शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

आला उन्हाळा वेळ सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:46 IST

आपण चांगल्या गोष्टींविषयी खूप काही बोलतो. खूप काही लिहितो पण करत काहीच नाही. म्हणून आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही.

ठळक मुद्देसोलापुरात सालाबादप्रमाणे असह्य उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळा असह्य होऊ नये याकरिता आपण वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेण्याची गरजपावसाचा प्रत्येक थेंब आपण साठवून ठेवला पाहिजे.

सोलापुरात सालाबादप्रमाणे असह्य उन्हाळा सुरू झालेला आहे. हा उन्हाळा असह्य होऊ नये याकरिता आपण वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेण्याची गरज आहे. या विषयावर अनेक लोक चर्चा करतात. लेखन करतात परंतु हा विषय प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आहे. आपण चांगल्या गोष्टींविषयी खूप काही बोलतो. खूप काही लिहितो पण करत काहीच नाही. म्हणून आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. वृक्षारोपण हा अत्यंत महत्त्वाचा विषय. आपण सर्वांनी याची अंमलबजावणी केली पाहिजे. पावसाचा प्रत्येक थेंब आपण साठवून ठेवला पाहिजे. नक्कीच पुढचा काळ हा उन्हाळा सुद्धा आपल्याला आनंद देणारा जाणार. जर आपण पाण्याची बचत आणि वृक्ष संगोपन केलं तर.

सध्याच्या परिस्थितीत आपण हा प्रयत्न केला तर त्याचे यश काही वर्षांनंतर मिळणार आहे. सध्या मात्र हा उन्हाळा आनंददायी करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे उन्हात कुठेही न जाता शांतपणे सावलीत बसणे. शांतपणे सावलीत बसल्यानंतर वेळ चांगला जावा याकरिता आपण सगळे पटकन दूरदर्शन किंवा मोबाईलला चिटकून बसतो. या गोष्टींची मर्यादा पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यातला काही वेळ मोबाईल, दूरदर्शन यांना देणे ठीक आहे पण अखंडपणे त्यांच्याजवळ बसून राहणे यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.

काही लोक या रिकाम्या वेळेमध्ये  इतरांच्याविषयी गप्पा मारताना दिसतात. यामध्ये राजकारणापासून त्यांच्या गल्लीतल्या घडामोडींपर्यंत अनेक विषय होतात. या सगळ्यावर आपण जर विचार केला तर आपल्याला मिळालेला वेळ आपण सत्कारणी लावला का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याची गरज आहे. आपल्या रिकाम्या वेळेमध्ये आपण ज्या गोष्टी करतो त्याचा आपल्याला नेमका काय फायदा होतो? याचा विचार आपण स्वत: केला पाहिजे. बाजारात भाजी आणायला गेल्यानंतर दहा रुपयाची भाजी पाच रुपयाला कशी मिळेल? याचा आपण विचार करतो. पैशाचा आपण खूप चांगला विचार करतो. तसा वेळेचा विचार आपण खूप कमी करतो. आपला वेळ कुठे दिला पाहिजे? किती दिला पाहिजे? याचे चिंतन आपण स्वत: केलं पाहिजे. आपण अनेक वेळेला अनावश्यक गोष्टींची बडबड करत असतो. त्या बडबडीतून फायदा तर होतच नाही पण समोरची माणसं दुखावली जातात. समोरचा माणूस पुन्हा तिसºया माणसाला आपण काय बोलतो हे जाऊन सांगतो. तोही माणूस आपल्यावर नाराज होतो.   अशा अनावश्यक बडबडीमधून आपलं स्वत:चं नुकसान होत असतं. म्हणून अनावश्यक बडबड न करता आवश्यक गोष्टी केल्या पाहिजेत.

आपण भारतीय अतिशय भाग्यवान आहोत.आपल्यातल्या सर्व चांगल्या गोष्टी आज पाश्चात्त्य लोकांनी स्वीकारलेल्या आहेत. उदाहरणार्थ विविध पंथांचा आध्यात्मिक वारसा परदेशातल्या अनेक लोकांनी स्वीकारला. स्वामी विवेकानंदांचा विचार आज परदेशातल्या लोकांनी आचारात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

यासंबंधी आपण एक गोष्ट करू शकतो आपल्या संत-महात्म्यांनी ज्या गोष्टी आपल्यासाठी लिहून ठेवल्या आहेत. आपल्या जीवनाचा मार्ग खडतर न होता आनंददायी व्हावा म्हणून अनेक गोष्टी संतांनी लिहून ठेवल्या आहेत. या गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत.या गोष्टी आपण जर वाचल्या तर खºया अर्थाने जीवनात आपण वाचणार आहोत. अन्यथा आपलं जीवन हे सर्वसामान्य पशुपक्ष्यांप्रमाणेच राहणार आहे. आपण शांतपणे विचार केल्यावर आपल्या लक्षात  येईल की पशुपक्ष्यांंकडूनसुद्धा खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आपल्याकडूनसुद्धा समाजाने काहीतरी शिकलं पाहिजे. आपला समाजाला कोणत्या न कोणत्या रुपानं उपयोग झाला पाहिजे. याचा विचार आपण केला पाहिजे. 

दुसरी गोष्ट आपल्याला करता येईल एखादी कला आपल्याला अंगी बाणता येईल. संगीतापासून ते इतर एकूण ६४ कला आहेत. त्यापैकी किमान एखादी कला आपण आपल्या अंगी बाळगली पाहिजे. त्या कलेची साधना करण्यामध्ये आपला अमूल्य वेळ आपण दिला पाहिजे. - डॉ. अनिल सर्जे(लेखक हे साहित्यिक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानHealthआरोग्यenvironmentवातावरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई