शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यातील परिवर्तनाची गोष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:33 IST

स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठीच जगण्याऐवजी संपूर्ण समाजासाठी जगावे.

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या दुसºया सत्रात शिकत असताना मी अभियांत्रिकीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. पण घरातून विरोध झाल्यामुळे मी नाईलाजाने नावडत्या विषयांचाही अभ्यास चालू ठेवला आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

अभियांत्रिकीच्या शिक्षणाने जरी माझी घुसमट वाढवली होती, तरी त्या शिक्षणाने चांगला पगार देणारी एक नोकरी मात्र मला मिळवून दिली. या नोकरी दरम्यान मी कोल्हापुरात केलेल्या एका वर्षाच्या वास्तव्याने माझ्या जीवनाला एक महत्त्वपूर्ण कलाटणी दिली !या काळात आॅफिस संपल्यानंतर संध्याकाळी मी माझ्या बॅचलर सहकाºयांसह टेबल टेनिस, कॅरम इ. खेळ खेळत असे, तर कधी फेरफटका मारायला शहरात जात असे. असा फेरफटका मारताना अधूनमधून आम्ही संध्याकाळच्या काही व्याख्यानमालांना मी हजेरी लावली. या काळात कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवारातील व आजूबाजूच्या परिसरातील अनेक व्याख्याने आम्ही ऐकली. यातील तीन व्याख्याने मला आजही पुसटशी आठवतात. यातील एक होते ते म्हणजे डॉ. तारा भवाळकर यांचे़, दुसरे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे आणि तिसरे डॉ. गंगाधर पानतावणे यांचे! 

डॉ. तारा भवाळकर त्यांच्या व्याख्यानात म्हणाल्या होत्या की, आज आपण साजरा करत असलेल्या अनेक सणांचा आपल्या धर्माशी तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही. अनेक सण हे मुळातील लोकोत्सव आहेत व ते धर्म ही संकल्पना अस्तित्वात येण्याच्या आधीपासून साजरे केले जात आहेत. माझ्यासाठी हा नवा विचार होता. 

प्राचार्य शिवाजीराव भोसले भारतातील महामानवांविषयी बोलताना म्हणाले होते की, तुम्हीही तुमच्या आयुष्यातील दहा वर्षे समाजासाठी बाजूला काढून ठेवा; म्हणजे तुमचाही इतिहास लिहिताना मला खूप आनंद वाटेल! भोसले सरांचे हे विधान माझ्या काळजात कोरले गेले. डॉ. पानतावणे यांनी त्यांच्या व्याख्यानातून महात्मा फुले यांनी केलेल्या समाजकार्याची माहिती दिली होती. त्या माहितीनेही मी मोठ्या प्रमाणात प्रभावित झालो.

ही आणि अशी व्याख्याने ऐकताना माझ्या मनात विचारांची मोठमोठी वादळे निर्माण होऊ लागली. मला वाटू लागले की, आपण अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन एक अधिकारी तर झालो; पण आजही आपल्या समाजाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टींची, त्याच्या समस्यांची, त्याच्या दैनंदिन संघर्षाची आपल्याला काहीच माहिती नाही. हे योग्य नाही. हे सर्व आपण जाणून घेतलेच पाहिजे!यानंतरचे सुमारे वर्षभर रात्र रात्र जागून मी अनेक पुस्तके वाचून काढली. या वाचनात प्रामुख्याने महामानवांच्या जीवनचरित्रांचा समावेश होता.

१९९८ च्या त्या वर्षभरात कोल्हापूरच्या करवीर नगर वाचनालयातील सुमारे ३० पुस्तके मी वाचून काढली. त्यामध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अब्राहम लिंकन, विन्सस्टन चर्चिल इ. पराक्रमी पुरुषांबरोबरच अ‍ॅडॉल्फ हिटलर सारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनचरित्रांचाही समावेश होता. या वाचनापूर्वी मी जगलेले आयुष्य यानंतर मला अगदीच सुमार दर्जाचे वाटू लागले. त्यामुळे त्यानंतरच्या १५-२० वर्षांच्या काळातही डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, मदर तेरेसा, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध, सम्राट अशोक या आणि अशा अनेक महामानवांचे  चरित्रग्रंथ मी मोठ्या आवडीने वाचून काढले.

 या सर्व पुस्तकांच्या वाचनामुळे माझ्या जीवनाला एक वेगळेच वळण लागले! आता केवळ स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठीच जगण्याऐवजी संपूर्ण समाजासाठी जगावे,असे मला तीव्रतेने वाटत आहे. माझ्यातील या सर्व परिवर्तनाचे श्रेय मी ऐकलेल्या व्याख्यानांना  आणि त्यानंतर केलेल्या वाचनालाच जाते!

- डॉ. रविनंद होवाळ(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा