शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
3
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
4
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
6
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
7
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
8
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
9
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
10
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
11
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
12
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
13
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
14
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
15
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
16
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
17
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
18
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
19
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
20
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
Daily Top 2Weekly Top 5

रुढी, परंपरेमागे एक विज्ञान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:52 IST

भारतीय संस्कृतीत सणांंना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

भारतीय संस्कृतीत सणांंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भारतीय सण एक अनमोल ठेवा आहे. प्रत्येक सणात असलेल्या रुढी, परंपरेमागे एक विज्ञान आहे. प्रत्येक सणामध्ये विविधता आहे. सणाच्या आहारामागे देखील आहार विज्ञान आहे. प्रत्येक सणाच्या संस्कृतीमध्ये एक उद्देश आहे आणि प्रत्येक सणांच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे जो भारतीय संस्कृतीच्या परंपरेतील विविधतेतील एकता अबाधित राखण्याचे काम करतो. चला तर मग आपण जाणून घेऊया प्रत्येक सणातील रुढी, परंपरा, आहारामागील विज्ञान  या लेखमालेच्या माध्यमातून. सर्वप्रथम नूतन वर्षाच्या प्रारंभी येणाºया मकर संक्रांत या सणाविषयी जाणून घेऊया.

मकर संक्रमण म्हणजे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश यालाच आपण मकर संक्रांत म्हणतो. भारत देश उत्तर गोलार्धात वसलेला आहे. मकर संक्रांतीच्या अगोदर सूर्य दक्षिण गोलार्धात असतो अर्थात भारतापासून अपेक्षेपेक्षाही जास्त दूर असतो. त्यामुळे आपल्याकडे रात्र मोठी आणि दिवस छोटा असतो आणि थंडी असते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर गोलार्धात येण्यास सुरुवात होते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा होण्यास सुरुवात होते आणि थंडी कमी होण्यास सुरुवात होते. दिवस मोठा असल्याने प्रकाशाचे प्रमाण वाढते आणि रात्र छोटी असल्याने अंधाराचे प्रमाण कमी होते. सूर्याच्या मकर संक्रमणामुळे अंधकार  प्रकाशाकडे परावर्तित होत जाण्याची सुरुवात होते. सूर्यप्रकाश वाढल्याने प्राण्यातील आणि वनस्पतीतील चैतन्य आणि कार्यक्षमता वाढीस लागते. त्यामुळे संपूर्ण भारतात विविध रूपाने, मार्गाने सूर्याची उपासना, पूजा करून सूर्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

संक्रांतीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. भारताच्या विविध राज्यात संक्रांतीला वेगवेगळी नावे आहेत. उत्तरप्रदेश आणि हरियाणामध्ये संक्रांतीला  ‘खिचडी’ म्हणतात तर तामिळनाडूला ‘ताई पोंगल’, आसाममध्ये ‘भोगाली बिहु’ अशी विविध नावे आहेत. भारतातच नव्हे तर बांगलादेश,नेपाळ, थायलँड, लाओस, म्यानमार, कंबोडिया,श्रीलंका या देशात देखील संक्रांतीचा सण साजरा केला जातो.

संक्रांतीचा कुलाचार तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी भोगी, दुसºया दिवशी संक्रांत आणि तिसºया दिवशी किंक्रांंत असते,परंतु संक्रांतीचा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करतात. संक्रांतीच्या सणाला तीळगूळ दिला जातो. पौष महिन्यात संक्रांतीचा सण येतो त्यावेळी थंडी असते,थंडीमुळे त्वचा कोरडी, शुष्क पडते आणि तीळ हे स्निग्ध असते आणि गूळ हे उष्ण लोहयुक्त असल्याने तीळगूळ हे पोषक आहे. भोगीच्या दिवशी सुगडामध्ये ओले हरभरे,उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, बोरे, हलवा भरून हळद-कुंकू लावून दोरे गुंडाळून पूजा करतात. आपली कृषीप्रधान संस्कृती असल्याने या महिन्यात शेतात जे पिकते त्याचा सन्मान करण्याची ही परंपरा गौरवास्पद आहे. पूर्वी गावे स्वयंपूर्ण होती, गावात बारा बलुतेदारी होती, बारा बलुतेदारा पैकी कुंभाराकडील सुगडाचे पूजन केले जाते, बायका वानवशाला याच सुगडाचा वापर करतात. महाराष्ट्रात संक्रांतीच्या जेवणात सर्व पालेभाज्या आणि कडधान्ये घालून भाजी करण्याचा प्रघात आहे.या माध्यमातून भाज्या आणि कडधान्ये आहारात असणे किती गरजेचे आहे हे ठसवले जाते .

भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचे भरीत असा बेत असतो. पौष महिन्यातील थंडीमुळे उष्ण बाजरी आणि स्निग्ध लोणी खाण्यात यावे हा त्यामागील हेतू आहे. तसेच संक्रांतीच्या सणाला देशभरात खिचडी केली जाते. मुगाची, उडदाची डाळ, सर्व भाज्या घालून ही खिचडी केली जाते.

सणाच्या दिवशी गुळपोळी किंवा शेंगाची पोळी म्हणजे शेंगदाण्याचे कुट, गूळ,जायफळ, वेलदोड्याचे सारण भरून पोळी केली जाते. ही पोळी अनेक दिवस टिकते, ती जशी जशी शिळी होत जाईल तसतशी गुळाची गोडी त्यात उतरते आणि शेंगाची पोळी गोड लागते. गूळ, शेंगा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढत जाते. तीळगूळ किंवा हलवा देण्यामागे देखील हेच कारण आहे. - वसुंधरा शर्मा(लेखिका शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरMakar Sankrantiमकर संक्रांतीscienceविज्ञान