शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

रुढी, परंपरेमागे एक विज्ञान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:52 IST

भारतीय संस्कृतीत सणांंना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

भारतीय संस्कृतीत सणांंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भारतीय सण एक अनमोल ठेवा आहे. प्रत्येक सणात असलेल्या रुढी, परंपरेमागे एक विज्ञान आहे. प्रत्येक सणामध्ये विविधता आहे. सणाच्या आहारामागे देखील आहार विज्ञान आहे. प्रत्येक सणाच्या संस्कृतीमध्ये एक उद्देश आहे आणि प्रत्येक सणांच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे जो भारतीय संस्कृतीच्या परंपरेतील विविधतेतील एकता अबाधित राखण्याचे काम करतो. चला तर मग आपण जाणून घेऊया प्रत्येक सणातील रुढी, परंपरा, आहारामागील विज्ञान  या लेखमालेच्या माध्यमातून. सर्वप्रथम नूतन वर्षाच्या प्रारंभी येणाºया मकर संक्रांत या सणाविषयी जाणून घेऊया.

मकर संक्रमण म्हणजे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश यालाच आपण मकर संक्रांत म्हणतो. भारत देश उत्तर गोलार्धात वसलेला आहे. मकर संक्रांतीच्या अगोदर सूर्य दक्षिण गोलार्धात असतो अर्थात भारतापासून अपेक्षेपेक्षाही जास्त दूर असतो. त्यामुळे आपल्याकडे रात्र मोठी आणि दिवस छोटा असतो आणि थंडी असते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर गोलार्धात येण्यास सुरुवात होते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा होण्यास सुरुवात होते आणि थंडी कमी होण्यास सुरुवात होते. दिवस मोठा असल्याने प्रकाशाचे प्रमाण वाढते आणि रात्र छोटी असल्याने अंधाराचे प्रमाण कमी होते. सूर्याच्या मकर संक्रमणामुळे अंधकार  प्रकाशाकडे परावर्तित होत जाण्याची सुरुवात होते. सूर्यप्रकाश वाढल्याने प्राण्यातील आणि वनस्पतीतील चैतन्य आणि कार्यक्षमता वाढीस लागते. त्यामुळे संपूर्ण भारतात विविध रूपाने, मार्गाने सूर्याची उपासना, पूजा करून सूर्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

संक्रांतीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. भारताच्या विविध राज्यात संक्रांतीला वेगवेगळी नावे आहेत. उत्तरप्रदेश आणि हरियाणामध्ये संक्रांतीला  ‘खिचडी’ म्हणतात तर तामिळनाडूला ‘ताई पोंगल’, आसाममध्ये ‘भोगाली बिहु’ अशी विविध नावे आहेत. भारतातच नव्हे तर बांगलादेश,नेपाळ, थायलँड, लाओस, म्यानमार, कंबोडिया,श्रीलंका या देशात देखील संक्रांतीचा सण साजरा केला जातो.

संक्रांतीचा कुलाचार तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी भोगी, दुसºया दिवशी संक्रांत आणि तिसºया दिवशी किंक्रांंत असते,परंतु संक्रांतीचा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करतात. संक्रांतीच्या सणाला तीळगूळ दिला जातो. पौष महिन्यात संक्रांतीचा सण येतो त्यावेळी थंडी असते,थंडीमुळे त्वचा कोरडी, शुष्क पडते आणि तीळ हे स्निग्ध असते आणि गूळ हे उष्ण लोहयुक्त असल्याने तीळगूळ हे पोषक आहे. भोगीच्या दिवशी सुगडामध्ये ओले हरभरे,उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, बोरे, हलवा भरून हळद-कुंकू लावून दोरे गुंडाळून पूजा करतात. आपली कृषीप्रधान संस्कृती असल्याने या महिन्यात शेतात जे पिकते त्याचा सन्मान करण्याची ही परंपरा गौरवास्पद आहे. पूर्वी गावे स्वयंपूर्ण होती, गावात बारा बलुतेदारी होती, बारा बलुतेदारा पैकी कुंभाराकडील सुगडाचे पूजन केले जाते, बायका वानवशाला याच सुगडाचा वापर करतात. महाराष्ट्रात संक्रांतीच्या जेवणात सर्व पालेभाज्या आणि कडधान्ये घालून भाजी करण्याचा प्रघात आहे.या माध्यमातून भाज्या आणि कडधान्ये आहारात असणे किती गरजेचे आहे हे ठसवले जाते .

भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचे भरीत असा बेत असतो. पौष महिन्यातील थंडीमुळे उष्ण बाजरी आणि स्निग्ध लोणी खाण्यात यावे हा त्यामागील हेतू आहे. तसेच संक्रांतीच्या सणाला देशभरात खिचडी केली जाते. मुगाची, उडदाची डाळ, सर्व भाज्या घालून ही खिचडी केली जाते.

सणाच्या दिवशी गुळपोळी किंवा शेंगाची पोळी म्हणजे शेंगदाण्याचे कुट, गूळ,जायफळ, वेलदोड्याचे सारण भरून पोळी केली जाते. ही पोळी अनेक दिवस टिकते, ती जशी जशी शिळी होत जाईल तसतशी गुळाची गोडी त्यात उतरते आणि शेंगाची पोळी गोड लागते. गूळ, शेंगा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढत जाते. तीळगूळ किंवा हलवा देण्यामागे देखील हेच कारण आहे. - वसुंधरा शर्मा(लेखिका शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरMakar Sankrantiमकर संक्रांतीscienceविज्ञान