शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

पैसे नाहीत म्हणून प्यावे लागते नदीचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 14:05 IST

सोलापूर-विजयपूर रोडवरील वडकबाळकरांची पाण्यासाठी पायपीट; शुद्ध पाण्यासाठी एटीएमची सोय, पण लोक पितात टाकळी जलवाहिनीचे पाणी

ठळक मुद्देउन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नदीकाठची अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेली सोलापूरला पाणीपुरवठा करणाºया टाकळी-सोरेगाव जलवाहिनीतील प्रक्रिया न केलेले पाणी पिण्यासाठी वापरत आहेतदुष्काळी स्थितीमुळे यंदा सीना नदी डिसेंबरपासून कोरडी आहे. पण या नदीच्या पाण्याचा उपयोग वडकबाळकरांना नाहीच

राजकुमार सारोळे

सोलापूर: सीना नदीत गेली कित्येक वर्षे महापालिकेच्या ड्रेनेजचे थेट पाणी मिसळल्याने दूषित झालेल्या नदीच्या पाण्याच्या प्रभावाने जलाशये क्षारयुक्त झाली. आता उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नदीकाठची अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेली आहेत. विजापूर महामार्गाशेजारी वसलेल्या वडकबाळ ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी एटीएमची सुविधा दिली तरी पैसे नाहीत म्हणून अनेक जण सोलापूरला पाणीपुरवठा करणाºया टाकळी-सोरेगाव जलवाहिनीतील प्रक्रिया न केलेले पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.

दुष्काळी स्थितीमुळे यंदा सीना नदी डिसेंबरपासून कोरडी आहे. पण या नदीच्या पाण्याचा उपयोग वडकबाळकरांना नाहीच. नदीचे पाणी पिण्यालायक तर नाहीच, पण ते वापरण्यायोग्य नसते. नदीच्या पाण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूरच्या ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने नदी क्षारयुक्त झाली आहे. याचा परिणाम परिसरातील जलाशयावर झाला आहे. नदीकाठापासून दोन किलोमीटर अंतरावर कोठेही बोअर किंवा विहीर खोदा तेथे क्षारयुक्त पाणी येते. त्यामुळे नदीकाठच्या नंदूर, वांगी, वडकबाळ, हत्तूरच्या पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. 

वडकबाळ ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तांड्याजवळ विहीर खोदली आहे. या विहिरीच्या पाण्यावर ग्रामपंचायतीत फिल्टर बसविले आहे. फिल्टरला जोडलेल्या एटीएम मशीनमधून पाच रुपयाला घागरभर पाणी दिले जाते. गावची तहान या पाण्यावर भागवली जाते. तर गावात असलेल्या तीन बोअरवरून वापरण्यासाठी पाणी आणले जाते. नव्याने आणखी एक बोअर घेण्यात आला आहे. या बोअरवर पंप बसवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. 

पण तांडा, भीमनगर, वस्त्यांवरील लोकांना दररोज विकतचे पाणी घेणे शक्य नाही. असे लोक दररोज महामार्गाशेजारी नाल्यात असलेल्या सोलापूर महापालिकेच्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हवरून पाणी भरून आणतात. वास्तविक हे पाणी अशुद्ध आहे.

सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टाकळी जॅकवेलमधून पंपिंग करून हे पाणी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. पण या व्हॉल्व्हवरून वडकबाळ, हत्तूर, वांगी, होनमुर्गीपर्यंतचे लोक तहान भागविण्यासाठी पाणी नेत असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी हे पाणी वापरासाठी नेत असल्याची माहिती दिली. गावातील बोअरचे पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे जनावरेसुद्धा ते पाणी पीत नाहीत. उलट हे पाणी भीमा नदीतील असल्याने जनावरे पाणी पितात. याशिवाय आंघोळ, कपडे धुण्यासाठी हे पाणी चांगले असल्याचे मत व्यक्त केले. भीमनगर येथील महिलांनी हे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. 

एटीएममध्ये दररोज पैसे देऊन पाणी आणणे परवडत नाही. त्यामुळे या जलवाहिनीवरील पाणी चांगले आहे. आम्ही हेच पाणी पिण्यासाठी वापरतो, असे सांगितले. महामार्गावरील वेगाने येणाºया वाहनांतून जीव वाचवत महिला व लहान मुले पाण्यासाठी पायपीट करताना दिसतात.

ग्रामसेविका संगीता धसाडे यांनी मात्र ग्रामस्थांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय केली आहे. लोक शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरतात तर जनावरे व इतर वापरासाठी या जलवाहिनीवरून पाणी आणतात, असे सांगितले. आम्ही आठवड्यातून एकदा जलवाहिनीवरील पाणी पिण्यालायक नसल्याची दवंडी देतो, असे सांगितले.

महापालिकेचे दुर्लक्ष- वडकबाळ व परिसरातील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे महापालिकेच्या जलवाहिनीचे व्हॉल्व्ह लिक करून पाणी घेतले जाते. गळतीने पाणी वाया जाते. यापेक्षा महापालिकेने वडकबाळ ग्रामपंचायतीला एक इंची कनेक्शन दिल्यास पाण्याचा अपव्यय टळेल, लोकांची सोय होईल आणि उलट महापालिकेला पाणीपट्टी मिळेल. पण राजकारणामुळे याकडे दुर्लक्ष झाल्याचे एकाने सांगितले. 

पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे या व्हॉल्व्हमधून आम्ही पाणी भरतो. पिण्यासाठी व वापराच्या पाण्यासाठी हेच पाणी वापरतो. गावातील नळाला कित्येक दिवसातून पाणी नाही. उन्हाळा असो की पावसाळा पाण्याचे हाल आहेत.- मीनाक्षी शिंदे

जनावरे व घरातील वापरासाठी महापालिकेच्या जलवाहिनीवरील पाणी नेतो. इथे वडकबाळबरोबरच वांगी, हत्तूर, होनमुर्गीचे लोक पाणी नेण्यासाठी येतात. बोअरला क्षारयुक्त पाणी आहे. त्यामुळे गरिबांना दररोज विकतचे पाणी घेणे परवडत नाही. - सूर्यकांत पुजारी

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater transportजलवाहतूकriverनदी