शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सोलापूरची वरदायिनी; पुण्यातील धरणांमुळे ४० वर्षांत ३४ वेळा भरले उजनी धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 14:46 IST

बाष्पीभवनाच्या नावाखाली पळवले जाते १८ टीएमसी पाणी 

ठळक मुद्देउजनी धरणाचा एकूण जलसाठा ११०.८९  एवढा प्रचंड असून उपयुक्त जलसाठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढा आहेउजनी धरणाच्या पाण्यापासून पावसाळ्यात दररोज १२ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते धरणाच्या ११२ किमी लांबीच्या डाव्या व १२६ किमी लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे

डी. एस. गायकवाड 

टेंभुर्णी : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर भीमा खोºयात आॅगस्ट महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली बहुसंख्य धरणे भरल्याने या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण ४० वर्षांत ३४ व्या वेळेस तुडुंब भरले. गेल्यावर्षी आॅगस्टच्या सुरुवातीस शंभर टक्के भरलेले उजनी धरण यंदा मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीस शंभर टक्के भरले आहे.

सोलापूरसहपुणे, अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी एवढी प्रचंड आहे. धरण जेव्हा शंभर टक्के भरले असे आपण म्हणतो तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा असतो तर १११ टक्के भरलेले तेव्हा १२३ टीएमसी साठा असतो. उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठा पाणीसाठा असलेले धरण आहे. तसेच राज्यातील तिसºया क्रमांकाचा उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे. 

उजनी धरणाचा एकूण जलसाठा ११०.८९  एवढा प्रचंड असून उपयुक्त जलसाठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढा आहे. उजनी धरणाचा उपयोग फक्त सिंचनासाठीच नाही तर या धरणातील पाण्याचा उपयोग विद्युत निर्मिती, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा, मत्स्यव्यवसाय तसेच पूर नियंत्रणासाठी केला जातो. म्हणूनच धरण बहुउद्देशीय आहे. उजनी धरणाच्या पाण्यापासून पावसाळ्यात दररोज १२ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते तर धरणाच्या ११२ किमी लांबीच्या डाव्या व १२६ किमी लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. वाढलेल्या ऊस उत्पादनामुळे जिल्ह्यात तब्बल ४० साखर कारखाने उभारण्यात आले. त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तुडुंब भरलेल्या या धरणाच्या पाण्याचा वापर नियोजनबद्ध व्हायला हवा अशी मागणीही होऊ लागली आहे. 

पुण्याच्या पश्चिम भागामुळे धरण भरते तुडुंब7377 चौरस मैल उजनी धरणात एवढे प्रचंड पाणलोट क्षेत्र लाभले असून सोलापूर जिल्ह्यात थोडाही पाऊस पडला नाही तरी पुणे जिल्ह्यात पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे हे धरण अनेक वेळा तुडुंब भरलेले आहे. दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात उसाची शेती वाढण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे धरण म्हणून नेहमीच उजनीचा उल्लेख केला जातो. 

बाष्पीभवनाच्या नावाखाली पळवले जाते १८ टीएमसी पाणी पूर्वी बारमाही असलेले उजनी धरण सध्या ८ माही करण्यात आले आहे.४० वर्षांत ३४ वेळा उजनी धरण शंभर टक्के भरले असले तरी नियोजनाअभावी ते तेवढ्याच वेळा रिकामेही झाले आहे. ढिसाळ नियोजनामुळे शेतकºयांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या असून आंदोलनही करावे लागले आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे गळतीच्या व बाष्पीभवनाच्या नावाखाली अनेकवेळा जलशयातील १६ ते १८ टीएमसी पाणी वेगवेगळ्या मार्गाने पळवले जाते ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणेUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातRainपाऊस