शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

माझ्यातील परिवर्तनाची गोष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:33 IST

स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठीच जगण्याऐवजी संपूर्ण समाजासाठी जगावे.

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या दुसºया सत्रात शिकत असताना मी अभियांत्रिकीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. पण घरातून विरोध झाल्यामुळे मी नाईलाजाने नावडत्या विषयांचाही अभ्यास चालू ठेवला आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

अभियांत्रिकीच्या शिक्षणाने जरी माझी घुसमट वाढवली होती, तरी त्या शिक्षणाने चांगला पगार देणारी एक नोकरी मात्र मला मिळवून दिली. या नोकरी दरम्यान मी कोल्हापुरात केलेल्या एका वर्षाच्या वास्तव्याने माझ्या जीवनाला एक महत्त्वपूर्ण कलाटणी दिली !या काळात आॅफिस संपल्यानंतर संध्याकाळी मी माझ्या बॅचलर सहकाºयांसह टेबल टेनिस, कॅरम इ. खेळ खेळत असे, तर कधी फेरफटका मारायला शहरात जात असे. असा फेरफटका मारताना अधूनमधून आम्ही संध्याकाळच्या काही व्याख्यानमालांना मी हजेरी लावली. या काळात कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवारातील व आजूबाजूच्या परिसरातील अनेक व्याख्याने आम्ही ऐकली. यातील तीन व्याख्याने मला आजही पुसटशी आठवतात. यातील एक होते ते म्हणजे डॉ. तारा भवाळकर यांचे़, दुसरे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे आणि तिसरे डॉ. गंगाधर पानतावणे यांचे! 

डॉ. तारा भवाळकर त्यांच्या व्याख्यानात म्हणाल्या होत्या की, आज आपण साजरा करत असलेल्या अनेक सणांचा आपल्या धर्माशी तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही. अनेक सण हे मुळातील लोकोत्सव आहेत व ते धर्म ही संकल्पना अस्तित्वात येण्याच्या आधीपासून साजरे केले जात आहेत. माझ्यासाठी हा नवा विचार होता. 

प्राचार्य शिवाजीराव भोसले भारतातील महामानवांविषयी बोलताना म्हणाले होते की, तुम्हीही तुमच्या आयुष्यातील दहा वर्षे समाजासाठी बाजूला काढून ठेवा; म्हणजे तुमचाही इतिहास लिहिताना मला खूप आनंद वाटेल! भोसले सरांचे हे विधान माझ्या काळजात कोरले गेले. डॉ. पानतावणे यांनी त्यांच्या व्याख्यानातून महात्मा फुले यांनी केलेल्या समाजकार्याची माहिती दिली होती. त्या माहितीनेही मी मोठ्या प्रमाणात प्रभावित झालो.

ही आणि अशी व्याख्याने ऐकताना माझ्या मनात विचारांची मोठमोठी वादळे निर्माण होऊ लागली. मला वाटू लागले की, आपण अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन एक अधिकारी तर झालो; पण आजही आपल्या समाजाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टींची, त्याच्या समस्यांची, त्याच्या दैनंदिन संघर्षाची आपल्याला काहीच माहिती नाही. हे योग्य नाही. हे सर्व आपण जाणून घेतलेच पाहिजे!यानंतरचे सुमारे वर्षभर रात्र रात्र जागून मी अनेक पुस्तके वाचून काढली. या वाचनात प्रामुख्याने महामानवांच्या जीवनचरित्रांचा समावेश होता.

१९९८ च्या त्या वर्षभरात कोल्हापूरच्या करवीर नगर वाचनालयातील सुमारे ३० पुस्तके मी वाचून काढली. त्यामध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अब्राहम लिंकन, विन्सस्टन चर्चिल इ. पराक्रमी पुरुषांबरोबरच अ‍ॅडॉल्फ हिटलर सारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनचरित्रांचाही समावेश होता. या वाचनापूर्वी मी जगलेले आयुष्य यानंतर मला अगदीच सुमार दर्जाचे वाटू लागले. त्यामुळे त्यानंतरच्या १५-२० वर्षांच्या काळातही डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, मदर तेरेसा, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध, सम्राट अशोक या आणि अशा अनेक महामानवांचे  चरित्रग्रंथ मी मोठ्या आवडीने वाचून काढले.

 या सर्व पुस्तकांच्या वाचनामुळे माझ्या जीवनाला एक वेगळेच वळण लागले! आता केवळ स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठीच जगण्याऐवजी संपूर्ण समाजासाठी जगावे,असे मला तीव्रतेने वाटत आहे. माझ्यातील या सर्व परिवर्तनाचे श्रेय मी ऐकलेल्या व्याख्यानांना  आणि त्यानंतर केलेल्या वाचनालाच जाते!

- डॉ. रविनंद होवाळ(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा