास सुरू झाला.

पुण्यामध्ये विविध उपचार केले, पण किडणी बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. रक्तातील नात्याशिवाय किडणी घेण्यास मान्यता नसल्याने माहेरच्या सर्वांच्या किडण्या जुळतात का हे तपासण्यात आले. पण बहुतांशी जणांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांचा काही उपयोग झाला नाही. सर्वांत शेवटी पती जयदीप यांची किडणी तपासण्यात आली असता ती जुळली. पण पुराणमतवादी विचाराच्या काही मित्रांनी व नातेवाईकांनी किडणी न देण्याचा विचार जयदीपच्या मनात भरवला. एक गेली तर दुसरी मिळेल, असाही सल्ला दिला. पण जयदीप यांनी असल्या विचारांना जवळपासही फिरकू दिले नाही.

एक गेली तर मला दुसरी पत्नी मिळेल, हे जरी खरे असले तरी हिच्यासारखी दुसरी मिळेलच हे सांगता येणार नव्हते. शिवाय पत्नी मिळेल, पण माझ्या छोट्या लेकीला ममतेने वाढवणारी आई मिळणार नाही. हा विचार मनात ठेवून पत्नीसाठी किडणीदान करण्याचा निर्णय घेतला. पुण्यामध्ये त्यांच्या किडणीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. आज हे कुटुंब सुखाने जगत आहे. 

जन्मोजन्मी हाच पती मिळो...- याबाबत प्रगती यांना विचारले असता त्या म्हणाल्या, पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून आज वटसावित्रीचा सण साजरा केला जातो. पतीचा जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान करणाºया बायका पाहिल्या असतील, पण पत्नीसाठी जीव पणाला लावणारा पती हा विरळाच आहे. त्यासाठी फार मोठे मन असावे लागते. तो मनाचा मोठेपणा जयदीपने दाखवला आहे. माझ्यासाठी जीवाचे रान करणारा नवरा मला या जन्मी मिळाला आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, असेच मी म्हणेन. आपल्या दानाने कोणाचा तरी जीव वाचत असेल तर समाजाने अवयवदान व रक्तदान करण्यास कधीच मागे-पुढे पाहू नये. विज्ञानाने फार प्रगती केली आहे. त्या आधारे आपण कोणाचाही जीव नक्कीच वाचव ूशकतो.

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाhospitalहॉस्पिटल