शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

सोलापूरची वरदायिनी; पुण्यातील धरणांमुळे ४० वर्षांत ३४ वेळा भरले उजनी धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 14:46 IST

बाष्पीभवनाच्या नावाखाली पळवले जाते १८ टीएमसी पाणी 

ठळक मुद्देउजनी धरणाचा एकूण जलसाठा ११०.८९  एवढा प्रचंड असून उपयुक्त जलसाठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढा आहेउजनी धरणाच्या पाण्यापासून पावसाळ्यात दररोज १२ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते धरणाच्या ११२ किमी लांबीच्या डाव्या व १२६ किमी लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे

डी. एस. गायकवाड 

टेंभुर्णी : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर भीमा खोºयात आॅगस्ट महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली बहुसंख्य धरणे भरल्याने या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण ४० वर्षांत ३४ व्या वेळेस तुडुंब भरले. गेल्यावर्षी आॅगस्टच्या सुरुवातीस शंभर टक्के भरलेले उजनी धरण यंदा मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीस शंभर टक्के भरले आहे.

सोलापूरसहपुणे, अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी एवढी प्रचंड आहे. धरण जेव्हा शंभर टक्के भरले असे आपण म्हणतो तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा असतो तर १११ टक्के भरलेले तेव्हा १२३ टीएमसी साठा असतो. उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठा पाणीसाठा असलेले धरण आहे. तसेच राज्यातील तिसºया क्रमांकाचा उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे. 

उजनी धरणाचा एकूण जलसाठा ११०.८९  एवढा प्रचंड असून उपयुक्त जलसाठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढा आहे. उजनी धरणाचा उपयोग फक्त सिंचनासाठीच नाही तर या धरणातील पाण्याचा उपयोग विद्युत निर्मिती, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा, मत्स्यव्यवसाय तसेच पूर नियंत्रणासाठी केला जातो. म्हणूनच धरण बहुउद्देशीय आहे. उजनी धरणाच्या पाण्यापासून पावसाळ्यात दररोज १२ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते तर धरणाच्या ११२ किमी लांबीच्या डाव्या व १२६ किमी लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. वाढलेल्या ऊस उत्पादनामुळे जिल्ह्यात तब्बल ४० साखर कारखाने उभारण्यात आले. त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तुडुंब भरलेल्या या धरणाच्या पाण्याचा वापर नियोजनबद्ध व्हायला हवा अशी मागणीही होऊ लागली आहे. 

पुण्याच्या पश्चिम भागामुळे धरण भरते तुडुंब7377 चौरस मैल उजनी धरणात एवढे प्रचंड पाणलोट क्षेत्र लाभले असून सोलापूर जिल्ह्यात थोडाही पाऊस पडला नाही तरी पुणे जिल्ह्यात पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे हे धरण अनेक वेळा तुडुंब भरलेले आहे. दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात उसाची शेती वाढण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे धरण म्हणून नेहमीच उजनीचा उल्लेख केला जातो. 

बाष्पीभवनाच्या नावाखाली पळवले जाते १८ टीएमसी पाणी पूर्वी बारमाही असलेले उजनी धरण सध्या ८ माही करण्यात आले आहे.४० वर्षांत ३४ वेळा उजनी धरण शंभर टक्के भरले असले तरी नियोजनाअभावी ते तेवढ्याच वेळा रिकामेही झाले आहे. ढिसाळ नियोजनामुळे शेतकºयांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या असून आंदोलनही करावे लागले आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे गळतीच्या व बाष्पीभवनाच्या नावाखाली अनेकवेळा जलशयातील १६ ते १८ टीएमसी पाणी वेगवेगळ्या मार्गाने पळवले जाते ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणेUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातRainपाऊस