शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

गोड बोला..ग़ुड बोला; गोड बोलण्यासाठी अंत:करणात प्रेम, आपुलकी असावी लागते : विजयकुमार देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 5:13 PM

भारतीय परंपरेत प्रत्येक सणाची वेगळी ओळख आहे. यात मकर संक्रांतीचा गोड बोलण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे.  आपल्या जीवनाची वाटचाल नेहमी ...

ठळक मुद्देकोणताही बदल सकारात्मक नजरेने स्वीकारत पुढे जाण्याची सवय या संस्कारामुळे भाषिक संवाद होण्यासाठी गोड बोलणे ही व्यवहाराची गरज गोड बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल सकारात्मक भाव निर्माण होतात

भारतीय परंपरेत प्रत्येक सणाची वेगळी ओळख आहे. यात मकर संक्रांतीचा गोड बोलण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे.  आपल्या जीवनाची वाटचाल नेहमी योग्य दिशेने होण्यासाठी सर्वांशी गोड बोलणे महत्त्वाचे आहे. इतरांशी सुसंवाद साधणे, त्यांच्याशी मधूर बोलण्यासाठी अंत:करणात मात्र प्रेम आणि आपुलकी असणे अतिशय महत्वाचे आहे.

कोणताही बदल सकारात्मक नजरेने स्वीकारत पुढे जाण्याची सवय या संस्कारामुळे होते. यातील भाषिक संवाद होण्यासाठी गोड बोलणे ही व्यवहाराची गरज असते. गोड बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल सकारात्मक भाव निर्माण होतात. कोणत्याही व्यवहारात काहीतरी देवाण-घेवाणीच्या गोष्टी असतात. व्यवहार आला की, त्याचबरोबर अडचणी ठरलेल्या असतात. यातून माणसाचे संवाद दुरावतात.

व्यवहारात आपण कुणाला तरी कळत-नकळत दुखावत असतो. पण जर त्यामध्येही सकारात्मकता ठेवेली तर व्यवहारही गोडीमध्येच होतो.  राजकारण्यांना तर सर्वांची कामे करावी लागतात, तरीही काम नाही झाले की कोणीतरी दुखावतोच. समोरचा कसाही वागला, बोलला तरी आपल्या अंत:करणात त्याच्याविषयी क्षमा, दया, अशी सद्भावनाच असावी, असे मी मानतो. त्यामुळे गोड बोलणे हे केवळ स्वार्थ किंवा भीतीपोटी असू नये. काहीवेळा सत्य सांगितल्यावर इतरांना वाईट वाटते. हे सांगणे आपल्या हृदयापासून आले तर तर त्यालाही बरे वाटेल, त्यासाठी संक्रांतीचा योग चांगला आहे. संक्रांत हा सण विशेषत: युवकांसाठी महत्त्वाचा आहे. तरूण वयात जोश असतो.   -विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख