शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आला उन्हाळा वेळ सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:46 IST

आपण चांगल्या गोष्टींविषयी खूप काही बोलतो. खूप काही लिहितो पण करत काहीच नाही. म्हणून आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही.

ठळक मुद्देसोलापुरात सालाबादप्रमाणे असह्य उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळा असह्य होऊ नये याकरिता आपण वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेण्याची गरजपावसाचा प्रत्येक थेंब आपण साठवून ठेवला पाहिजे.

सोलापुरात सालाबादप्रमाणे असह्य उन्हाळा सुरू झालेला आहे. हा उन्हाळा असह्य होऊ नये याकरिता आपण वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेण्याची गरज आहे. या विषयावर अनेक लोक चर्चा करतात. लेखन करतात परंतु हा विषय प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आहे. आपण चांगल्या गोष्टींविषयी खूप काही बोलतो. खूप काही लिहितो पण करत काहीच नाही. म्हणून आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. वृक्षारोपण हा अत्यंत महत्त्वाचा विषय. आपण सर्वांनी याची अंमलबजावणी केली पाहिजे. पावसाचा प्रत्येक थेंब आपण साठवून ठेवला पाहिजे. नक्कीच पुढचा काळ हा उन्हाळा सुद्धा आपल्याला आनंद देणारा जाणार. जर आपण पाण्याची बचत आणि वृक्ष संगोपन केलं तर.

सध्याच्या परिस्थितीत आपण हा प्रयत्न केला तर त्याचे यश काही वर्षांनंतर मिळणार आहे. सध्या मात्र हा उन्हाळा आनंददायी करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे उन्हात कुठेही न जाता शांतपणे सावलीत बसणे. शांतपणे सावलीत बसल्यानंतर वेळ चांगला जावा याकरिता आपण सगळे पटकन दूरदर्शन किंवा मोबाईलला चिटकून बसतो. या गोष्टींची मर्यादा पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यातला काही वेळ मोबाईल, दूरदर्शन यांना देणे ठीक आहे पण अखंडपणे त्यांच्याजवळ बसून राहणे यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.

काही लोक या रिकाम्या वेळेमध्ये  इतरांच्याविषयी गप्पा मारताना दिसतात. यामध्ये राजकारणापासून त्यांच्या गल्लीतल्या घडामोडींपर्यंत अनेक विषय होतात. या सगळ्यावर आपण जर विचार केला तर आपल्याला मिळालेला वेळ आपण सत्कारणी लावला का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याची गरज आहे. आपल्या रिकाम्या वेळेमध्ये आपण ज्या गोष्टी करतो त्याचा आपल्याला नेमका काय फायदा होतो? याचा विचार आपण स्वत: केला पाहिजे. बाजारात भाजी आणायला गेल्यानंतर दहा रुपयाची भाजी पाच रुपयाला कशी मिळेल? याचा आपण विचार करतो. पैशाचा आपण खूप चांगला विचार करतो. तसा वेळेचा विचार आपण खूप कमी करतो. आपला वेळ कुठे दिला पाहिजे? किती दिला पाहिजे? याचे चिंतन आपण स्वत: केलं पाहिजे. आपण अनेक वेळेला अनावश्यक गोष्टींची बडबड करत असतो. त्या बडबडीतून फायदा तर होतच नाही पण समोरची माणसं दुखावली जातात. समोरचा माणूस पुन्हा तिसºया माणसाला आपण काय बोलतो हे जाऊन सांगतो. तोही माणूस आपल्यावर नाराज होतो.   अशा अनावश्यक बडबडीमधून आपलं स्वत:चं नुकसान होत असतं. म्हणून अनावश्यक बडबड न करता आवश्यक गोष्टी केल्या पाहिजेत.

आपण भारतीय अतिशय भाग्यवान आहोत.आपल्यातल्या सर्व चांगल्या गोष्टी आज पाश्चात्त्य लोकांनी स्वीकारलेल्या आहेत. उदाहरणार्थ विविध पंथांचा आध्यात्मिक वारसा परदेशातल्या अनेक लोकांनी स्वीकारला. स्वामी विवेकानंदांचा विचार आज परदेशातल्या लोकांनी आचारात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

यासंबंधी आपण एक गोष्ट करू शकतो आपल्या संत-महात्म्यांनी ज्या गोष्टी आपल्यासाठी लिहून ठेवल्या आहेत. आपल्या जीवनाचा मार्ग खडतर न होता आनंददायी व्हावा म्हणून अनेक गोष्टी संतांनी लिहून ठेवल्या आहेत. या गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत.या गोष्टी आपण जर वाचल्या तर खºया अर्थाने जीवनात आपण वाचणार आहोत. अन्यथा आपलं जीवन हे सर्वसामान्य पशुपक्ष्यांप्रमाणेच राहणार आहे. आपण शांतपणे विचार केल्यावर आपल्या लक्षात  येईल की पशुपक्ष्यांंकडूनसुद्धा खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आपल्याकडूनसुद्धा समाजाने काहीतरी शिकलं पाहिजे. आपला समाजाला कोणत्या न कोणत्या रुपानं उपयोग झाला पाहिजे. याचा विचार आपण केला पाहिजे. 

दुसरी गोष्ट आपल्याला करता येईल एखादी कला आपल्याला अंगी बाणता येईल. संगीतापासून ते इतर एकूण ६४ कला आहेत. त्यापैकी किमान एखादी कला आपण आपल्या अंगी बाळगली पाहिजे. त्या कलेची साधना करण्यामध्ये आपला अमूल्य वेळ आपण दिला पाहिजे. - डॉ. अनिल सर्जे(लेखक हे साहित्यिक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानHealthआरोग्यenvironmentवातावरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई