शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

दुसऱ्या वर्षीही बोर्डाच्या परीक्षांचा गोंधळ कायम; अभ्यासू विद्यार्थी,पालकांना भविष्य सतावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 17:10 IST

गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : प्रात्यक्षिक परीक्षांचा नाही पत्ता

सोलापूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन या गोंधळात मार्च महिना आला तरीही बोर्डाच्या परीक्षेचा गोंधळ संपता संपेना. सलग दोन वर्षे ही स्थिती कायम राहिल्याने राज्यातील विद्यार्थ्यांमधील संभ्रमावस्था कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. त्यात ऑनलाईन परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र, सराव परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षांचा निर्णय झाला नाही.

कोरोनामुळे मागील वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांचा गोंधळ शेवटपर्यंत सुरूच होता. शेवटी परीक्षाच रद्द झाल्या. शासन स्तरावर परीक्षांबाबत नेहमीच गोंधळाची स्थिती राहिल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गात विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता वाढत आहे. यंदा कोरोनाचे संकट धूसर होत असताना परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक आणि सराव परीक्षांचा निर्णय अद्याप जाहीर झाला नाही. परीक्षा ऑफलाईन होणार हे जाहीर झाले तर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन याबाबत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत.

-----

गुणवत्तेची चिंता

सतत अभ्यासात आणि सरावात गुंतलेले विद्यार्थी यंदा परीक्षेच्या तयारीत होते. लेखी परीक्षा ऑफलाईन होणार याचा आनंद त्यांना वाटत होता. मात्र, गुणवत्तेबाबत शासन कोणती भूमिका घेणार याचा अंदाज लागत नाही. मागील वर्षी परीक्षा नाही अभ्यास नाही तरीही बहुतांशी विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले. या निकालाने गुणवत्तेचे अक्षरश: तीन तेरा वाजले.

 

मुलांना सुट्टीचा कंटाळा आला आहे. त्यांना आता शाळा सुरू व्हावी असे वाटते. अभ्यासू मुले सध्याच्या परिस्थितीवर चिंतित आहेत. परीक्षांबाबतचा संभ्रम लवकरात लवकर दूर झाला पाहिजे तरच शिक्षण क्षेत्रात स्थैर्य निर्माण होईल.

-तानाजी माने, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

------

परीक्षा केंद्रे

  • दहावीसाठी - १७५
  • बारावीसाठी - ११०

--

परिरक्षक कार्यालये

प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यासाठी ११ तर शहरासह १७ परिरक्षक कार्यालये असतील. या ठिकाणांहून परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांसह परीक्षेच्या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

-----

भरारी पथके - ३५०

-----

  • परीक्षार्थींची संख्या
  • दहावी - ६३,७९८
  • बारावी - ५८,६७२

------

दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत शासन संभ्रमात आहे. विद्यार्थ्यांना आता परीक्षा हव्यात. पूर्व परीक्षांचा निर्णय झाला नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. लवकरात लवकर परीक्षांचा गोंधळ संपुष्टात आला पाहिजे.

-प्रकाश काशीद, उपप्राचार्य,

कुमठे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, कुमठे

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा